भारताने टी 20 विश्व चषक जिंकल्यानंतर सांगलीच्या मारुती चौकात तरुणांकडून विजयउत्सव साजरा केला जात होता. यावेळी आतषबाजी करण्यात येत होती. या आतषबाजीच्या ठिणगीमुळे दुकानाच्या वर असणाऱ्या पालापाचोळ्यावर ठिणगी पडून आग लागली. घटनास्थळी अग्निशामक विभाग दाखल झालं आणि आगीवर नियंत्रण आणल्याने मोठा अनर्थ टळला.