मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचंही ठरलं, फडणवीसांच्या विदर्भातूनच आमदार होणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पद आणि गोपनियतेची शपथ घेतल्यानंतर, आज त्यांनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचंही ठरलं, फडणवीसांच्या विदर्भातूनच आमदार होणार?
Follow us
| Updated on: Nov 29, 2019 | 3:56 PM

यवतमाळ: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पद आणि गोपनियतेची शपथ घेतल्यानंतर, आज त्यांनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Vidhan parishad) हे अद्याप विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यांना (Uddhav Thackeray Vidhan parishad) सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सभासद व्हावं लागेल. नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यामुळे आता दुसऱ्या आमदाराला राजीनामा द्यायला लावून पुन्हा विधानसभेची पोटनिवडणूक लढवणे हे तसं सोईचं नाही. त्याऐवजी उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जातील असं सांगण्यात येत आहे.

टीव्ही 9 मराठीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भातून विधानपरिषदेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे हे यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून विधानपरिषदेवर जाण्याची चिन्हं आहे.

सध्या या मतदारसंघात शिवसेना आमदार तानाजी सावंत हे नेतृत्त्व करतात. मात्र तानाजी सावंत यांनी उस्मानाबादेतील परांडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून ते विजयी झाले आहेत. त्यामुळे आता यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या जागेवरुन विधानपरिषदेवर जाण्याची चिन्हं आहेत.

उद्धव ठाकरेंनी पदभार स्वीकारला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 2.30 च्या सुमारास मुख्यमंत्रिपदाचा भार स्वीकारला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात ग्रँड एण्ट्री केली. ‘मातोश्री’वरुन जवळपास दुपारी एकच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray arrives at Mantralaya) मंत्रालयाकडे रवाना झाले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हुतात्मा चौकात अभिवादन करुन मंत्रालयाकडे कूच केली. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं.

उद्धव ठाकरे यांचं औक्षण 

मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं औक्षण केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांना ओवाळताना महिलांनी ईडा-पिडा टळो, बळीचं राज्य येवो, असं म्हटलं. त्यावर नव्या मुख्यमंत्र्यांनी बळीराजाचं राज्यच येणार असं म्हणत ओवळणीच्या ताटात ओवाळणी दिली.

संबंधित बातम्या  

औक्षणावेळी महिला म्हणाल्या, ईडा-पिडा टळो, बळीचं राज्य येवो, उद्धव म्हणाले…..   

तिकीट कापलेला भाजपचा माजी आमदार ‘मातोश्री’वर  

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.