अक्षय्य तृतीयेदिवशी मीठ खरेदी करणं शुभं की अशुभ? शास्त्र काय सांगतं?

16 April 2025

Created By: Namrata Patil

हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेचा दिवस शुभ मानला जातो आणि या दिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. 

यासोबतच मीठ खरेदी करणे देखील महत्त्वाचे मानले जाते.

धार्मिक मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेला मीठ खरेदी केल्याने घरात समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते.

ज्योतिषशास्त्रानुसार, अक्षय्य तृतीयेदिवशी सैंधव मीठ खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. हे मीठ शुक्र आणि चंद्र ग्रहांशी संबंधित असून ते संपत्ती आणि समृद्धी प्रदान करते.

अक्षय्य तृतीयेला मीठ खरेदी केल्याने घरात धनलाभ होतो आणि पैशाशी संबंधित अडचणी दूर होतात, असे मानले जाते.

वास्तुशास्त्रानुसार, सैंधव मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मक वातावरण निर्माण करते.

सैंधव मीठ चंद्र ग्रहाशी संबंधित असल्याने, ते खरेदी केल्याने घरात शांतता आणि आनंद नांदतो, तसेच कौटुंबिक वाद कमी होतात.

धार्मिक श्रद्धेनुसार, अक्षय्य तृतीयेला मीठ खरेदी केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात आणि भाग्य उजळते.

असे मानले जाते की या दिवशी मीठ खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होतात आणि घरात सुख-समृद्धीचा वास राहतो.