या पाच वाईट सवयींमुळे टायरची लाइफ कमी होते!

24 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

उन्हाळ्यात टायर फुटण्याच्या घटना वाढतात. पण तुम्हाला माहिती आहे का? पाच चुकीच्या सवयींमुळे हे प्रमाण वाढतं.

गाडी चालवताना वारंवार ब्रेक मारणं आणि रॅश ड्रायव्हिंग केल्याने टायरचं आयुष्य कमी होतं. 

रोजच्या रोज गाडी वेगाने चालवण्याची सवय असेल तरीही तुमच्या टायरचं आयुष्य कमी होतं. 

टायरमधील हवेचा दाब योग्य नसेल आणि तरीही गाडी चालवत असाल तर टायर गरम होऊ शकतो. यामुळे टायर फुटण्याची शक्यता आहे. 

प्रत्येक टायरची एक विशिष्ट भार वाहून नेण्याची क्षमता आहे. पण गरजेपेक्षा जास्त भार असेल तर टायरचं आयुष्य कमी होतं. 

उन्हाळ्यात तापमान पाहता टायर्समध्ये नायट्रोजन भरण्याचा सल्ला दिला जातो. पण पैसे वाचवण्याच्या नादात भरत नाहीत. त्यामुळे टायरचं तापमान व्यवस्थित राहात नाही.

टायरचं आयुष्य हे रस्त्याच्या स्थितीवरही अवलंबून असतं. रस्ते चांगले असतील तर आयुष्य वाढतं. पण खराब असतील तर कमी होतं.

रोज सकाळी रिकाम्या पोटी शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या तर काय होईल?