टी20 वर्ल्डकपच्या मागच्या आठ पर्वात टीम इंडियाची कामगिरी कशी?

1 जून 2024

Created By : राकेश ठाकुर

टी20 वर्ल्डकपचे आतापर्यंत 8 पर्व पार पडले आहेत. टीम इंडियाने 2007 मध्ये पहिला आणि शेवटचा वर्ल्डकप जिंकला होता. 

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने पहिल्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला होता. 

2009 मध्ये भारताचं आव्हान सुपर 8 फेरीतच संपुष्टात आलं. हा वर्ल्डकप पाकिस्तानने जिंकला होता.

2010 वर्ल्ड स्पर्धेतही भारताचं आव्हान सुपर 8 फेरीतच संपलं होतं. या स्पर्धेतही झोळी रिकामी राहिली.

2012 मध्ये भारताचं आव्हान सुपर 8 फेरीतच संपलं होतं. पुन्हा एकदा पदरी निराशा पडली होती. 

2014 मध्ये टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली होती. पण श्रीलंकेने 6 गडी राखून भारताचा पराभव केला होता.

2016 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली. पण वेस्ट इंडिजने पुढचा मार्ग रोखला आणि 7 गडी राखून हरवलं.

वर्ल्डकपच्या सातव्या पर्वात टीम इंडियाची कामगिरी सुमार राहिली. उपांत्य फेरीही गाठता आली नाही. या पर्वात पाकिस्तानने भारताला 10 गडी राखून पराभूत केलं होतं. 

2022 च्या पर्वात भारताचा प्रवास उपांत्य फेरीत संपला. इंग्लंडने भारताला दहा गडी राखून पराभूत केलं आणि स्वप्न भंगलं.