असे 5 पदार्थ जे कधीच पुन्हा गरम करुन खायचे नाहीत?

पालक किंवा इतर हिरव्या पालेभाज्या पुन्हा गरम केल्यास लोहाचं ऑक्सिडाईजमध्ये रुपांतर होतं. आयर्नचं ऑक्सिडेशन झाल्यानं अनेक प्रकारच्या आजारांचा धोका निर्माण होतो.

भात पुन्हा गरम करुन खाल्ल्यास ते शरीराला अपायकारक ठरु शकते. त्यामुळे शरीरात अन्न विष बाधा म्हणजेच फूड पॉईजनिंग होऊ शकते.

अंडे गरम केल्यानंतर लवकरात लवकर खावं. अंडे पुन्हा गरम केल्यास अंड्यातील प्रोटीनसोबतच्या नायट्रोजनमुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो.

चिकन वारंवार गरम केल्यास त्यातील प्रोटिन कम्पोझिशनची संरचना पूर्णपणे बदलते. त्यामुळे अन्न पचनातही अडथळे निर्माण होतात.

मशरूम दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी ठेऊ नये. कारण त्यात असे काही घटक असतात जे पचन प्रक्रियेला बाधा निर्माण करतात.