11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

दुसरा कसोटी सामना होताच इंग्लंड संघ भारत सोडणार, का ते जाणून घ्या

3 फेब्रुवारी 2024

Created By: Rakesh Thakur

भारत इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे सुरु आहे. दुसऱ्या दिवसावर भारताची पकड दिसली. 

पहिल्या डावात भारताने 396 धावा केल्या. तर इंग्लंडचा डाव 253 धावांवर आटोपला. भारताकडे 171 धावांची आघाडी आहे. 

सध्याचा खेळ पाहता चार दिवसात या कसोटीचा निकाल लागणार असं दिसत आहे. त्यानंतर इंग्लंडचे खेळाडू अबुधाबीत जाणार आहेत. 

रिपोर्टनुसार, तिसऱ्या कसोटीदरम्यान खूप गॅप असल्याने इंग्लंडचा संघ अबुधाबीत जाणार आहे.

इंग्लंडचा संघ भारतात येण्यापूर्वी अबुधाबीतच थांबला होता. तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून आहे. 

चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारीला, तर पाच कसोटी सामना 7 मार्चला आहे. या दरम्यान मोठा ब्रेक आहे. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. पहिला कसोटी सामना इंग्लंडने जिंकला.