रोज रात्री जेवण झाल्यावर गूळ खाल्ल्याने काय होते?

1 November 2025

Created By: Mayuri Sarjerao

गुळ साखरेपेक्षा श्रेष्ठ मानला जातो. त्यात कॅलरीज, कार्ब्स, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते.

दररोज रात्री जेवणानंतर गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत

गूळ पचनास खूप मदत करतो. त्याचे इतरही अनेक फायदे आहेत.

गुळाला नैसर्गिक विषारी पदार्थ काढून टाकणारे औषध म्हटले जाते. त्याचे सेवन केल्याने पचनसंस्था सुधारते, पोटाच्या समस्या कमी होतात

गुळामध्ये झिंक, मॅग्नेशियम,लोह हे घटक असतात. त्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

यकृताला विषमुक्त करण्यासाठी देखील गूळ फायदेशीर मानले जाते. गूळ खाल्ल्याने नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध होते

हिवाळ्यात गुळाचे सेवन केल्याने शरीर उबदार राहते, ज्यामुळे सर्दी आणि फ्लू टाळता येतो