25 फेब्रुवारी 2025
चुकून महाशिवरात्रीचा उपवास सुटला तर काय? जाणून घ्या
हिंदू धर्मात महाशिवरात्रीचा उपवास आणि दिवसाचं खूप महत्त्व आहे. शिवाची कृपा व्हावी यासाठी भक्त व्रत ठेवतात.
महाशिवरात्री 26 फेब्रुवारीला साजरी केली जाईल. महाशिवरात्रीला व्रत आणि भगवान शिवाची पूजा केली जाते.
धर्मशास्त्रानुसार, महाशिवरात्री व्रताचे नियम सांगितले गेले आहेत. या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.
पण काही वेळेस चुकून उपवास सुटतो. जर चुकून काही कारणाने उपवास तुटला, तर काय करावं? ते जाणून घ्या
महाशिवरात्रीचं व्रत काही चुकून खाल्याने तुटतो. असा वेळेस जे खाल्लं ते दान केलं पाहीजे.
महाशिवरात्रीला व्रत काही कारणास्तव तुटल्यास भगवान शिवाची क्षमा प्रार्थना करावी.
महाशिवरात्रीचा उपवास अन्न खाल्ल्याने सुटला असेल तर गरीब आणि गरजूंना अन्नदान करावं.