11 December 2023
Created By: Rakesh Thakur
11 December 2023
Created By: Rakesh Thakur
WTC 2025 : या तीन सामन्यांवर टीम इंडियाचं अंतिम फेरीचं ठरणार!
28 फेब्रुवारी 2024
Created By: Rakesh Thakur
भारत आणि इंग्लंड मालिकेतील शेवटचा सामना बाकी आहे. मालिकेत भारताने 3-1 विजयी आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिकाही आहे.
तीन सामन्यांचा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलवर मोठा प्रभाव पडेल.
न्यूझीलंड संघ 75 विजयी टक्केवारीसह प्रथम क्रमांकावर आहे. पण खरी कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत असेल.
चौथ्या कसोटीत इंग्लंडचा पराभव करून भारत 64.58 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर असून विजयी टक्केवारी 55 इतकी आहे. त्यामुळे या मालिकेत जय पराजय महत्त्वाचा आहे.
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला, तर त्याचा विजयी टक्केवारी 68.5 इतकी होईल.
ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामने जिंकले तर भारताला फायदा होईल. मालिका ड्रॉ झाली तरी भारताच्या पथ्यावर पडेल.