वाढत्या उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी काही पदार्थांचे तसेच फळांचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते.
आंब्यात फायबर, फोलेट, लोह, व्हिटॅमिन ए, सी आणि ई असल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होण्यापासून बचाव होतो.
कमी कॅलरीज आणि व्हिटॅमिन व फायबर रिच असलेल्या काकडीमध्ये 96% पाणी असते, त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते.
कलिंगडामध्ये 92% टक्के पाणी असते, ज्याचे सेवन केल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत नाही.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते तसेच पाण्याचे प्रमाणही भरपूर असते.
ग्रेपफ्रूटमध्येही भरपूर पाणी असते , तसेच त्यात अँटी-ऑक्सीडेंटही भरपूर आहे.
उन्हाळ्यात लिंबू-पाण्याचे सेवनही फायदेशीर मानले जाते. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी नियमितपणे लिंबू-सरबत प्यावे.