विराट कोहली याच्यासह 2 हजार 462 दिवसांनी असं काय झालं?

5 डिसेंबर  2025

Created By:  संजय पाटील

रायपूरमधील दुसऱ्या वनडेत टीम इंडियाला पराभूत व्हावं लागलं. यासह विराट कोहलीसोबत  2 हजार 462 दिवसांनी काय झालं?

2 हजार 462 दिवसांनंतर पहिल्यांदा असं झालं जेव्हा विराटने शतक केलं आणि भारताचा पराभव झाला.

याआधी अखेरीस 8 मार्च 2019 रोजी विराटच्या शतकानंतर भारताला पराभूत व्हावं लागलं होतं.

विराटने या दरम्यान 17 एकदिवसीय शतकं झळकावली. या सर्व सामन्यात भारताचा विजय झाला होता. मात्र 3 डिसेंबरला ही साखळी तुटली.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विराटसोबत 6 वर्षांत पहिल्यांदा असं झालं जेव्हा त्याने शतक केलं आणि भारत पराभूत झाला.

विराटने रायपूरमध्ये संयमी खेळी करत फटकेबाजी केली. विराटने 93 चेंडूंचा सामना केला.

विराटने या 93 चेंडूत 2 सिक्स आणि 7 फोरसह 102 धावा केल्या.