35 कसोटी सामन्यानंतर विराट-शुबमनपैकी सरस कोण?

18 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

विराटने कसोटी कारकीर्दीत एकूण 123 सामने खेळलेत. तर शुबमनने 35 सामने पूर्ण केले आहेत. 

विराट आणि शुबमन या दोघांमध्ये 35-35 कसोटी सामन्यानंतर कोण सर्वोत्तम आहे? हे जाणून घेऊयात. 

शुबमनने 35 कसोटींमधील 65 डावांत 41.66 च्या सरासरीने 2 हजार 500 धावा केल्या आहेत.

विराटने 35 सामन्यांमधील 62 डावांत 45.98 च्या सरासरीने 2 हजार 667 धावा केल्या होत्या.

शुबमनने 35 सामन्यांमध्ये 8 शतकं आणि 7 अर्धशतकं झळकावली आहेत. 

विराटने 35 कसोटी सामन्यांमध्ये 11 शतकं आणि 10 अर्धशतकं झळकावली होती.

शुबमनने  35 कसोटींमध्ये 276 चौकार आणि 43 षटकार लगावले आहेत.

विराटने 35 कसोटी सामन्यांमध्ये 314 चौकार आणि 8 षटकार लगावले होते.

टेस्ला नावाचा अर्थ काय? एलोन मस्कने हेच नाव का निवडलं?