ट्रेनमध्ये विना तिकीट पकडलं! दंड भारला नाही तर किती होते शिक्षा?
3 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
भारतीय रेल्वेने प्रवास करताना अनेक नियम आहेत. विना तिकीट प्रवास करणाऱ्यासाठी शिक्षेची तरतूद आहे.
विना तिकीट ट्रेनमधून प्रवास करत असाल आणि टीटीईने पकडलं तर दंड आकारतो. एखाद्या प्रवाशाने दंड भरला नाहीतर त्याला पुढच्या स्टेशनवर उतरवलं जाऊ शकतं.
प्रवाशाने दंड भरला नाही, तसेच ट्रेनमधूनही उतरला नाही तर टीटीई रेल्वे पोलिसांना कळवतो. अशा प्रकरणात शिक्षा केली जाते.
अशा प्रकरणात तिकीट नसलेल्या प्रवाशाला एक महिन्याचा तुरुंगवास किंवा 500 रुपये दंड होऊ शकतो किंवा दोन्ही होऊ शकतं.
विना तिकीट पकडले गेलं आणि दंड भरला तर तुरुंगवास शक्यतो होत नाही. पण गैरवर्तन केलं तर त्याला शिक्षा होऊ शकते.
रेल्वे प्रवासी टीटीईशी गैरवर्तन करत असेल किंवा भारतीय रेल्वे नियमांचं उल्लंघन करत असेल तर टीटीई पोलिसांना कळवतो.
रेल्वे पोलीस प्रवाशाला अटक करू शकतात. रेल्वे कायदा 139 अंतर्गत त्याला महिन्यांना तुरुंगवास होऊ शकतो.
साप की मुंगूस! पळण्यात कोण सर्वात आघाडीवर? कोण जिंकणार?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा