पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दोन्ही देशात तणाव वाढला आहे. भ्याड हल्ल्याचं सडेतोड उत्तर देण्यासाठी भारताने तयारी केली आहे.
पाकिस्तानही भारताबाबत गरळ ओकत आहे. पण ही काही नवी गोष्ट नाही. पाकिस्तान कायम असंच वागत आला आहे. तिथल्या मुलांना काय शिकवलं जातं?
पाकिस्तानच्या अभ्यासक्रमात भारताबाबत नकारात्मक गोष्टी लिहिल्या आहे. यात भारतासोबत झालेल्या 1948, 1965 आणि 1971 च्या युद्धाचा उल्लेख आहे. मात्र पाकिस्तानच्या बाजूने
फाळणीबाबत चुकीचं लिहीलं आहे. इतकंच काय तर भारतातून पाकिस्तानात आलेल्यांना लोकांनी मदत केली. पण भारतात त्यांच्यावर अत्याचार केले. बस आणि ट्रेनवर हल्ले केले.
इतिहासाच्या पुस्तकात तर 1947 पूर्वीच्या समृद्ध भारताचा उल्लेख नाही. फक्त इस्लामिक इतिहास शिकवला जातो.
पाकिस्तानच्या इतिहासात अरब लुटारू मोहम्मद कासिमला नायक असल्याचं रंगवलं गेलं आहे.
मोहम्मद कासिमने इसवी सन 711 मध्ये भारतावर हल्ला केला होता. पाकिस्तान निर्माण व्हायच्या 1300 वर्षापूर्वी. पण कासिमला पहिला पाकिस्तानी संबोधलं गेलं आहे.
पाकिस्तानात काँग्रेसच्या स्थापनेबाबत चुकीचं लिहिलं गेलं आहे. हिंदू संघटना असल्याचं लिहिलं आहे. तर मुस्लिम लीग आणि जिन्नाला नायक केलं आहे.
आयपीएलच्या एका सामन्यासाठी पंचांना किती मानधन मिळतं?