एअर स्ट्राईक रात्रीच करण्याचं कारण काय, जाणून घ्या पाच फायदे
8 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
भारताने पहलगाम हल्ल्याचा उत्तर देत बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली. या एअर स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर दिलं गेलं.
रात्री पायलट आणि सैनिकांच्या जीवाचा धोका कमी असतो. कारण शत्रूला उत्तर देण्याची संधी मिळत नाही.
अंधारात विमान आणि ड्रोनचा वेध घेणं कठीण होतं. शत्रूंचे रडार आणि पाळत ठेवणाऱ्या यंत्रणा सहजपणे पकडू शकत नाही.
रात्री हल्ला केल्याने शत्रू सतर्क नसतो. त्यामुळे त्यांच्यावर प्रभावीपणे हल्ला करता येतो. तसेच विमान पकडणं कठीण होतं.
हल्ला यशस्वी झाला आणि नागरिकांचे बळी गेले नाहीत तर आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका होत नाही. तसेच राजनैतिक दबावाची शक्यता कमी असते.
रात्री शत्रू तयार नसल्याने प्रत्युत्तर देणं कठीण असतं. अंधारात कारवाई करणे आव्हानात्मक असतं.
रात्रीच्या वेळी आधुनिक लढाऊ विमाने नाईट व्हिजन, अचूक जीपीएस मार्गदर्शित क्षेपणास्त्रे आणि थर्मल इमेजिंग वापरतात. यामुळे ऑपरेशन अधिक अचूक होते.
क्रेडिट कार्ड काही मिनिटात UPI ला लिंक करा! असे मिळतात फायदे
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा