आचार्य चाणक्य यांना भारतातील महान विद्वान आणि अर्थशास्त्री म्हटलं जातं. चाणक्य यांच्या निती शास्त्रात जीवनातील आव्हान आणि त्याचे उपाय सांगितले आहेत. 

आचार्य चाणक्य यांच्यानुसार माणसाच्या काही चुकीच्या सवयींमुळे पैसा कमी होतो. म्हणून लवकरात लवकर या सवयी सोडल्या पाहिजेत. 

चाणक्य म्हणतात, सकाळी उठून काही विशेष कार्य करणाऱ्यांना श्रीमंत होण्यापासून कोणी  रोखू शकत नाही. 

चाणक्य म्हणतात, सकाळी ब्रह्म मुहूर्ताला उठलं पाहिजे.  यावेळी उठून स्नान आणि  ध्यान करा. यश, सुख- समृद्धीचे मार्ग उघडतील.

जर तुम्ही कुठलं मोठ कार्य करणार असाल, तर सकाळी उठून रणनिती बनवा. अपयश तुमच्या वाट्याला नाही येणार.

दैनिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण पैसा खर्च करतो. एक गोष्ट लक्षात घ्या, कमाई  लक्षात घेऊन खर्च करा. 

रोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा. असं केल्याने सूर्य देव प्रसन्न होतो. आयुष्यात माणसाची प्रगती सुरु होते.