आचार्य चाणक्य भारतीय इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व होते. ते एक कुशल राजनीतिज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, आणि तत्त्वज्ञ होते.
23 June 2025
आर्य चाणक्य यांनी जीवनातील वेगवेगळ्या पैलूंवर अनेक प्रकारच्या धोरणे सांगितली आहेत.
चाणक्या नीतीचे पालन करून व्यक्ती त्यांची नाती मजबूत करु शकतात. त्यांनी प्रेम, जीवनाबद्दल अनेक गोष्टी देखील सांगितल्या आहेत.
चाणक्य यांच्यानुसार, काही चुकीच्या सवयी नाते संबंधात तणाव निर्माण करु शकता. त्यामध्ये वेळीच सुधारणा करणे गरजेचे आहे.
चाणक्य नीतीनुसार, जर कोणी आपल्या जोडीदाराचा वारंवार अपमान करत असेल तर त्या नात्यात कटुता निर्माण होऊ लागते. या परिस्थितीत ते नाते तुटू लागते.
नात्याचा पाया विश्वास अन् प्रामाणिकपणावर अवलंबून असतो. जर नात्यात पारदर्शकता नसेल तर त्या नात्यात गैरसमज निर्माण होऊ लागतात.
चाणक्य नीतीनुसार, प्रेमात वेळ देणे खूप गरजेचे आहे. एक-दुसऱ्यांना वेळ दिला नाही तर नाते तुटू लागतात.
हे ही वाचा... दृष्ट लागल्यामुळे शुभ कार्य थांबतात का? प्रेमानंद महाराज यांनी दिले उत्तर