भारत आणि मालदीवमधले राजकीय संबंध सध्या प्रचंड  ताणले गेले आहेत.

याला कारण आहे,  मालदीवचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांची  भारत विरोधी भूमिका.

मुइज्जू यांच्यामुळेच मालदीवच्या पर्यटन  उद्योगावर परिणाम  झाला आहे.

भारतातून मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांची  संख्या रोडावली आहे.

मालदीवमध्ये तैनात भारतीय सैनिकांनी परत जावं, ही मुइज्जू यांची मागणी होती.  ती पूर्ण झालीय.

मालदीवच्या अड्डू शहरात तैनात 25 भारतीय सैनिक मायदेशी येण्यासाठी  निघाले आहेत.  

मालदीवमध्ये अन्य  जागांवर तैनात भारतीय सैनिक 10 मे पर्यंत  मायदेशी परततील.