आंघोळ न करता तुळशीला पाणी अर्पण केल्याने वाढतात अडचणी?

30 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

तुळशीचे रोप पवित्र आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते.

काही लोकांच्या मनात असा प्रश्न असतो की आपण स्नान न करता तुळशीला पाणी अर्पण करू शकतो का?

धार्मिक श्रद्धेनुसार, स्नान न करता तुळशीला कधीही पाणी अर्पण करू नये

असे मानले जाते की देवी लक्ष्मी तुळशीच्या रोपात वास करते आणि तिला पवित्रता, स्वच्छता आवडते

स्नान न करता तुळशीला पाणी अर्पण करणे हे तुळशीचा अपमान मानला जातो.

स्नान न करता तुळशीला पाणी अर्पण केल्याने धनदेवता नाराज होऊ शकते, ज्यामुळे घरात आर्थिक संकटे येऊ शकतात

तुळशीला स्पर्श करण्यापूर्वी किंवा तिला पाणी अर्पण करण्यापूर्वी स्नान करावे

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)