भारतसााठी टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक लगावणारे बॅट्समन, अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानी

27  जानेवारी  2026

Created By:  संजय पाटील

टी 20i मध्ये भारतासाठी वेगवान अर्धशतकांचा विक्रम युवराजच्या नावावर आहे. युवीने 12 चेंडूत 50 धावा केल्या होत्या.

युवीनंतर अभिषेक शर्मा  याने दुसऱ्या स्थानी झेप घेतलीय.  अभिषेकने 25 जानेवारी 2026 रोजी 14 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं.

ऑलराउंडरर हार्दिक पंड्या याने 16 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या आहेत.

अभिषेकने याआधी 2025 मध्ये इंग्लंड विरुद्ध 17 चेंडूत  अर्धशतक झळकावलं होतं.

केएल राहुल याने स्कॉटलँड विरुद्ध 2021 साली 18 चेंडूत टी 20i शतक ठोकलेलं.

सूर्यकुमार यादव याने 2022 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 18 बॉलमध्ये फिफ्टी पूर्ण केली होती. 

अभिषेकमध्ये युवराज सिंह याचा 12 चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम मोडीत काढण्याची क्षमता आहे. आता हा विक्रम होईल की नाही? याचीच चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे.