जेवणात पाल पडली तर अन्न विषारी होतं का?

4 July 2025

Created By : Manasi Mande

जेवणात पाल पडली तर जेवण विषारी होतं असं अनेकांना वाटतं

पण खरोखरच असं होतं की ही केवळ चर्चा आहे, जाणून घेऊया

पालींमध्ये विषारी पदार्थ नसतो, त्यांच्या शरीर किंवा लाळेमुळे पदार्थ विषारी होत नाही

पाली अनेक ठिकाणी फिरत असल्याने त्यांचे पाय वा शरीरात बॅक्टेरिया असू शकतो

हा बॅक्टेरिया अन्न पदार्थांना विषारी बनवतो, त्यामुळे प्रकृती बिघडते

पाल अन्नात पडली तर बॅक्टेरियामुळे पोट खराब होणं, उलटी होणं किंवा जुलाब होऊ शकते

विषामुळे नव्हे तर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे असं होतं

त्यामुळे पालीच्या संपर्कातील पदार्थाचा भाग हटवा, बाकी पदार्थ चांगले धुवून काढा किंवा गरम करा

स्वयंपाक घर स्वच्छ ठेवा, अन्न पदार्थ झाकून ठेवा

घाणेरडी जागा आणि मोकळी जागा पालींना आकर्षित करते

कापूर, लसूण किंवा पुदीन्याच्या वासाने तुम्ही पालीला पळवून लावू शकता

पाल पडल्याने अन्न विषारी होत नाही, तर बॅक्टेरिया आणि घाणीमुळे विषाक्त होतं