मृत व्यक्तीच्या अस्थी घरात ठेवल्याने काय होतं?

15 February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

हिंदू धर्मात, अंत्यसंस्कारानंतर अस्थींचे विसर्जन करणे हा एक महत्त्वाचा विधी मानला जातो, जो दिवंगत आत्म्याला शांती आणि मोक्ष देतो

पण तुम्ही कधी विचार केलाय की जर तुम्ही अस्थी घरात ठेवली तर काय होईल?

घरात अस्थी ठेवण्याशी संबंधित अनेक श्रद्धा आणि परंपरा आहेत. काही मान्यतेनुसार, घरात अस्थी ठेवल्याने कोणत्याही प्रकारची हानी होत नाही

तर,काहींच्या मते त्या अस्थींमध्ये मृत व्यक्तीचा आत्मा असतो.

गरुड पुराणातील मान्यतेनुसार, अंत्यसंस्कारानंतर अस्थी घरात ठेवल्या तर आत्म्याला मोक्ष मिळत नाही असं म्हटलं जातं

गरुड पुराणानुसार, अस्थी घरात ठेवल्याने मृत व्यक्तीचा आत्मा भटकत राहतो

अस्थी जर विसर्जित केल्या नाही, तर मृत व्यक्तीचा आत्मा देखील त्याच ठिकाणी राहतो

म्हणून अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या, सातव्या आणि नवव्या दिवशी अस्थी गोळा केली जाते. मग १० दिवसांत ते पवित्र नदीत विसर्जित केले जाते.