Onion Crop: नगदी म्हणून ओळख असलेला कांदा वावरातच सडला, शेतकऱ्यांनी असा का निर्णय घेतला?

| Updated on: Apr 29, 2022 | 11:26 AM

यंदा हंगामाच्या सुरवातीला 30 ते 35 रुपये किलो असा दर कांद्याला होता. लाल कांद्याची आवक सुरु असताना हे दर टिकून होते. पण उन्हाळी कांद्याची आवक सुरु होताच दरात घसरण झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून ही घसरण सुरुच आहे. त्यामुळे उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांचा वांदाच केल्याचे चित्र राज्यात आहे.

Onion Crop: नगदी म्हणून ओळख असलेला कांदा वावरातच सडला, शेतकऱ्यांनी असा का निर्णय घेतला?
उन्हाळी हंगामातील कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

बुलडाणा : उसापाठोपाठ कांदा हे सर्वात मोठे (Cash Crop) नगदी पीक म्हणून ओळखला जात आहे.असे असले तरी हाच कांदा आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. (Onion Rate) दराच्या लहरीपणामुळे कांदा ओळखला जातो पण याचा फटका हा उत्पादक शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतो. दीड महिन्यापूर्वी कांद्याला विक्रमी दर मिळाला होता. यानंतर मात्र, (Summer Crop) उन्हाळी कांद्याची आवक वाढताच चित्र बदलले आहे. बुलडाणा बाजारपेठे तर कांद्याचा कचराच झाला आहे. 2 ते 3 रुपये किलो असा दर मिळत आहे. त्यामुळे वाहतूक आणि काढणीचाही खर्च यामधून निघत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा वावरातच ठेवला आहे. पावसाळी कांद्यातून उत्पादन मिळाले पण उन्हाळी कांद्यातून मात्र, शेतकऱ्यांचा वांदा झाला आहे.

खर्च लाखोंमध्ये उत्पादन हजारोंमध्ये

हंगामी पिकातून उत्पादनवाढीसाठी शेतकरी एक ना अनेक प्रयत्न करतो. शिवाय कांदा हे नगदी पीक असल्याने या पिकाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र, दरातील अनियमिततेमुळे काही शेतकऱ्यांना फायदा तर काहींचे नुकसान हे ठरलेलेच आहे. यंदा हंगामाच्या सुरवातीला 30 ते 35 रुपये किलो असा दर कांद्याला होता. लाल कांद्याची आवक सुरु असताना हे दर टिकून होते. पण उन्हाळी कांद्याची आवक सुरु होताच दरात घसरण झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून ही घसरण सुरुच आहे. त्यामुळे उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांचा वांदाच केल्याचे चित्र राज्यात आहे.

मागणीच घटल्याने निर्माण झाली स्थिती

आवक वाढूनही मध्यंतरी लाल कांद्याचे दर हे टिकून होते. हंगामाच्या सुरवातीला कांद्याला विक्रमी दर मिळाला होता. त्यामुळे उन्हाळी हंगामातील कांद्याला किमान 20 रुपये किलो असा दर मिळेल ही अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण दरात मोठी घसरण झाली आहे. दर्जात्मक कांदा असतानाही मागणीच नसल्याने ही परस्थिती ओढावली आहे. राज्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या लासलगाव, सोलापूर या बाजारपेठेतही अशी अवस्था आहे.

कांदा वावरात अन् मशागतीची कामे

कांद्याचे दर एवढे घसरले आहेत की, आता वावरातला कांदा काढणेही मुश्किल होत आहे. कांद्याची छाटणी, तोडणी आणि वाहतूक करुन बाजारपेठ जवळ करणे हा सर्व खर्चही यामधून निघेल अशी स्थिती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा न काढताच आता शेतीमशागतीची कामे सुरु केली आहेत. किमान आगामी पिकातून का होईना उत्पन्न पदरी पडेल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.