निवडणूक निकाल बातम्या 2026 LIVE
Election Live Blog
-
ममता बॅनर्जींचा पराभव करणे गरजेचे होते - सुवेंदू अधिकारी
-
भ्रष्टाचार करणाऱ्यांचा पराभव झाला - सुवेंदू अधिकारी
-
सर्वात मोठी बातमी! ममता बॅनर्जींचा भवानीपूरमधून पराभव
-
भाजपच्या विजयाचा इचलकरंजीत जल्लोष; कार्यकर्त्यांकडून साखर वाटप
-
पश्चिम बंगालमधील यशानंतर सिंधुदुर्गात भाजपचा जल्लोष
भारतामध्ये 2026 च्या निवडणूक प्रचाराची सुरुवात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपासून होत आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी आदी राज्यांत एप्रिलमध्ये मतदान होणार असून सर्व राज्यांचे निकाल 4 मे रोजी जाहीर होतील.
पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक होत आहे. पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान होईल. राज्यात 2011 पासून तृणमूल काँग्रेसचे सरकार असून मुख्यमंत्री पदावर सातत्याने ममता बॅनर्जी आहेत. 2021 च्या निवडणुकीपासून बंगालच्या राजकारणात बदल दिसून येत आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांची ताकद कमी होत असताना भाजपची कामगिरी सातत्याने सुधारत आहे. भाजप आता मुख्य विरोधी पक्षाच्या भूमिकेपलीकडे जाऊन सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहे.
बंगालसोबतच शेजारील आसाम राज्यातही निवडणूक होत आहे. आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी मतदान होईल. या राज्यात मुख्य लढत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात आहे.
आसामसोबतच दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतही एप्रिलमध्ये मतदान होणार आहे. तसेच केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीमध्येही निवडणूक होत आहे. आसाम, केरळ आणि पुडुचेरी येथे 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल, तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होईल. पश्चिम बंगाल वगळता इतर सर्व राज्यांमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका पार पडत आहेत.
जागांच्या बाबतीत, पश्चिम बंगालमध्ये 294, आसाममध्ये 126, तामिळनाडूमध्ये 234, केरळमध्ये 140 आणि पुडुचेरीमध्ये 30 विधानसभेच्या जागा आहेत.
