AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MIM चा नेता बिहारच्या मुख्यमंत्रिपदी? नवे समीकरण समोर; राजकारणात खळबळ!

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. असे असले तरी आता एमआयएमने सरकार स्थापन करण्यासाठी एक नवा फॉर्म्युला आणला आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

MIM चा नेता बिहारच्या मुख्यमंत्रिपदी? नवे समीकरण समोर; राजकारणात खळबळ!
asaduddin owaisi
| Updated on: Nov 15, 2025 | 3:04 PM
Share

MIM Offer To Nitish Kumar : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत जदयू, भाजपाप्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली. येथे पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होणार असून आरजेडी, काँग्रेसप्रणित महागठबंधनला जोरदार फटका बसला आहे. जेडीयूचे नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार असल्याचे जवळपास स्पष्ट असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता एमआयएमने थेट नितीश कुमार यांच्या जेडीयूला मोठी ऑफर दिली आहे. नितीश कुमार यांनी महागठबंधनमध्ये सामील व्हावे, असे एमआयएमने म्हटले आहे. सोबतच अवघ्या पाच जागा जिंकलेल्या असल्या तरी एमआयएमने मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला आहे. या ऑफरनंतर आता बिहारच्या राजकारणात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

नेमकी ऑफर काय?

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने पाच जागा जिंकल्या आहेत. सीमांलचल भागातील या जागा आहेत. याच पाच जागांच्या बळावर एमआयएम पक्षाकडू बिहारमध्ये सरकार स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले जात आहे.या पक्षाने आरजेडी, जेडीय पक्षांना सोबत येण्याची ऑफर दिली आहे. एमआयएमचा मुख्यमंत्री झाल्यास आम्ही नितीश कुमार यांना 2029 साली पंतप्रधानदपाच्या उमेदवारीसाठी पाठिंबा देऊ, असेही या पक्षाने म्हटले आहे.

एमआयएमचं सत्तेत येण्याचं गणित कसं?

आतादेखील सरकार स्थापन करण्याची संधी गेलेली नाही, असे एमआयएमने म्हटले आहे. जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, एमआयएम, सीपीआयएमएल, सीपीआयएम या पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर सरकारची स्थापना करता येईल. जेडीयने 85 जागांवर विजय मिळवलेला आहे. आरजेडीकडे 25 जागा आहेत. काँग्रेस आणि एमआयएमकडे क्रमश: सहा आणि पाच जगा आहेत. सीपीआयएम आणि सीपीआयएमएलने तीन जागांवर विजय मिळवलेला आहे.

या सर्वच पक्षांच्या जागांची बेरीज केली तर 124 हा आकडा होतो. बहुमतासाठी 122 जागांची गरज असते. त्यामुळे एमएयएमने सुचवल्याप्रमाणे हे सर्व पक्ष एकत्र आले तर सरकारची स्थापना करता येते, असे एमआयएमचे मत आहे. दरम्यान, हे समीकरण प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळे एमआयएमच्या या ऑफरमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक