खासगी संस्थेत काम करण्यापेक्षा तुलनेने सराकरी नोकरी जास्त सुरक्षित, आराम तसेच आर्थिक स्थैर्य देणारी असते. कदाचित याच कारणामुळे आज सरकारी नोकरीसाठी तरुण तरुणी जिवाचं रान करताना दिसतात. मात्र, मागील काही वर्षापासून या सरकारी नोकऱ्यांच्या भरती प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामध्ये मागील काही दिवसांपासून आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेतील गोंधळाची खास चर्चा होत आहे