Parliament Budget Session | चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ; राहुल गांधी–राजनाथ सिंह यांच्यात शाब्दिक चकमक
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान सत्ताधारी पक्षाकडून जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. चीन आणि भारताच्या सीमेवरील परिस्थितीचा उल्लेख करताना राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले. माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, चीनने भारताच्या हद्दीत चार तंबू ठोकले असल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. मात्र हे पुस्तक केंद्र सरकारने प्रकाशित होऊ दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला.
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान सत्ताधारी पक्षाकडून जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. चीन आणि भारताच्या सीमेवरील परिस्थितीचा उल्लेख करताना राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले. माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, चीनने भारताच्या हद्दीत चार तंबू ठोकले असल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. मात्र हे पुस्तक केंद्र सरकारने प्रकाशित होऊ दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत या आरोपांना विरोध केला. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हस्तक्षेप करत राहुल गांधींच्या दाव्यांना खोटे ठरवले. राहुल गांधी मांडत असलेली माहिती चुकीची असून, अशी माहिती त्यांना कुठून मिळाली, असा सवाल राजनाथ सिंह यांनी उपस्थित केला.
राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की, देशाच्या सुरक्षेशी संबंधित बाबींवर चुकीची माहिती पसरवणे योग्य नाही. राहुल गांधी आणि राजनाथ सिंह यांच्यात शाब्दिक चकमक झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. या घडामोडींमुळे लोकसभेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
Published on: Feb 02, 2026 05:52 PM
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..

