AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार

शरद पवार

शरद पवार हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे नेते आहेत. पवार हे महाराष्ट्राचे चारवेळा मुख्यमंत्री होते. केंद्रातील पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणून आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत. तसेच राज्यातील महाविकास आघाडीचे ते शिल्पकारही आहेत. महाराष्ट्रातील प्रभावशाली राजकीय कुटुंब असलेल्या पवार कुटुंबातील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ते एक प्रमुख चेहरा आहेत. कुटुंबातील इतर राजकारण्यांमध्ये त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, पुतण्या अजित पवार आणि नातू रोहित पवार हे राजकारणात सक्रिय आहेत. शरद पवार यांनी 2005 ते 2008 पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. 2010 ते 2012 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले. ऑक्टोबर 2013 ते जानेवारी 2017 या कालावधीत ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. कुस्ती या खेळालाही मानाचं स्थान निर्माण करून देण्यात शरद पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. भारत सरकारने त्यांना 2017 मध्ये पद्मविभूषण हा भारताचा दुसरा-सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला आहे.

Read More
Sharad Pawar : मुंबई कुणाची? शरद पवारांनी एका वाक्यात दिलं उत्तर, नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar : मुंबई कुणाची? शरद पवारांनी एका वाक्यात दिलं उत्तर, नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar on Mumbai : शरद पवार यांनी मुंबई कुणाची याबाबतही मोठं विधान केलं आहे. मुंबईतील ससून डॉक मच्छीमार बंदराची पाहणी केल्यानंतर शरद पवार नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

Jayant Patil: पक्ष बदलाच्या चर्चा अन् भर सभेत जयंत पाटील यांचे बेधडक उत्तर, म्हणाले…

Jayant Patil: पक्ष बदलाच्या चर्चा अन् भर सभेत जयंत पाटील यांचे बेधडक उत्तर, म्हणाले…

Jayant Patil Statement: पक्ष प्रवेश बाबत भर भाषणात जयंत पाटील यांनी स्पष्टपणे दिलखुलास बोलूनच दाखवले. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील यांच्या भाजप नेत्यांशी भेटीगाठी झाल्यावर चर्चांना पेव फुटले होते. या सर्व चर्चांना त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार आणि पार्थ पवारांमध्ये तीन तास बैठक; आजोबांनी नातवाला काय सांगितलं?

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार आणि पार्थ पवारांमध्ये तीन तास बैठक; आजोबांनी नातवाला काय सांगितलं?

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात सिल्व्हर ओकवर तीन तास महत्त्वपूर्ण बैठक झाली. राज्यातील विकासकामे आणि राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. पार्थ पवारांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता, तसेच बारामतीतील विकासकामांवरही बोलणे झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, बैठकीचा तपशील गुलदस्त्यात असल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

“जरा बारामतीकडेही लक्ष द्या!”, दादा जाताच समस्यांनी डोकं वर काढलं? पवार कुटुंबाला लिहिलेल्या खुल्या पत्राने खळबळ

“जरा बारामतीकडेही लक्ष द्या!”, दादा जाताच समस्यांनी डोकं वर काढलं? पवार कुटुंबाला लिहिलेल्या खुल्या पत्राने खळबळ

Ajit Pawar Baramati: अजित पवार यांच्या अकालीन निधनानंतर बारामतीत समस्यानी डोकं वर काढलं की काय? असा सवाल विचारल्या जात आहे. बारामतीकरांनी याविषयी पवार कुटुंबियांना खुलं पत्र लिहून तक्रार केली आहे. शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांना बारामतींकरांनी मोठे आव्हान केले आहे. दादांच्या निधनानंतर बारामती पोरकी झाल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीत धुसफूस! पवार गटासोबत युती नकोच; सपकाळ यांच्याकडे थेट मागणी; पुण्यात काय घडलं?

महाविकास आघाडीत धुसफूस! पवार गटासोबत युती नकोच; सपकाळ यांच्याकडे थेट मागणी; पुण्यात काय घडलं?

Congress NCP : पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटासोबत यापुढे कोणत्याही प्रकारची युती करू नये, अशी मागणी केली आहे.

एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा

एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा

पुण्यातील यशदा सेंटरमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एकाच व्यासपीठावर दिसले. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख व्यक्तिमत्त्वे एकाच मंचावर उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांना मोठा झटका, शिवसेना ठाकरे गटाला खिंडार, नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी सोडला पक्ष

मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांना मोठा झटका, शिवसेना ठाकरे गटाला खिंडार, नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी सोडला पक्ष

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरे यांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आणखी एका नेत्याने आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे.

Jyoti Waghmare : सुप्रियाताई तुमचं कर्तृत्व काय? आपला पक्ष सांभाळता… ज्योती वाघमारे कडाडल्या

Jyoti Waghmare : सुप्रियाताई तुमचं कर्तृत्व काय? आपला पक्ष सांभाळता… ज्योती वाघमारे कडाडल्या

Jyoti Waghmare on Supriya Sule : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरून शरद पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जोरदार बाजू मांडली. त्यांच्या या विधानाचे पडसाद राजकारणात उमटणार नाहीत, असं कसं होईल? त्यांच्या या युक्तिवादानंतर खासदार ज्योती वाघमारे यांनी शिंदे सेनेचा किल्ला असा लढवला. त्यांनी सुळे यांच्यावर जोरदार पलटवार केला.

Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा

Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा

चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे तब्बल 20 कंपन्या स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याचा दावा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे. या कंपन्यांमध्ये सुमारे दोन हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत असल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पवार यांनी व्यक्त केली आहे. या मुद्द्यावर ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनीही संसदेत आवाज उठवत कंपन्यांच्या स्थलांतरासंदर्भातील आकडेवारी मांडली आहे.

20 कंपन्यांचं स्थलांतर, 2 हजार कामगारांचा रोजगार धोक्यात, शरद पवार, राजाभाऊ वाजेंच्या दाव्याने खळबळ; चाकणवरून घेरलं

20 कंपन्यांचं स्थलांतर, 2 हजार कामगारांचा रोजगार धोक्यात, शरद पवार, राजाभाऊ वाजेंच्या दाव्याने खळबळ; चाकणवरून घेरलं

चाकण एमआयडीसीतील २० कंपन्या वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे स्थलांतर करत असल्याने २००० कामगारांचा रोजगार धोक्यात आला आहे. शरद पवार यांनी यावर चिंता व्यक्त करत पायाभूत सुविधा सुधारण्याची मागणी केली. तर देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कंपन्या केवळ कागदावरच असल्याचे सांगत दावे फेटाळले.

त्या चार घटनांनी सर्वच चक्रावले, काय घडतंय पडद्यामागे? भाजप आणि पवार गटात काय खिचडी शिजतेय?

त्या चार घटनांनी सर्वच चक्रावले, काय घडतंय पडद्यामागे? भाजप आणि पवार गटात काय खिचडी शिजतेय?

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आणि शरद पवार गटातील संभाव्य युतीची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या भेटीगाठी, पवारांची मोदींसोबतची चर्चा, खासदारांचे भेटीसत्र आणि खासगी कार्यक्रमांतील उपस्थिती या चार घटनांनी राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. पडद्यामागे काही मोठे राजकीय घडामोडी घडत आहेत का, याची उत्तरे अजून गुलदस्त्यात असली तरी, चर्चांना मात्र जोर धरला आहे.

शरद पवारांचा अंदाज लावायला मी फार लहान माणूस, त्यांचं जवळं येणं म्हणजे.., भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

शरद पवारांचा अंदाज लावायला मी फार लहान माणूस, त्यांचं जवळं येणं म्हणजे.., भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एनडीएसोबत जाणार आहे, अशी चर्चा सुरू आहे, यावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या बड्या नेत्यानं मोठं विधान केलं आहे.