काँग्रेस

काँग्रेस

भारतातील सर्वात जुना आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला पक्ष म्हणजे काँग्रेस (Congress). काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885मध्ये झाली. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेस सर्वात पुढे होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्याग केला. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. नेहरुंनी देशाच्या विकासाचा पाया रोवला. देश आधुनिकतेकडे जाण्याचं सर्व श्रेय नेहरूंना जातं. नेहरुंनीच देशाला वैज्ञानिक दृष्टीकोणही दिला. स्वातंत्र्यापासून 2014पर्यंत काँग्रेसने 16 लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यातील सहा निवडणुकांमध्ये काँग्रेसने पूर्ण बहुमत मिळालं. तर, चारवेळा मित्र पक्षांना सोबत घेऊन काँग्रेसने केंद्रात सत्ता स्थापन केली. म्हणजे काँग्रेस तब्बल 49 वर्ष या ना त्या कारणाने सत्तेत राहिली. काँग्रेसने देशाला आतापर्यंत सात पंतप्रधान दिले आहेत. जवाहरलाल नेहरू (1947-64), लाल बहादूर शास्त्री (1964-66), इंदिरा गांधी (1966-77,1980-84), राजीव गांधी (1984-89), पी.व्ही. नरसिंह राव (1991-96) आणि मनमोहन सिंग (2004-2014) आदी पंतप्रधान काँग्रेसने दिले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचंड मोठा पराभव झाला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसची ही सर्वात खराब कामगिरी होती. 2014च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या 543 जागांपैकी केवळ 44 जांगावरच काँग्रेस विजयी झाली. 2019मध्येही काँग्रेसला फार मोठं यश आलं नाही. या नऊ वर्षाच्या काळात काँग्रेसची अनेक राज्यातून सत्ताही गेली. सध्या मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

Read More
प्रकाश आंबेडकर यांचं सर्वात मोठं विधान; उद्या काँग्रेस आणि वंचित…

प्रकाश आंबेडकर यांचं सर्वात मोठं विधान; उद्या काँग्रेस आणि वंचित…

आचारसंहिता असतानाही केंद्र सरकारने त्याचे उल्लंघन केले आहे. इथेनॉलवरील बंदी हटवली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये 20 टक्के इथेनॉल वापरायची परवानगी काही वर्षांपूर्वी देण्यात आली होती. पण साखरेचे उत्पादन कमी होईल या नावाखाली इथेनॉल तयार करण्याची परवानगी काही जणांना देण्यात आली होती. याचे राजकारण आम्ही इचलकरंजी येथील सभेत मांडल्यानंतर त्याचा परिणाम आता दिसायला लागला असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

मुंबईतून सर्वात मोठी बातमी ! पूनम महाजन यांचा पत्ता कट; उज्ज्वल निकम भाजपचे उमेदवार

मुंबईतून सर्वात मोठी बातमी ! पूनम महाजन यांचा पत्ता कट; उज्ज्वल निकम भाजपचे उमेदवार

भाजपच्या नेत्या आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांचा भाजपने अखेर पत्ता कट केला. पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या ऐवजी भाजपने प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पूनम महाजन यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

पाच किलो रेशन दिलं, चांगलं झालं, पण… प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारवर जोरदार हल्ला

पाच किलो रेशन दिलं, चांगलं झालं, पण… प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारवर जोरदार हल्ला

बेरोजगारीच नव्हे तर महागाई खूप वाढली आहे. तुम्ही समाजाचा बोजा उचलता. तुम्हाला संसार सांभाळावा लागतो. तुम्ही नोकरी करता, शेती करता. समाजात किंवा कुटुंबात संकट आलं तर तुम्ही त्याग करता. तुम्ही बचत केलेल्या पैशातून काही ना काही खरेदी करता. पण या सरकारने महागाई इतकी करून ठेवलीय की तुम्हाला या गोष्टी घेणंही कठिण जात आहे, असं काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या.

महाराष्ट्र काँग्रेस उद्या ठाकरे गटात विलिन झाली तर आश्चर्य नको; काँग्रेसच्या बंडखोर नेत्याचं मोठं विधान

महाराष्ट्र काँग्रेस उद्या ठाकरे गटात विलिन झाली तर आश्चर्य नको; काँग्रेसच्या बंडखोर नेत्याचं मोठं विधान

काँग्रेसने पहिल्यांदाच राज्यात एकाही मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे मुस्लिम समाजात प्रचंड नाराजी असल्याचं सांगत काँग्रेस नेते नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रचार समितीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेसच्या एकाही उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी समजूत काढल्यानंतरही नसीम खान आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?; नसीम खान यांनी थेटच सांगितलं

एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?; नसीम खान यांनी थेटच सांगितलं

वर्षा गायकवाड माझी बहीण आहे. त्यांना माझा विरोध नाही. माझ्या कोणत्याही उमेदवाराला विरोध नाही. पक्षाने राज्यात कुठे तरी एक तरी अल्पसंख्याक उमेदवार द्यायला हवा होता. त्याबद्दल लोक मला विचारत आहेत. मी समाजाला काय उत्तर द्यावं हा माझ्या समोर प्रश्न आहे, असं काँग्रेस नेते नसीम खान यांनी सांगितलं. नसीम खान हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

काँग्रेसमधील दलाल नेता कोण?; नसीम खान यांचे मोठे गौप्यस्फोट काय?

काँग्रेसमधील दलाल नेता कोण?; नसीम खान यांचे मोठे गौप्यस्फोट काय?

आमचा गांधी, नेहरू परिवारावर विश्वास होता आणि राहणार आहे. त्याच्याशी तडजोड नाही. काही नेते कनिष्ठ पातळीवरचे नेत्यांना चुकीची माहिती देतात. चुकीचा निर्णय घ्यायला भाग पाडत असतात. त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी मी निर्णय घेतला आहे, असं नसीम खान म्हणाले.

विशाल पाटलांना तिकीट न मिळण्याच्या खेळीतील खलनायक जयंत पाटील; बड्या नेत्याचा गंभीर आरोप

विशाल पाटलांना तिकीट न मिळण्याच्या खेळीतील खलनायक जयंत पाटील; बड्या नेत्याचा गंभीर आरोप

Vilasrao Jagtap Allegation on Jayant Patil : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत जो वाद झाला, त्याला जयंत पाटील जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप कुणी केला? वाचा सविस्तर...

महाराष्ट्रातला काँग्रेसचा बडा नेता नाराज, ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॅमेऱ्यासमोर सांगितलं नाराजीचं कारण

महाराष्ट्रातला काँग्रेसचा बडा नेता नाराज, ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॅमेऱ्यासमोर सांगितलं नाराजीचं कारण

"प्रश्न नाराजीचा नाही. पक्ष एखाद्या नेत्याला सांगतं की, या मतदारसंघातून तुम्हाला लढायचं आहे. दोन महिन्यांपूर्वी मला आदेश देण्यात आले होते आणि मी तसं काम करत होतो आणि अचानकपणे मला विश्वासात न घेता दुसरा उमेदवार जाहीर करणे हे योग्य नाही. म्हणून नाराजीपण आहे", अशी प्रतिक्रिया नसीम खान यांनी दिली.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये हाय व्होल्टेज घडामोडी, बड्या नेत्याचा स्टार प्रचारक यादीतून राजीनामा

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये हाय व्होल्टेज घडामोडी, बड्या नेत्याचा स्टार प्रचारक यादीतून राजीनामा

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसकडून मुंबईत वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एका बड्या नेत्याची नाराजी समोर आली आहे. हा बडा नेता संबंधित जागेवर उमेदवारीसाठी इच्छुक होता.

मागच्या जन्मात मी बंगालमध्ये जन्मलो असेल… पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का म्हणाले?

मागच्या जन्मात मी बंगालमध्ये जन्मलो असेल… पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का म्हणाले?

देशभरात दुसऱ्या टप्प्यासाठी जोरदार मतदान होताना दिसत आहे. सकाळीच मतदारांनी मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावला. एकीकडे दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत असतानाच दुसरीकडे तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्या मालदामध्ये प्रचंड मोठ्या सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी टीएमसी आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

भाजपला धक्का देत चार नगरसेवक काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारासोबत

भाजपला धक्का देत चार नगरसेवक काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारासोबत

Lok Sabha Election 2024 News in Marathi: मिरजेतील भाजपच्या नगरसेवकांकडून विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये सहभाग घेतला होता. यामुळे भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षांकडून संबंधित चार नगरसेवकांवर कारवाईचा प्रस्ताव प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आला. मात्र कारवाईच्या आधीच भाजपचे बंडखोर नगरसेवक संदीप आवटे, निरंजना आवटी, आनंदा देव माने आणि शिवाजी दुर्वे यांनी आपल्या भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

काँग्रेसची मोठी घोषणा, वर्षा गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर

काँग्रेसची मोठी घोषणा, वर्षा गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर

काँग्रेसकडून आज मोठी घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे भाजपकडून या मतदारसंघात उमेदवाराची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

तीन पक्षाची आघाडी करावी लागली अन् त्याची चूक… सांगलीबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान

तीन पक्षाची आघाडी करावी लागली अन् त्याची चूक… सांगलीबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान

राज्यात अलिकडे जे काही बंड घडलं त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. मोदी आणि अमित शाह यांचा या सर्व बंडांना राजाश्रय होता. हा सर्वात मोठा राजकीय भ्रष्टाचार होता. पक्ष फोडाफोडीमध्ये साम दाम दंड भेद वापरले, असा हल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. सांगलीमध्ये बोलत असताना त्यांनी ही टीका केली.

मंगळसूत्र ते भेट मिळालेली संपत्ती; स्त्री-धनात या गोष्टींचा होतो समावेश, काय आहेत अधिकार

मंगळसूत्र ते भेट मिळालेली संपत्ती; स्त्री-धनात या गोष्टींचा होतो समावेश, काय आहेत अधिकार

Lok Sabha Election 2024 : काँग्रेस सत्तेत आली तर महिलांचे मंगळसूत्र सुद्धा ठेवणार नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील निवडणूक सभेत केला होता. या वक्तव्यावरुन विरोधकांनी पण पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, काय असते स्त्रीधन? अविवाहित महिलांचे काय असतात अधिकार?

सोलापुरात राहुल गांधींची जाहीर सभा; म्हणाले, मी तुम्हाला शब्द देतो की…

सोलापुरात राहुल गांधींची जाहीर सभा; म्हणाले, मी तुम्हाला शब्द देतो की…

Congress Leader Rahul Gandhi Solapur Sabha for Loksabha Election 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सोलापुरात आज सभा होत आहे. या सभेला संबोधित करताना राहुल गांधी विविध मुद्द्यांवर भाष्य करत आहेत. भाजपवर त्यांनी जोरदार टीका केली. राहुल गांधींच्या सभेतील महत्वाचे मुद्दे, वाचा...

सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.