काँग्रेस
भारतातील सर्वात जुना आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला पक्ष म्हणजे काँग्रेस (Congress). काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885मध्ये झाली. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेस सर्वात पुढे होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्याग केला. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. नेहरुंनी देशाच्या विकासाचा पाया रोवला. देश आधुनिकतेकडे जाण्याचं सर्व श्रेय नेहरूंना जातं. नेहरुंनीच देशाला वैज्ञानिक दृष्टीकोणही दिला. स्वातंत्र्यापासून 2014पर्यंत काँग्रेसने 16 लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यातील सहा निवडणुकांमध्ये काँग्रेसने पूर्ण बहुमत मिळालं. तर, चारवेळा मित्र पक्षांना सोबत घेऊन काँग्रेसने केंद्रात सत्ता स्थापन केली. म्हणजे काँग्रेस तब्बल 49 वर्ष या ना त्या कारणाने सत्तेत राहिली. काँग्रेसने देशाला आतापर्यंत सात पंतप्रधान दिले आहेत. जवाहरलाल नेहरू (1947-64), लाल बहादूर शास्त्री (1964-66), इंदिरा गांधी (1966-77,1980-84), राजीव गांधी (1984-89), पी.व्ही. नरसिंह राव (1991-96) आणि मनमोहन सिंग (2004-2014) आदी पंतप्रधान काँग्रेसने दिले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचंड मोठा पराभव झाला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसची ही सर्वात खराब कामगिरी होती. 2014च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या 543 जागांपैकी केवळ 44 जांगावरच काँग्रेस विजयी झाली. 2019मध्येही काँग्रेसला फार मोठं यश आलं नाही. या नऊ वर्षाच्या काळात काँग्रेसची अनेक राज्यातून सत्ताही गेली. सध्या मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
Sanjay Raut: उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेयत…संजय राऊतांचा गर्भित इशारा कुणाला? महाविकास आघाडीला ‘मनसे’ भगदाड पडणार?
Sanjay Raut on Mahavikas Aaghadi: राजकारण नेहमी 'बिटवीन द लाईन्स' वाचवं असा धुरणींचा सल्ला असतो. तो वाचता आला तर भविष्यातील नांदी अचूक टिपता येतात, असा सर्वसाधारण समज आहे. आता संजय राऊतांनी आजारापणातून आल्या आल्या भाजपसह मित्रपक्षांनाही का शिंगावर घेतले, याचा संभ्रमही लवकरच दूर होईल. तुर्तास त्यांच्या विधानाकडं गंमत म्हणून बघता येणार नाही, इतकंच.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 13, 2025
- 11:29 am
Sanjay Raut: काँग्रेसने कितीही आपटली तरी…वेगळ्या विदर्भावरून संजय राऊतांची सणसणीत चपराक, आजारपणातून बाहेर येताच धडाडली तोफ
Sanjay Raut on Congress: आजारपणातून बाहेर पडताच खासदार संजय राऊत यांची तोफ धडाडली. वेगळ्या विदर्भावरून त्यांनी भाजपवर निशाणा साधतानाच महाविकास आघाडीतील काँग्रेसला सणसणीत चपराक लगावली.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 13, 2025
- 11:20 am
Vijay Wadettiwar : वडेट्टीवार सलग दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्या जरा…
नागपूर अधिवेशनात विजय वडेट्टीवार यांनी सोयाबीन खरेदीतील गैरव्यवहारावर सरकारला धारेवर धरले. ९% आर्द्रता असूनही शेतकऱ्यांचे सोयाबीन नाकारले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. बीड येथील अखिल नावाच्या व्यक्तीकडून प्रत्येक सेंटर मंजुरीसाठी ४ लाख रुपये घेतल्याचा दावा करत, वडेट्टीवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 12, 2025
- 4:13 pm
Shivraj Patil Passes Away : माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी लातूरमधील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. खासदार, राज्यपाल यांसारखी अनेक महत्त्वाची पदे भूषवत त्यांनी काँग्रेस पक्षात मोठे योगदान दिले होते.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 12, 2025
- 11:50 am
Maharashtra Winter Session : डोळे फुटले नाही आमचे, विजय वडेट्टीवार सभागृहातच भडकले, अधिवशनादरम्यान नेमकं घडलं काय?
नागपूर हिवाळी अधिवेशनात सोयाबीन आणि कापूस खरेदीच्या हमीभावावरून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आक्रमक झाले. सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीच्या आकडेवारीवरून ठाकरे गटाचे अंबादास दानवे आणि मुख्यमंत्री कार्यालयात वाद निर्माण झाला, जिथे निधी वितरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 12, 2025
- 11:07 am
Shivraj Patil Chakurkar: ती एक चूक भोवली…नाहीतर मराठी माणूस देशाच्या पंतप्रधान पदी, शिवराज पाटील चाकुरकर यांच्या अनेक आठवणी ताज्या
Shivraj Patil Chakurkar Passed Away: शिवराज पाटील चाकुरकर हे राजबिंड आणि काँग्रेसमधील पहिल्या फळीतील नेते होते. सुसंस्कृत, शालीन राजकारण्यांच्या पिढीतील ते नेते होते. मुंबई 26/11 हल्ल्यावेळी त्यांची एक चूक समोर आली आणि त्यांचं अख्ख राजकीय करिअरच पणाला लागलं.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 12, 2025
- 10:00 am
एका दगडात दोन पक्षी! एकनाथ शिंदेंकडून काँग्रेस, ठाकरेंना मोठा धक्का; असंख्य पदाधिकाऱ्यांचा शिवसेवेत प्रवेश
Shivsena : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. या दोन्ही पक्षाच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 11, 2025
- 9:49 pm
Praful Patel Meets PM Modi : प्रफुल्ल पटेल यांनी घेतली मोदींची भेट अन् महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून, या भेटीला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे महत्त्व दिले जात आहे. शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीनंतर ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. ही भेट महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे सूत्रांकडून समजते.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 11, 2025
- 5:22 pm
सावरकर पुरस्कार घेणार नाही, कोणत्याही कार्यक्रमाला जाणार नाही, शशी थरूर यांचं मोठं विधान; का म्हणाले असं?
Shashi Tharoor : काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाने असलेला पुरस्कार स्वीकारणार नाही अशी माहिती दिली आहे. असा पुरस्कार का स्वीकारणार नाही याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 10, 2025
- 5:35 pm
Assembly Seating Row: आमच्यावर अन्याय का? विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद
महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आसन व्यवस्थेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने आपल्या ज्येष्ठ आमदारांना कनिष्ठ आमदारांच्या मागे बसवल्याबद्दल आक्षेप घेतला होता. यानंतर जागा बदलल्यावर उद्धव ठाकरे गटाने अन्याय झाल्याची तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 10, 2025
- 12:57 pm
‘500 कोटी द्या अन् मुख्यमंत्रीपद मिळवा’, माजी मंत्र्याच्या विधानाने संपूर्ण देशात खळबळ
Navjot Kaur Sidhu : पंजाब सरकारमधील माजी मंत्री नवज्योत कौर सिद्धू यांच्या एका विधानाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री बनण्यासाठी 500 कोटी रुपये लागतात असं कौर यांनी म्हटल्याने आता काँग्रेसवर टीका होताना दिसत आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 8, 2025
- 7:21 pm
Assembly Winter Session 2025: हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात बघा काय-काय घडलं?
महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनात नाना पटोले यांनी विदर्भासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. मागील कमी कालावधीच्या अधिवेशनांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सभागृहात माजी आमदार आणि मंत्र्यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्तावही सादर करण्यात आला. यात कैलासवासी शिवाजीराव करडीले आणि महादेवराव शिवणकर यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 8, 2025
- 2:09 pm