काँग्रेस
भारतातील सर्वात जुना आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला पक्ष म्हणजे काँग्रेस (Congress). काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885मध्ये झाली. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेस सर्वात पुढे होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्याग केला. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. नेहरुंनी देशाच्या विकासाचा पाया रोवला. देश आधुनिकतेकडे जाण्याचं सर्व श्रेय नेहरूंना जातं. नेहरुंनीच देशाला वैज्ञानिक दृष्टीकोणही दिला. स्वातंत्र्यापासून 2014पर्यंत काँग्रेसने 16 लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यातील सहा निवडणुकांमध्ये काँग्रेसने पूर्ण बहुमत मिळालं. तर, चारवेळा मित्र पक्षांना सोबत घेऊन काँग्रेसने केंद्रात सत्ता स्थापन केली. म्हणजे काँग्रेस तब्बल 49 वर्ष या ना त्या कारणाने सत्तेत राहिली. काँग्रेसने देशाला आतापर्यंत सात पंतप्रधान दिले आहेत. जवाहरलाल नेहरू (1947-64), लाल बहादूर शास्त्री (1964-66), इंदिरा गांधी (1966-77,1980-84), राजीव गांधी (1984-89), पी.व्ही. नरसिंह राव (1991-96) आणि मनमोहन सिंग (2004-2014) आदी पंतप्रधान काँग्रेसने दिले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचंड मोठा पराभव झाला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसची ही सर्वात खराब कामगिरी होती. 2014च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या 543 जागांपैकी केवळ 44 जांगावरच काँग्रेस विजयी झाली. 2019मध्येही काँग्रेसला फार मोठं यश आलं नाही. या नऊ वर्षाच्या काळात काँग्रेसची अनेक राज्यातून सत्ताही गेली. सध्या मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
Vijay Wadettiwar | मुंबई महापालिकेतील निधी वाटपावरून वाद; महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
मुंबई महानगरपालिकेतील विकास निधीच्या वाटपावरून राजकारण तापले असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी आरोप केला की, विकास निधीच्या वाटपात मोठी तफावत दिसून येत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ठाकरे गटाच्या नगरसेवकांना केवळ 2 लाख रुपयांचा निधी दिला जात आहे. तर शिंदे गटाच्या नगरसेवकांना 20 कोटी, 50 लाख, 25 लाख अशा मोठ्या रकमा दिल्या जात आहेत. “यालाच समतोल विकास म्हणायचं का?
- Harshada Gaikwad
- Updated on: Apr 10, 2026
- 10:36 am
Maharashtra News LIVE : नाशिक धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणाची सुनावणी इनकॅमेरा होणार
Maharashtra News LIVE Updates: दोन्ही राष्ट्रवादीची शिष्टाई काल कामी आली. काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून उमेदवारी मागे घेतली. पण ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. भोंदू खरात याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Apr 10, 2026
- 8:45 pm
Jay Pawar | बारामती पोटनिवडणूक: काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतल्यानंतर महायुतीसाठी लढत सोपी झाली असली, तरी ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसत आहे. कारण एकूण 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 30 जणांनी माघार घेतली असली तरी अजूनही 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
- Harshada Gaikwad
- Updated on: Apr 9, 2026
- 4:19 pm
Baramati News | ‘मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव…’ आकाश मोरे काय म्हणाले?
काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली होती. यावेळी आकाश मोरे यांनी भावनिक वक्तव्य केलं.ते नेमंक काय म्हणाले?
- प्रिती वेद
- Updated on: Apr 9, 2026
- 3:34 pm
Harshwardhan Sapkal On Baramati Election | बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग मोकळा
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने अखेर उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दुपारी गांधी भवन येथे पत्रकार परिषद घेऊन आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेतल्याची अधिकृत घोषणा केली. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Apr 9, 2026
- 3:30 pm
Vijay Wadettiwar | बारामती पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट; काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेणार, सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी काँग्रेसकडे निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन करून ही मागणी पुन्हा व्यक्त केली.
- Harshada Gaikwad
- Updated on: Apr 9, 2026
- 12:49 pm
Baramati Election | बारामतीतून उमेदवारी अर्ज मागे घ्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपकाळांना फोन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचाली जोर धरत आहेत. सर्व पक्ष बिनविरोध निवडणूक व्हावी, अशी भूमिका मांडत असताना, भाजपनेही या मागणीला पाठिंबा दिला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना थेट फोन करून सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसकडून उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती केली आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Apr 9, 2026
- 12:30 pm
Harshwardhan Sapkal | सरकार मुकं, बहिरं आणि आंधळं आहे कारण…., ‘या’ मुद्यावरुन सपकाळांनी सरकारला खूपच सुनावलं
बारामतीतील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अजित पवारांच्या अपघाताच्या FIR बाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
- प्रिती वेद
- Updated on: Apr 9, 2026
- 11:54 am
Harshwardhan Sapkal | बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची ठाम भूमिका; भाजपला बिनविरोध शब्दाचा एवढा पुळका?…. सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल
निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट भूमिका घेत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्रात गुन्हा दाखल करण्याची अट ठेवली आहे. “ही अट चुकीची नाही, उलट तिची गरजच नव्हती,” असे त्यांनी सांगितले. सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका करत निवडणुकीपूर्वी संवाद साधला नसल्याचा आरोप केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी निशाणा साधत अपघाताच्या चौकशीबाबत सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
- Harshada Gaikwad
- Updated on: Apr 9, 2026
- 11:46 am
Baramati ByElection : सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार का? माघारीवर वेट अँड वॉच; हर्षवर्धन सपकाळ यांच्या संकेताचा अर्थ काय?
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीला अनपेक्षित वळण मिळाले आहे. सुनेत्रा पवारांची उमेदवारी बिनविरोध अपेक्षित असताना, काँग्रेसने आकाश मोरे यांना उभे करून नवा पेच निर्माण केला. उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाची 'वेट अँड वॉच' भूमिका स्पष्ट केली. यामुळे आता काँग्रेसच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- manasi mande
- Updated on: Apr 9, 2026
- 11:46 am
Sanjay Raut: कर नाही त्याला डर कशाला? संजय राऊतांचे भाजपला ओपन चॅलेंज, अजितदादांच्या अपघाती मृत्यूसंदर्भात तो आरोप काय?
Sanjay Raut: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पडद्याआड मोठी घाडमोड सुरू आहे. त्याचवेळी अजितदादांच्या विमान अपघातात गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेससह आता संजय राऊत यांनीही दबाव वाढवला आहे. राऊतांनी भाजपला ओपन चॅलेंज दिले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Apr 9, 2026
- 11:19 am
Nana Patole | बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा निर्णय निर्णायक ठरणार; पक्ष जो निर्णय घेईल तो सर्वांना….. नाना पटोलेंची भूमिका काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार रिंगणात असताना काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्याने ही लढत चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विविध पक्षांकडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवार जाहीर केल्याने इतर पक्षांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Apr 9, 2026
- 11:05 am