काँग्रेस
भारतातील सर्वात जुना आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला पक्ष म्हणजे काँग्रेस (Congress). काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885मध्ये झाली. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेस सर्वात पुढे होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्याग केला. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. नेहरुंनी देशाच्या विकासाचा पाया रोवला. देश आधुनिकतेकडे जाण्याचं सर्व श्रेय नेहरूंना जातं. नेहरुंनीच देशाला वैज्ञानिक दृष्टीकोणही दिला. स्वातंत्र्यापासून 2014पर्यंत काँग्रेसने 16 लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यातील सहा निवडणुकांमध्ये काँग्रेसने पूर्ण बहुमत मिळालं. तर, चारवेळा मित्र पक्षांना सोबत घेऊन काँग्रेसने केंद्रात सत्ता स्थापन केली. म्हणजे काँग्रेस तब्बल 49 वर्ष या ना त्या कारणाने सत्तेत राहिली. काँग्रेसने देशाला आतापर्यंत सात पंतप्रधान दिले आहेत. जवाहरलाल नेहरू (1947-64), लाल बहादूर शास्त्री (1964-66), इंदिरा गांधी (1966-77,1980-84), राजीव गांधी (1984-89), पी.व्ही. नरसिंह राव (1991-96) आणि मनमोहन सिंग (2004-2014) आदी पंतप्रधान काँग्रेसने दिले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचंड मोठा पराभव झाला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसची ही सर्वात खराब कामगिरी होती. 2014च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या 543 जागांपैकी केवळ 44 जांगावरच काँग्रेस विजयी झाली. 2019मध्येही काँग्रेसला फार मोठं यश आलं नाही. या नऊ वर्षाच्या काळात काँग्रेसची अनेक राज्यातून सत्ताही गेली. सध्या मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची मोठी तयारी, जागावाटपासाठी समिती केली स्थापन
आगामी विधानसभेसाठी राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच घटकपक्ष आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याची व्यूहरचना आखत आहेत.
- Mahesh Pawar
- Updated on: Jul 26, 2024
- 10:14 pm
कंगनाचा संसदेतील पहिल्याच भाषणात सिक्सर, असं काय म्हणाली की ज्यामुळे गोंधळ झाला?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मी आभार मानते. त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात हिमाचल प्रदेशासाठी विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. त्यामुळे आम्ही सर्व हिमाचल प्रदेशातील लोक निर्मला सीतारामन यांचं आभार मानतो. गेल्या दहा वर्षात भाजपने हिमाचल प्रदेशात जेवढं काम केलंय, तेवढं काम गेल्या साठ वर्षात हिमाचलमध्ये झालं नाही, असं कंगना रणौत यांनी सांगितलं.
- भीमराव गवळी
- Updated on: Jul 26, 2024
- 5:57 pm
Agniveer Yojana : अग्निवीर योजनेवरील विरोधकांच्या आरोपांना उत्तर सडेतोड; अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडले मौन, म्हणाले…
Agnipath Scheme : कारगिल विजय दिवसाच्या कार्यक्रमात अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्निवीर योजनेवर मौन सोडले. लोकसभा निवडणुकीत अग्निवीर योजनेवरुन विरोधकांनी सरकारला घेरले होते. या योजनेवर अनेकदा टीकेची झोड उठली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 26, 2024
- 2:37 pm
‘माझ्या जीवाचं काहीही झालं तरी…’; काँग्रेस आमदार संग्राम थोपटे असं का म्हणाले?
"माझ्या वडिलांनी आणि या तालुक्यातल्या जनतेने हा कारखाना उभा केलेला आहे. तो मोडकळीला आला तर मला बघवणार नाही. आजपर्यंत मी तळ हाताच्या फोडाप्रमाणे हा कारखाना जपण्याचं काम केलेलं आहे", असं आमदार संग्राम थोपटे म्हणाले.
- Reporter Vinay Jagtap
- Updated on: Jul 26, 2024
- 12:18 am
महायुतीविरोधात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा अजेंडा काय? विजय वडेट्टीवार म्हणाले…
आगामी विधानसभा निवडणुका या वैचारिक दृष्टीने लढल्या जातात. निवडणुकीसाठी राज्यातील मूलभूत प्रश्न आहेत. लोकसभा निवडणूक आम्ही संविधानासाठी लढलो. आता आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणार आहोत.
- Mahesh Pawar
- Updated on: Jul 25, 2024
- 9:58 pm
कोणाला हव्यात किती जागा? महायुतीत मोठी खलबतं, विधानसभेसाठी अजितदादांचे गणित तरी काय?
Maharashatra Assembly Seats : महायुतीची चारचाकी सध्या विविध योजनांच्या घोषणेनंतर सुसाट आहे. विधानसभेसाठी तीनही घटक पक्षांनी कंबर कसली आहे. जागा वाटपात आता लोकसभेसारखी स्थिती येऊ नये, यासाठी अजितदादा आणि शिंदे सेना अलर्ट मोडवर आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 25, 2024
- 4:26 pm
राहुल गांधी हाजीर हो!!! अमित शाह यांच्यावर वादग्रस्त टिप्पणीवर कोर्टाने दिले आदेश
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात सुलतानपूरच्या खासदार आमदार न्यायालयात 2 जुलै रोजी हजर होणार होते. मात्र, राहुल गांधी यांच्या वकिलाने संसदेत व्यस्त असल्याचे कारण दिले होते. न्यायालयाने त्यांचे म्हणणे मान्य करत आता 26 जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
- Mahesh Pawar
- Updated on: Jul 24, 2024
- 9:45 pm
आशिष शेलार यांच्या समर्थकाचा भाजपच्याच अदृश्य शक्तीमुळे पराभव? कसं घडलं MCA अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीचे राजकारण?
आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबई क्रिकेटचे असलेले महत्त्व, वानखेडे स्टेडीयम आणि वलय यामुळे भाजप नेते आशिष शेलार यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनवर आपले वर्चस्व राहावे असे वाटत होते. पण महाराष्ट्र भाजपमधील अदृश्य शक्ती आणि आशिष शेलार यांच्यातील सुप्त राजकीय संघर्षामुळे निवडणुकीच्या डावपेचाच्या पुढील गुप्त घटना घडल्या.
- Reporter Dinesh Dukhande
- Updated on: Jul 23, 2024
- 10:10 pm
Congress Budget 2024 : ही तर आमचीच स्कीम, तीच केंद्राने पळवली; बजेटमधील या योजनेवरुन काँग्रेसने असा काढला चिमटा
PM Internship Scheme : पंतप्रधान मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिले आर्थिक बजेट सादर झाले. यातील एका योजनेवर काँग्रेसने आनंद व्यक्त केला आहे. ही योजना काँग्रेसच्या जाहीरनाम्यात होती, ती केंद्राने स्वीकारल्याचा चिमटा काँग्रेसने काढला.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 23, 2024
- 3:46 pm
आता बिनधास्त जा संघाच्या शाखेत, सरकारी कर्मचाऱ्यांचा 58 वर्षांपूर्वीचा निर्बंध काढला
संघाने कधी नागपूरमध्ये राष्ट्रध्वज फडकवला नाही. यामुळे संघात जाण्यास सरकारी कर्मचाऱ्यांवर 1966 मध्ये निर्बंध आणण्यात आले. 4 जून 2024 रोजी संघ आणि नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधान यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. यामुळे 9 जुलै 2024 रोजी 58 वर्षांपूर्वीपासून असलेले निर्बंध काढण्यात आले आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Jul 22, 2024
- 9:22 am
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसची मोठी मागणी, वादळी अधिवेशनाचे संकेत
सोमवार 22 जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरवात होत आहे. त्याआधी सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसने एक मोठी मागणी केली आहे. तसेच, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या आणि NEET पेपर लीक या सारख्या मुद्द्यांवर व्यापक चर्चा व्हायला हवी असे मत व्यक्त केले आहे.
- Mahesh Pawar
- Updated on: Jul 21, 2024
- 9:56 pm
प्रदेश कार्यकारिणी बरखास्त, काँग्रेसने घेतला मोठा निर्णय, नवीन जबाबदारी कुणाकडे?
लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात पक्षाला नव्याने उभारी देण्याचे काम करता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
- Mahesh Pawar
- Updated on: Jul 21, 2024
- 9:08 pm
काँग्रेस आमदाराला ईडीचा मोठा धक्का, 1392 कोटींना गंडवले, 1.42 कोटी रोकड, 32 बेनामी फ्लॅट आणि बरेच…
बँक व्यवहार फसवणुकीप्रकरणी ईडीने काँग्रेस आमदारावर मोठी कारवाई केली आहे. तीन दिवस ईडीने या आमदारांची कसून चौकशी केली. या चौकशीअंती आमदारांकडून ईडीने मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती जप्त केली आहे.
- Mahesh Pawar
- Updated on: Jul 21, 2024
- 4:57 pm
Budget 2024 : बिहारविषयीचा अंदाज ठरला खरा, या मागणीसाठी JDU ने लावली ताकद; सर्वपक्षीय बैठकीत काय घडल्या घडामोडी
JDU Bihar : केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत स्थानिक पक्षांनी राज्याच्या विकासावर भर दिला. उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होत आहे. 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बजेट सादर करतील.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 21, 2024
- 2:17 pm
काँग्रेसच्या बैठकीतली Inside Story, मुंबईत बड्या नेत्यांमध्ये खल, काहीतरी मोठं घडण्याचे संकेत?
काँग्रेसची मुंबईत आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत सर्वाधिक जागांवर दावा करणार असल्याचं बैठकीत ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मविआत काही मोठं घडणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कारण ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट समसमान जागावाटपाच्या तयारीत असताना काँग्रेस सर्वाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळत आहे.
- Chetan Patil
- Updated on: Jul 19, 2024
- 4:03 pm