AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाजपात फूट, काँग्रेसचा मोठा दणका, घडामोडींना वेग

काही दिवसांपूर्वीच महापालिका निवडणुकांचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता, अजूनही काही ठिकाणी महापौरपदाची निवडणूक बाकी आहे, या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! भाजपात फूट, काँग्रेसचा मोठा दणका, घडामोडींना वेग
भाजपला मोठा धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 19, 2026 | 3:11 PM
Share

काही दिवसांपूर्वीच महापालिका निवडणुकांचा निकाल लागला, या निवडणुकीत भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र जरी भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील अनेक महापालिकांमध्ये अशी स्थिती होती की भाजपला स्पष्ट बहुमत नव्हते, महापालिकेत पक्षाचा महापौर बसवण्यासाठी त्यांना मित्र पक्षाची मदत घ्यावी लागली, चंद्रपूरमध्ये तर शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला, त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि चंद्रपूर महापालिकेत भाजपचा माहापौर झाला.  आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे.

भिवंडी महापालिकेत येत्या 20 तारखेला महापौरपदाची निवडणूक होणार आहे. या महापालिकेत देखील कोणाकडेही बहुमत नाही, इथे काँग्रेसकडे 30 नगरसेवक आहेत, तर भाजपाकडे 22 आणि राष्ट्रवादी तसेच शिवसेनेकडे प्रत्येकी 12 नगरसेवक आहेत. अशा स्थितीमध्ये भिवंडीमध्ये आपल्याच पक्षाचा महापौर व्हावा यासाठी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरस पहायला मिळत आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार आता भिवंडीमध्ये भाजपात मोठी फूट पडली आहे. समोर आलेल्या माहितीप्रमाणे नारायण चौधरी यांच्या नेतृत्वातील 9 नगरसेवकांचा गट हा काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या तयारीमध्ये आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ? 

जो पर्यंत संख्याबळ नाही तोपर्यंत निवडणूक लावली जात नाही,  भिवंडीत ही असंच पाहायला मिळालं. भिवंडीत आम्ही निवडणुकांना सामोरं गेलो, इथे सर्वाधिक जागा काँग्रेसच्या निवडून आल्या आहेत. आम्हाला बहुमतासाठी 16  जागा कमी पडल्या आहेत. त्यामुळे आम्ही तिथे आता सेक्युलर फ्रंट सुरू केली आहे. यामध्ये आम्हाला राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाठिंबा दिला, त्यांचे बारा नगरसेवक असल्यामुळे आता आमची संख्या 42 झाली आहे,  त्यानंतर आम्ही अपक्ष उमेदवारांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला मात्र कोंडी काही फुटत नाहीये. आम्ही भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांचा पाठिंबा घेणार नाही, ही आमची भूमिका होती. भाजप सोडून जर कोणी येत असेल तर आम्ही चर्चा कराया तयार आहोत, नारायण चौधरी हे आधी कांग्रेस पक्षाचे होते,  ⁠ते भाजपमध्ये गेले होते,  ⁠ते आता सेक्युलर फ्रंटमध्ये आले आहेत, ते 9 नगरसेवकांना घेऊन आले आहेत, असं यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला होता, त्यामुळे काँग्रेसकडून या नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली होती, त्यांनंतर या सर्व नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र आता भिवंडीमध्ये भाजपचे 9 नगरसेवक हे काँग्रेसला पाठिंबा देणार आहेत.

अजित दादांच्या अपघातावर मुलाची शंका, थेट पोस्ट करत केला सवाल
अजित दादांच्या अपघातावर मुलाची शंका, थेट पोस्ट करत केला सवाल.
धाराशिवमध्ये तानाजी सावंत-एकनाथ शिंदेंच्या भेटीत नेमकं काय घडलं?
धाराशिवमध्ये तानाजी सावंत-एकनाथ शिंदेंच्या भेटीत नेमकं काय घडलं?.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली मुंबई आम्हाला घडवायची आहे
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली मुंबई आम्हाला घडवायची आहे.
आठवड्याभरानंतर तेजस ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज
आठवड्याभरानंतर तेजस ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज.
नाशिकमध्ये शिवजयंतीचा जल्लोष; पंचवटीत अश्वारूढ पुतळ्याला फुलसजावट
नाशिकमध्ये शिवजयंतीचा जल्लोष; पंचवटीत अश्वारूढ पुतळ्याला फुलसजावट.
विमान अपघातावर सर्वच शंका व्यक्त करताय! आदित्य ठाकरेंचं वक्तव्य
विमान अपघातावर सर्वच शंका व्यक्त करताय! आदित्य ठाकरेंचं वक्तव्य.
आदित्य ठाकरे शिवाजी पार्कत दाखल, राज ठाकरे करणार परिसराची पाहाणी
आदित्य ठाकरे शिवाजी पार्कत दाखल, राज ठाकरे करणार परिसराची पाहाणी.
माझ्या नादाला लागू नको! जरांगेंचा नाव न घेता धनंजय मुंडेंना इशारा
माझ्या नादाला लागू नको! जरांगेंचा नाव न घेता धनंजय मुंडेंना इशारा.
रोहित पवारांच्या सुरक्षेचा आढावा घ्यावा; सुप्रिया सुळेंची मागणी
रोहित पवारांच्या सुरक्षेचा आढावा घ्यावा; सुप्रिया सुळेंची मागणी.
दहिसरहून गुंदवलीला जात असताना मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड
दहिसरहून गुंदवलीला जात असताना मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड.