भाजप
भारतीय जनता पार्टी हा देशातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून 2014 पासून केंद्रात सत्तेत आहे. त्याशिवाय देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे. 1980मध्ये भाजपची स्थापना झाली. 1984मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या केवळ दोनच जागा निवडून आल्या. त्यानंतर राम मंदिर आंदोलन सुरू झालं. त्यामुळे भाजपला नवी उभारी मिळाली. 1996मध्ये राम मंदिर आंदोलनामुळे भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएची स्थापना झाली. त्यानंतर 2004 पर्यंत भाजप सत्तेत राहिली. नंतर दहा वर्ष भाजप सत्तेपासून दूर होती. पण मुख्य विरोधी पक्ष भाजपच होता. 2014ची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवण्यात आली. या निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळालं. मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतरही 2019च्या निवडणुकीत भाजपने मोठं यश संपादन करून सत्ता मिळवली. केंद्रातील सत्ता काळात भाजपने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. नोटाबंदी, जीएसटी लागू करणे, पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवणे आणि तीन तलाकबाबतचे निर्णय भाजपने घेतले.
Sunil Tatkare -Ravindra Chavan Meet | रवींद्र चव्हाण-सुनील तटकरे यांच्यात बैठक, नेमकं कारण काय? मोठी माहिती समोर!
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत तटकरे यांनी माध्यमांशी माहिती दिली. तटकरे म्हणाले की, राज्यभरात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती म्हणून पुढील वाटचाल कशी करायची, यावर चर्चा करण्यात आली.
- Harshada Gaikwad
- Updated on: Feb 17, 2026
- 6:00 pm
Navnath Ban Press | मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी पोस्टरबाजी, राऊत आणि भाजपमध्ये जुंपली; कुणी काय केली टीका?
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत दौऱ्याची सुरुवात आज मुंबईतून झाली असून त्यांच्या स्वागतासाठी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून शहरात जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना टीका केली, “मॅक्रॉन यांना स्वीकृत नगरसेवक करायचं आहे का? हा सगळा वेड्यांचा बाजार आहे. या लोकांची वेड्यांची जत्रा भरली आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली.
- Harshada Gaikwad
- Updated on: Feb 17, 2026
- 3:46 pm
नाव ओढलं तर गप्प बसणार नाही..; भाजप प्रमुखांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, अखेर मागावी लागली माफी
अभिनेत्रीने रोखठोक भूमिका घेतल्यानंतर अखेर भाजप प्रमुखांना जाहीर माफी मागावी लागली. मला माझ्या वक्तव्याचा पश्चात्ताप असून मी माफी मागतो, असं ते म्हणाले आहेत. उच्च पदावर असलेल्यांनी त्यांचे शब्द काळजीपूर्वक निवडावेत, असं ती म्हणाली.
- स्वाती वेमूल
- Updated on: Feb 17, 2026
- 3:39 pm
Sanjay Raut | फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना स्वीकृत नगरसेवक करायचे आहे काय?; पोस्टरबाजीवरून संजय राऊतांनी झोडपले
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत दौऱ्याची सुरुवात आज मुंबईतून होत आहे. मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून मुंबईत जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीवर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले.
- Harshada Gaikwad
- Updated on: Feb 17, 2026
- 1:09 pm
Tipu Sultan: मालेगावावरून राज्यात पुन्हा राडा? टिपू सुलतानचा फोटो लावणार? उपमहापौरांच्या त्या निर्णयाने खळबळ
Shaan-E-Hind on Tipu Sultan: गेल्या आठवड्याच्या अखेरीस टिपू सुलतानची तसबीर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याने मोठा राडा झाला. मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांनी आता पुन्हा मोठा निर्णय घेतला आहे. पडद्याआड मोठी घडामोड घडत आहे, काय आहे अपडेट?
- Reporter Manohar Shewale
- Updated on: Feb 17, 2026
- 10:33 am
Maharashtra Political News LIVE : महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला उद्या मुंबई दौऱ्यावर
Live Updates In Marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Feb 17, 2026
- 11:18 pm
Mahayuti | गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय म्हणाले?
दोन दिवसांपूर्वी मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नवी मुंबईतील भूखंडांवरून गंभीर आरोप केले होते. हे भूखंड बिल्डरांच्या फायद्यासाठी देण्यात आल्याचा दावा करत त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपण ज्या मंत्रिमंडळात आहोत, त्याच सरकारमधील नगरविकास खात्याने चुकीचे काम केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच सिडको आणि एमआयडीसीकडून नवी मुंबई महापालिकेला जनतेच्या विकासासाठी देण्यात येणारे भूखंड तात्काळ द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. गणेश नाईक यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Feb 16, 2026
- 5:53 pm
तर वनमंत्रीपद काय कामाचे? शिंदे गट आणि गणेश नाईकांमध्ये जुंपली; अनेक नेत्यांची वादात उडी
Shinde vs Naik : काही दिवसांपूर्वी गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला होता. यानंतर आता शिवसेनेचे नेत गणेश नाईक यांच्यावर टीका करत आहेत.
- बापू गायकवाड
- Updated on: Feb 16, 2026
- 4:38 pm
Mahayuti | महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकर यांची गणेश नाईकावर जोरदार टीका
राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील टीका-टिप्पणी अजूनही सुरू आहे. याप्रकरणी आता रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Feb 16, 2026
- 2:07 pm
Gopichand Padalkar | रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
ऐतिहासिक वास्तू असलेल्या रायगड किल्ल्यावरील होळी माळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह संपूर्ण परिसर अंधारात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रायगडावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान होळी माळ परिसरात पुरेशी लाईट व्यवस्था नसल्याचे आढळून आले.
- Harshada Gaikwad
- Updated on: Feb 16, 2026
- 1:16 pm
Shrikant Shinde | आम्ही उठाव केला नसता तर मंत्रीपद मिळालं नसतं; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना थेट इशारा
2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता, तर आज अनेकांना सत्तेतील स्थान मिळाले नसते. त्यांनी सूचकपणे गणेश नाईक यांचा उल्लेख करत सांगितले की, त्या राजकीय घडामोडींमुळेच काही नेत्यांना मंत्रीपद मिळाले. त्यामुळे आज जे लोक टीका करत आहेत, त्यांनी त्या घडामोडींची आठवण ठेवावी.
- Harshada Gaikwad
- Updated on: Feb 16, 2026
- 12:57 pm
Sanjay Raut | टिपू सुलतान प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या आंदोलनानंतर संजय राऊतांचा पलटवार
महाराष्ट्रात, मुंबईत तसेच अकोल्यात भाजपची सत्ता असताना टिपू सुलतान यांच्या नावाने अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले होते. तसेच, मुंबई महानगरपालिकेत विद्यमान महापौर रितू तावडे आणि अमित साटम यांच्या अनुमोदनाने टिपू सुलतान यांच्या नावाने रस्ते आणि बगीच्यांना नाव देण्यासाठी प्रस्ताव दिला होता, असा दावा राऊत यांनी केला. त्यामुळे भाजपने या प्रकरणात ‘आ बैल मुझे मार’ अशी भूमिका घेऊ नये
- Harshada Gaikwad
- Updated on: Feb 16, 2026
- 11:50 am