भाजप
भारतीय जनता पार्टी हा देशातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून 2014 पासून केंद्रात सत्तेत आहे. त्याशिवाय देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे. 1980मध्ये भाजपची स्थापना झाली. 1984मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या केवळ दोनच जागा निवडून आल्या. त्यानंतर राम मंदिर आंदोलन सुरू झालं. त्यामुळे भाजपला नवी उभारी मिळाली. 1996मध्ये राम मंदिर आंदोलनामुळे भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएची स्थापना झाली. त्यानंतर 2004 पर्यंत भाजप सत्तेत राहिली. नंतर दहा वर्ष भाजप सत्तेपासून दूर होती. पण मुख्य विरोधी पक्ष भाजपच होता. 2014ची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवण्यात आली. या निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळालं. मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतरही 2019च्या निवडणुकीत भाजपने मोठं यश संपादन करून सत्ता मिळवली. केंद्रातील सत्ता काळात भाजपने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. नोटाबंदी, जीएसटी लागू करणे, पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवणे आणि तीन तलाकबाबतचे निर्णय भाजपने घेतले.
आणखी एक मोठे राज्य विभाजनाच्या मार्गावर? पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री यांच्या बैठकीत काय घडलं?
मोदी आणि मंत्री मजुमदार यांच्यात या मागणीवर बराच वेळ विचारमंथन झाले. ईशान्य क्षेत्राच्या विकासाशी संबंधित मंत्रालयाचे मजुमदार राज्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेला प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे.
- Mahesh Pawar
- Updated on: Jul 26, 2024
- 8:07 pm
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठे विधान, दीदी घेणार मोदींची भेट, राजकीय घडामोडींना वेग?
इंडिया आघाडीला पाठींबा देणाऱ्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्ली गाठली आहे. तर, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील बैठकीला उपस्थित रहाणार आहेत. ममता बॅनर्जी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहेत.
- Mahesh Pawar
- Updated on: Jul 26, 2024
- 7:26 pm
चक्क नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण…
भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्यांनी खोचक शब्दांत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणादेखील साधला. नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.
- Chetan Patil
- Updated on: Jul 26, 2024
- 7:25 pm
अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांना टेन्शन देणारं विधान, नारायण राणेंच्या मनात काय?
राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. पण या निवडणुकीच्या आधीच भाजप नेते नारायण राणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नारायण राणे यांचं हे वक्तव्य महायुतीमधील घटक पक्षाचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिंता वाढवणारं आहे.
- Chetan Patil
- Updated on: Jul 26, 2024
- 6:54 pm
भाजपच्या मंत्र्याचा कुणाला इशारा?, काय आहे प्रकरण?; गोव्यात काय घडतंय?
गोव्याच्या राजकारणात सातत्याने काही ना काही घडत असतं. त्यामुळे गोव्याचं राजकारण तापलेलं असतं. सध्या गोवा विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात मोठी खडाजंगी पाहायला मिळत आहे. रोज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चकमक उडताना पाहायला मिळत आहे. पण यावेळी थेट राज्याचे मंत्रीच एका मुद्द्यावरून तापले आहेत.
- टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
- Updated on: Jul 26, 2024
- 6:48 pm
मुख्यमंत्री यांच्याविरोधात बंड? नेत्याचे शक्तीप्रदर्शन, दररोज आमदार आणि मंत्र्यांचा मेळावा
उपमुख्यमंत्री यांच्या घरी दररोज आमदार आणि मंत्र्यांचा मेळावा होत आहे. राज्याशी संबंधित कामातही ते मुख्यमंत्री यांना टॅग करत नाहीत. मात्र, जे आमदार, मंत्री त्यांना भेटण्यासाठी येत आहेत त्यांचे फोटो सेशन होत आहे. पक्षातील किती लोक आपल्यासोबत आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत असा याचा अर्थ आहे.
- Mahesh Pawar
- Updated on: Jul 26, 2024
- 6:24 pm
कंगनाचा संसदेतील पहिल्याच भाषणात सिक्सर, असं काय म्हणाली की ज्यामुळे गोंधळ झाला?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मी आभार मानते. त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात हिमाचल प्रदेशासाठी विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. त्यामुळे आम्ही सर्व हिमाचल प्रदेशातील लोक निर्मला सीतारामन यांचं आभार मानतो. गेल्या दहा वर्षात भाजपने हिमाचल प्रदेशात जेवढं काम केलंय, तेवढं काम गेल्या साठ वर्षात हिमाचलमध्ये झालं नाही, असं कंगना रणौत यांनी सांगितलं.
- भीमराव गवळी
- Updated on: Jul 26, 2024
- 5:57 pm
भाजपने मला बेवकूफ बनवलं, शिवबंधन बांधल्यानंतर माजी आमदाराची जोरदार टीका
भाजपचे माजी आमदार रमेश कुथे यांनी अखेर घरवापसी केली आहे. कुथे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. भाजपमध्ये तिकीट मिळणार नसल्याचा अंदाज आल्याने आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक विधान जिव्हारी लागल्यानेच त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Jul 26, 2024
- 2:32 pm
Agniveer Yojana : अग्निवीर योजनेवरील विरोधकांच्या आरोपांना उत्तर सडेतोड; अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडले मौन, म्हणाले…
Agnipath Scheme : कारगिल विजय दिवसाच्या कार्यक्रमात अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्निवीर योजनेवर मौन सोडले. लोकसभा निवडणुकीत अग्निवीर योजनेवरुन विरोधकांनी सरकारला घेरले होते. या योजनेवर अनेकदा टीकेची झोड उठली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 26, 2024
- 2:37 pm
जळगावच्या सत्ताधारी आमदारांनी मंत्र्यांकडे व्यक्त केली खदखद, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खडाजंगी
आमदार चिमणराव पाटील यांनी सर्व आमदारांना समसमान निधीचे वाटप व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर दुसरीकडे आमदार मंगेश चव्हाण यांनी मंत्र्यांना थेट जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये दिल्या जाणाऱ्या निधीचा मंत्र्यांना हिशोबच मागितला.
- Chetan Patil
- Updated on: Jul 26, 2024
- 1:34 am
“मला दहावीत 36 टक्के, बारावीत 2 विषय नापास झालो, ‘त्याचं’ दु:ख आजही”, गिरीश महाजन यांनी व्यक्त केली खंत
"मला दहावीत 36 टक्के, बारावीत 2 विषय नापास झालो. असं कसंतरी रडत कुढत पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र नोकरी लागली नाही, त्याचं दुःख मला आजही आहे", अशी खंत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.
- Chetan Patil
- Updated on: Jul 26, 2024
- 1:08 am
ऑगस्टपूर्वी मिळणार भाजपला नवीन कार्याध्यक्ष? नड्डा रहाणार सल्लागाराच्या भूमिकेत
नरेंद्र मोदी सरकार 3.0 मध्ये, जेपी नड्डा यांना आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. नवीन राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठीची निवडणूक जानेवारी 2025 पूर्वी होण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत पक्षाने कार्याध्यक्ष नेमण्याची तयारी सुरु केली आहे.
- Mahesh Pawar
- Updated on: Jul 25, 2024
- 11:01 pm
आता लाडकी बायको योजना… फडणवीस यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याचा टोला?
येत्या दोन महिन्यात महाराष्ट्रात टोकाची कटकारस्थान होणार आहेत. वेगवेगळ्या योजनांद्वारे तुमच्यावरती प्रभाव टाकला जाईल. लाडकी भाऊ, बहीण योजनेप्रमाणेच आता लाडके काका, लाडकी काकू याबरोबर लाडकी बायको योजनादेखील आणा
- Mahesh Pawar
- Updated on: Jul 25, 2024
- 9:29 pm
कोणाला हव्यात किती जागा? महायुतीत मोठी खलबतं, विधानसभेसाठी अजितदादांचे गणित तरी काय?
Maharashatra Assembly Seats : महायुतीची चारचाकी सध्या विविध योजनांच्या घोषणेनंतर सुसाट आहे. विधानसभेसाठी तीनही घटक पक्षांनी कंबर कसली आहे. जागा वाटपात आता लोकसभेसारखी स्थिती येऊ नये, यासाठी अजितदादा आणि शिंदे सेना अलर्ट मोडवर आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 25, 2024
- 4:26 pm
…तर मग ते ऑडिओ-व्हिडिओ सार्वजनिक करण्याशिवाय पर्याय नाही ; देवेंद्र फडणवीस यांचा अनिल देशमुख यांना इशारा
Devendra Fadnavis on Anil Deshmukh : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. श्याम मानव यांनी पण हाच मुद्दा उचलून धरला. उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी फडणवीसांनी दबाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 25, 2024
- 9:53 am