भाजप
भारतीय जनता पार्टी हा देशातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून 2014 पासून केंद्रात सत्तेत आहे. त्याशिवाय देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे. 1980मध्ये भाजपची स्थापना झाली. 1984मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या केवळ दोनच जागा निवडून आल्या. त्यानंतर राम मंदिर आंदोलन सुरू झालं. त्यामुळे भाजपला नवी उभारी मिळाली. 1996मध्ये राम मंदिर आंदोलनामुळे भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएची स्थापना झाली. त्यानंतर 2004 पर्यंत भाजप सत्तेत राहिली. नंतर दहा वर्ष भाजप सत्तेपासून दूर होती. पण मुख्य विरोधी पक्ष भाजपच होता. 2014ची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवण्यात आली. या निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळालं. मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतरही 2019च्या निवडणुकीत भाजपने मोठं यश संपादन करून सत्ता मिळवली. केंद्रातील सत्ता काळात भाजपने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. नोटाबंदी, जीएसटी लागू करणे, पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवणे आणि तीन तलाकबाबतचे निर्णय भाजपने घेतले.
भाजपाने डाव टाकला, एकत्र येताच ठाकरे बंधूंना मोठा दणका, अनेकांच्या हाती कमळ
Incoming in BJP : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत युतीची घोषणा केली आहे. एकीकडे युतीची घोषणा होत असताना भाजपाने या दोन्ही पक्षांना मोठा दणका दिला आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 24, 2025
- 7:19 pm
मोठी बातमी! भाजपच्या राज्यातील तीन बड्या नेत्यांविरोधात अटक वॉरंट जारी, न्यायालयाचा मोठा दणका
मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, याचदरम्यान आता भाजपच्या तीन बड्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या असून, न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 24, 2025
- 7:10 pm
Varun Sardesai : ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत हिणवलं; वाद पेटणार?
राज ठाकरे यांनी मनसे-शिवसेना युतीची घोषणा केली आहे. यावर युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली. मुंबईसह इतर महानगरपालिकांमधील जागावाटप लवकरच निश्चित होईल, असे त्यांनी सांगितले. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या टीकेला उत्तर देताना सरदेसाई म्हणाले, अमित साटम एक बाहुली आहेत. प्रत्येकाने आपली पात्रता ओळखावी.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 24, 2025
- 5:58 pm
Mumbai Civic Polls : पालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं, काय झाली चर्चा?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात पाच तास चर्चा होऊन २०० जागांवर सहमती झाली. उर्वरित २७ जागांवर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. महायुती १५० हून अधिक जागा जिंकून आपला महापौर निवडून आणण्याचा संकल्प करत आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 24, 2025
- 5:37 pm
Ashish Shelar : हे बडवे, कारकून कोण? अन् अचानक गळाभेट कशी? ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत शेलार यांचा ठाकरेंना थेट सवाल
आशिष शेलार यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की मराठी माणूस त्यांची मागील भूमिका आणि आताच्या एकत्र येण्यामागील कारण विचारत आहे. मुंबईच्या विकासाऐवजी ही युती केवळ पक्षीय अस्तित्वासाठी आणि सत्तापिपासूपणासाठी असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 24, 2025
- 4:32 pm
BIG Breaking : नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, प्रकरण नेमकं काय?
कुडाळ न्यायालयाने आमदार नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. 26 जून 2021 रोजी सिंधुदुर्गमध्ये झालेल्या ओबीसी आंदोलनात आणि संविधान बचाव आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला होता. नितेश राणे वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांच्या विरोधात थेट वॉरंट काढले.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 24, 2025
- 4:11 pm
Chitra Wagh : ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, ट्विटच्या माध्यमातून टोलेबाजी!
चित्रा वाघ यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर टीका केली आहे. भीतीने त्यांना एका छताखाली आणले, पण भिंतींचे भय अजूनही गेले नाही, असे ट्विट करत त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही टीका महत्त्वाची ठरते.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 24, 2025
- 3:38 pm
Devendra Fadnavis : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले मुंबईकर…
देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीला बाळबोध समजले आहे. त्यांच्या मते, ही युती केवळ अस्तित्व टिकवण्यासाठी असून, मुंबईकरांनी त्यांचा विश्वासघात केल्यामुळे ते त्यांच्यासोबत येणार नाहीत. महायुतीच्या विकासाच्या कामामुळे मुंबईकर महायुतीलाच साथ देतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 24, 2025
- 3:17 pm
Raj Thackeray: राज ठाकरे ट्रेलर नव्हे संपूर्ण पिक्चरच दाखवणार? म्हणाले, देवाभाऊ अल्लाह हाफीज बोलले, माझ्याकडे असंख्य व्हिडीओ…
Raj Thackeray on Devendra Fadnavis: मनसे आणि शिवसेनेच्या युतीचा बिगुल अखेर वाजला. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला. मुंबईत शिंदे सेना आणि भाजपविरोधातच सामना रंगणार हे आजच्या पत्रकार परिषदेतून समोर आले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 24, 2025
- 1:38 pm
Sudhir Mungantiwar : भाऊंच्या नाराजीची ‘डरकाळी’ संपली? भाजपात उपरे येऊन झाले गब्बर? नाथाभाऊंनंतर मुनगंटीवार यांचा नंबर?
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या जाहीर नाराजीची डरकाळी अखेर थांबल्याची चर्चा आहे. भाजपमधील इनकमिंग नेत्यांमुळे पक्षाच्या कारभारावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मंत्रिपदाचा आलेख घसरल्याने आणि चंद्रपूरमधील पराभवामुळे ही नाराजी वाढली होती. पक्षाने त्यांची मनधरणी केल्याचे संकेत असले तरी, अंतर्गत गटबाजीच्या चर्चा सुरूच आहेत.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 24, 2025
- 11:00 am
MGNREGA Explained: गांधींजी बाहेर, राम आत; मनरेगा योजनेतील बदल कुणाच्या पथ्यावर? हक्काचा रोजगार खरंच हिरावल्या जाणार? काय आहे मोदींची नवीन गँरटी…
VB-G RAM Vs MGNREGA: गेल्या दोन दशकांपासून गरिबांना रोजगाराची हमी देणार्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, मनरेगामध्ये केंद्र सरकारने अमुलाग्र बदल केला. त्या योजनेचे नावच नाही तर अनेक गोष्टी बदलल्या. नवीन VB-G RAM G अधिनियम दोन्ही सभागृहांच्या मंजुरीनंतर अस्तित्वात आला. त्यावरून आता देशात चर्चा पेटली आहे. हक्काचा रोजगार खरंच हिरावल्या जाणार?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 24, 2025
- 10:27 am
‘हिरव्या सापांना दूध पाजू नका, ते…’ मंत्री नितेश राणे यांचं वादग्रस्त विधान, नेमकं काय म्हणाले?
Nitesh Rane : भाजपचे हिंदूत्ववादी नेते आणि मस्त्सविकास मंत्री नितेश राणे हे मिरा भाईंदर येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे त्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 23, 2025
- 11:00 pm