AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप

भाजप

भारतीय जनता पार्टी हा देशातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून 2014 पासून केंद्रात सत्तेत आहे. त्याशिवाय देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे. 1980मध्ये भाजपची स्थापना झाली. 1984मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या केवळ दोनच जागा निवडून आल्या. त्यानंतर राम मंदिर आंदोलन सुरू झालं. त्यामुळे भाजपला नवी उभारी मिळाली. 1996मध्ये राम मंदिर आंदोलनामुळे भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएची स्थापना झाली. त्यानंतर 2004 पर्यंत भाजप सत्तेत राहिली. नंतर दहा वर्ष भाजप सत्तेपासून दूर होती. पण मुख्य विरोधी पक्ष भाजपच होता. 2014ची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवण्यात आली. या निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळालं. मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतरही 2019च्या निवडणुकीत भाजपने मोठं यश संपादन करून सत्ता मिळवली. केंद्रातील सत्ता काळात भाजपने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. नोटाबंदी, जीएसटी लागू करणे, पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवणे आणि तीन तलाकबाबतचे निर्णय भाजपने घेतले.

Read More
Congress: नाशिक वृक्षतोडीवरून काँग्रेसचा व्यंगबाण; राज्यातील प्रमुखावर जिव्हारी टीका

Congress: नाशिक वृक्षतोडीवरून काँग्रेसचा व्यंगबाण; राज्यातील प्रमुखावर जिव्हारी टीका

Nashik Kumbha Mela: नाशिक येथील वृक्षतोडीविरोधात मोठं आंदोलन करण्यात येत आहे. अनेक दिग्गजांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. तपोवनातील वृक्ष तोडीविरोधात स्थानिकही आक्रमक झाले आहेत. दरम्यान या प्रकरणावरून काँग्रेसने व्यंगबाण सोडला आहे. त्याची मोठी चर्चा सुरू आहे.

BJP Mayor for Mumbai : मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! फडणवीसांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राचे राजकारण, लोढांचं मोठं वक्तव्य

BJP Mayor for Mumbai : मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! फडणवीसांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राचे राजकारण, लोढांचं मोठं वक्तव्य

भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईत भाजपचाच महापौर होणार आणि सर्व पक्षांवर देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदे गट एकत्र लढणार असले तरी, लोढांनी त्यांच्या वक्तव्याने शिंदे गटाला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

Maharashtra News Live : सरकारने इंडिगोवर कारवाई केली पाहिजे, विमानसेवा इतकी कशी विस्कळीत होऊ शकते- सुप्रिया सुळे

Maharashtra News Live : सरकारने इंडिगोवर कारवाई केली पाहिजे, विमानसेवा इतकी कशी विस्कळीत होऊ शकते- सुप्रिया सुळे

देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Parth Pawar : पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, महसूल मंत्री बावनकुळेंनी ठणकावलंच, म्हणाले…

Parth Pawar : पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, महसूल मंत्री बावनकुळेंनी ठणकावलंच, म्हणाले…

पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने जमीन घोटाळा प्रकरणात 42 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यास नकार दिला आहे. मात्र, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही रक्कम भरावीच लागेल अशी भूमिका घेतली आहे. या प्रकरणात शेतकरी शीतल तेजवानी यांना अटक करण्यात आली असून, अजित पवार आणि बावनकुळे यांच्यावरही गंभीर आरोप झाले आहेत.

C Voters Survey : महाराष्ट्रासमोरील सर्वात धगधगता प्रश्न कोणता? राज्याच्या जनतेकडून एका वर्षात सरकारला किती गुण? वाचा सर्व्हे

C Voters Survey : महाराष्ट्रासमोरील सर्वात धगधगता प्रश्न कोणता? राज्याच्या जनतेकडून एका वर्षात सरकारला किती गुण? वाचा सर्व्हे

Maharashtra Government 1 Year Complete Survey : सी व्होटर्सने राज्य सरकारच्या एका वर्षाच्या कामगिरीवर एक सर्व्हे केला आहे. यात विविध मुद्द्यांवर जनतेला प्रश्न विचारण्यात आले होते. यातून राज्यासमोरील महत्त्वाची आव्हाने कोणती हे समोर आले आहे.

Mood Of Maharashtra : राज्यातील सर्वात विश्वासार्ह नेता कोण? फडणवीस, शिंदे, पवार की ठाकरे? महाराष्ट्राची पसंती कोणाला? वाचा सर्व्हे

Mood Of Maharashtra : राज्यातील सर्वात विश्वासार्ह नेता कोण? फडणवीस, शिंदे, पवार की ठाकरे? महाराष्ट्राची पसंती कोणाला? वाचा सर्व्हे

महायुतीचं सरकार राज्यात येऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे, यानिमित्तानं जनता सरकारच्या कामावर समाधानी आहे का? महाराष्ट्रातील जनतेची सर्वाधिक पसंती राज्यातील कोणत्या नेत्याला आहे? या संदर्भात एक सर्व्हे करण्यात आला आहे.

Mahayuti Unity : महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

Mahayuti Unity : महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

राज्यातील महायुतीमधील नेत्यांनी अंतर्गत मतभेद दूर करून एकजुटीने काम करण्याचे संकेत दिले आहेत. रवींद्र चव्हाणांनी एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केल्याचे म्हटले असून, त्यांच्या निर्णयाचे संजय शिरसाट यांनी स्वागत केले आहे. निलेश राणेंनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली, तर बावनकुळेंनी मतभेद मिटण्याची ग्वाही दिली.

राज्यातील सर्व पक्ष फडणवीसच चालवतात, बड्या नेत्यांचं मोठं वक्तव्य, राज्यात खळबळ

राज्यातील सर्व पक्ष फडणवीसच चालवतात, बड्या नेत्यांचं मोठं वक्तव्य, राज्यात खळबळ

राज्यात सत्तेमध्ये येऊन महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे, या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना बड्या नेत्यानं केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. फडणवीस हेच बाकी पक्ष देखील चालवत असल्याचं विधान करण्यात आलं आहे.

Mahayuti Govt One Year : अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं… भाजप नेत्याचा ठाकरेंना टोला

Mahayuti Govt One Year : अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं… भाजप नेत्याचा ठाकरेंना टोला

महायुती सरकारच्या एका वर्षाच्या पूर्ततेनिमित्त अमित साटम यांनी गेल्या 11 वर्षांतील महाराष्ट्राच्या प्रगतीवर भाष्य केले. अडीच वर्षांचा स्पीड ब्रेकर वगळता, समृद्धी महामार्ग, अटल सेतू यांसारख्या विकासकामांवर त्यांनी प्रकाश टाकला. मुंबईतील रस्त्यांच्या समस्या, अधिकारी निलंबन आणि आगामी महानगरपालिका निवडणुकांवरही त्यांनी भूमिका मांडली.

Worli Union Dispute : भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीच्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये घडलं काय?

Worli Union Dispute : भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीच्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये घडलं काय?

वांद्र्यानंतर आता वरळीतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये भाजप आणि ठाकरे सेनेच्या कामगार युनियनवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आमनेसामने आल्याने घोषणाबाजी आणि गोंधळ झाला. ठाकरे सेनेने जुन्या युनियनचे वर्चस्व सांगितले, तर भाजपने कामगारांच्या मागणीनुसार नवीन युनियन स्थापन केल्याचा दावा केला. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

Mumbai News : वरळीत भाजप-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, तुफान राडा, नेमकं काय घडलं?

Mumbai News : वरळीत भाजप-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, तुफान राडा, नेमकं काय घडलं?

Shiv Sena UBT vs BJP : वरळीमध्ये भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. कामगार युनियनवरून दोन्ही पक्षांमध्ये मोठा वाद झाला आहे. त्यामुळे वरळीत पोलीसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

CM Fadnavis : 2029 ला मोदीच पतंप्रधान, महायुती सरकारला एक वर्ष अन् विकास योजनांवर भर देत फडणवीसांना थेट सांगून टाकलं..

CM Fadnavis : 2029 ला मोदीच पतंप्रधान, महायुती सरकारला एक वर्ष अन् विकास योजनांवर भर देत फडणवीसांना थेट सांगून टाकलं..

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सरकारच्या एक वर्षाच्या पूर्ततेबद्दल बोलताना विकासाची आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. सौर कृषी पंपांमध्ये जागतिक विक्रम झाल्याचे नमूद करत, त्यांनी 2029 मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान असतील असा विश्वास व्यक्त केला. रुग्णालयांच्या खाजगीकरणाच्या आरोपांचेही त्यांनी खंडन केले, तर राजकीय वादांवर कठोर कारवाईचे संकेत दिले.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.