भाजप
भारतीय जनता पार्टी हा देशातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून 2014 पासून केंद्रात सत्तेत आहे. त्याशिवाय देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे. 1980मध्ये भाजपची स्थापना झाली. 1984मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या केवळ दोनच जागा निवडून आल्या. त्यानंतर राम मंदिर आंदोलन सुरू झालं. त्यामुळे भाजपला नवी उभारी मिळाली. 1996मध्ये राम मंदिर आंदोलनामुळे भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएची स्थापना झाली. त्यानंतर 2004 पर्यंत भाजप सत्तेत राहिली. नंतर दहा वर्ष भाजप सत्तेपासून दूर होती. पण मुख्य विरोधी पक्ष भाजपच होता. 2014ची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवण्यात आली. या निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळालं. मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतरही 2019च्या निवडणुकीत भाजपने मोठं यश संपादन करून सत्ता मिळवली. केंद्रातील सत्ता काळात भाजपने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. नोटाबंदी, जीएसटी लागू करणे, पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवणे आणि तीन तलाकबाबतचे निर्णय भाजपने घेतले.
Nitin Gadkari: …नाहीतर देव उचलून नेईन, नितीन गडकरी यांची तुफान फटकेबाजी, कार्यकर्त्यांनो जपून ठेवा खास मंत्र
Nitin Gadkari Big Statements: राजकारणात काहीच स्थिर नसते. आज सत्ता आली म्हणून माज दाखवू नका असा मोठा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. त्यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Apr 7, 2026
- 12:56 pm
Nitin Gadkari: “कुणाला पंतप्रधान करण्यासाठी…”, पक्ष स्थापना दिनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरींचा अवकाळी टोला, कुणाला झोंबणार वऱ्हाडी झटका?
Nitin Gadkari Big Statements: केंद्रीय नितीन गडकरी यांच्या भाषणाची रंगत न्यारी आहे. हसत हसत चिमटे काढणे हा त्यांचा स्वभाव आहे. प्रसंगी ते सुनावयलाही मागे पाहत नाही. वैदर्भियन मातीचं देणं त्यांच्या भाषणातून सहज डोकावते. त्यांच्या भाषणाकडे माध्यमांचंच नाही तर कार्यकर्त्यांचंही बारीक लक्ष्य असतं. ते बेधडक वक्तव्य करतात. आताही त्यांनी असंच भुवया उंचावणारं वक्तव्य केलं आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Apr 7, 2026
- 12:29 pm
Baramati Byelection: सुनेत्रा पवार यांना काँग्रेसचे आव्हान; बारामती पोटनिवडणुकीत शड्डू ठोकण्याचे काय कारण? इनसाईड स्टोरी वाचली का?
Baramati Byelection Sunetra Pawar Vs Congress: बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे राजकारण नवीन वळणावर पोहचले आहे. काँग्रेसने महाविकास आघाडीला पाठ दाखवत या निवडणुकीसाठी बिगुल वाजवला आहे. त्यामुळे काँग्रेस वेगळी वाट चोखंदळत आहे का? असा सवाल विचारला जात आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Apr 7, 2026
- 8:52 am
Chandrakant patil On Kharat Case | खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर, चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?
सध्या राज्यभरात भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या प्रकरणासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी सूचक विधान केले आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Apr 5, 2026
- 3:43 pm
…म्हणून काही महिला मोठं कुंकू अन् मंगळसूत्र घालतात, काँग्रेसच्या माजी आमदारांच्या वक्तव्याने एकच खळबळ
Rahul Bondre Offensive Statement: सध्या पक्ष प्रवेश थंडावले आहेत. तरी काही नेत्यांना ओढवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी फिल्डिंग लावल्याचे दिसून येते. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत काही नेते गळाला लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या माजी आमदारांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.
- Reporter Ganesh Solanki
- Updated on: Apr 5, 2026
- 10:34 am
Devendra Fadnavis | मन मोठं करा.. बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व राजकीय पक्षांना सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. फडणवीस म्हणाले की, “माझी सर्वांना विनंती आहे की ही पोटनिवडणूक बिनविरोध पार पडावी. याआधी महाराष्ट्रात काही बिनविरोध पोटनिवडणुका झाल्या आहेत.
- Harshada Gaikwad
- Updated on: Apr 4, 2026
- 2:33 pm
Sanjay Raut Full Press | अंजली दमानियांकडे एवढ्या कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? संजय राऊतांनी या मंत्र्याच्या कार्यालयाकडे दाखवले बोट; मोठी खळबळ
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या फोन कॉल्ससंदर्भात मोठे खुलासे केले. त्यांनी सांगितले की, खरातने कोणत्या नेत्याशी किती वेळा फोन केला आणि कोणत्या नेत्याने त्याला किती वेळा फोन केला, तसेच प्रत्येक कॉल किती वेळा झाला, अशी संपूर्ण माहिती त्यांनी उघड केली. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टिप्पणी केली आहे. राऊत म्हणाले की, ही माहिती केवळ मुख्यमंत्री कार्यालयातून मिळाल्याशिवाय कुणालाही मिळू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणामागे सरकारच्या टार्गेटवर कोणी आहे, असा अर्थ निघतो. राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सूचक निशाणा साधला आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Apr 4, 2026
- 2:08 pm
Sanjay Raut : अंजली दमानियांना खरात प्रकरणातला खुराक मुख्यमंत्री कार्यालयातूनच? सरकारच्या टार्गेटवर कोण ? राऊतांचे एका दगडात दोन पक्षी
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. अंजली दमानिया यांनी खरातच्या राजकीय नेत्यांसोबतच्या कॉल डिटेल्सचा खुलासा केला, ज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रुपाली चाकणकर यांच्याशी झालेल्या संवादाची माहिती दिली. यावर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री कार्यालयातूनच ही माहिती दिली जात असल्याचा दावा केला आहे. सरकारमधील काही स्वकीयच निशाण्यावर असल्याचा राऊतांचा आरोप धक्कादायक आहे.
- manasi mande
- Updated on: Apr 4, 2026
- 1:23 pm
Maharashtra News LIVE : जगबुडी नदी पुलावर टँकर उलटल्याने एक मार्गिका बंद
Maharashtra News LIVE Updates : अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागाना झोडलं असून शेतकऱ्यांची त्रेधा तिरपीट उडाली, पाऊस तसेच गारपीट यामुळे शेतीपिकांचही मोठं नुकसान झालंय. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे ताजे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळीतली. पॉलो करा टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग...
- manasi mande
- Updated on: Apr 4, 2026
- 9:51 pm
Chandrashekhar Bawankule | जीव घेण्याचा कट पूर्णपणे…बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, “निवडणुकीत जिंकणं-हरणं हा भाग असतो. मात्र, निवडणूक जिंकण्यासाठी एवढी लाचारी दाखवणे योग्य नाही. कोणावर हल्ला करण्याचा किंवा जीव घेण्याचा कट रचणे हे पूर्णपणे अयोग्य आहे.”
- Harshada Gaikwad
- Updated on: Apr 3, 2026
- 5:15 pm
राज्यातील विरोधी पक्ष कोणता? प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेची हवाच काढली, उत्तराने मोठी खळबळ? महाविकास आघाडीला तडा?
Prakash Ambedkar on Congress: अवघ्या एका वर्षापूर्वी सत्तेच्या स्पर्धेत असलेल्या महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच मध्यंतरी अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. महापालिका निवडणूक असो की जिल्हा परिषद निवडणूक असो तणाव दिसून आला. विधानसभा निवडणुकीत तर ही बाब प्रकर्षाने समोर आली. आता वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Apr 3, 2026
- 1:23 pm
Special Report | संजय राऊतांचा मोठा दावा शिंदे- अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर? सुप्रीम कोर्टाच्या विलंबावरून आरोप
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारा दावा केला आहे. त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील तब्बल 25 ते 30 आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असे वक्तव्य केले आहे. राऊत यांनी म्हटले की, या आमदारांसमोर भाजपमध्ये विलीन होण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही.
- Harshada Gaikwad
- Updated on: Apr 3, 2026
- 10:51 am