शिवसेना
शिवसेना (Shiv Sena) हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी 19 जून 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली गेली. शिवसेनेने मराठी आणि मराठी माणूस हा मुद्दा हाती घेतल्याने शिवसेनेवर प्रांतवादाचा शिक्काही बसला. पण या सर्वांकडे दुर्लक्ष करत बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची वाटचाल सुरू ठेवली. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे शिवसेनेचं सुरुवातीचं ब्रिद होतं. त्यानंतर शिवसेना हळूहळू निवडणुकीच्या राजकारणात उतरली. 1989 साली शिवसेनेने भाजपसोबत युती करून निवडणुका लढवल्या. 1995मध्ये शिवसेनेला राज्यात सत्ता आली. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 1999मध्ये केंद्रातील अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्येही शिवसेना सहभागी झाली होती. शिवसेनेला लोकसभेचं अध्यक्षपदही देण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख झाले. 2019च्या निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. पण अडीच वर्षानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड केलं. 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदारांना घेऊन शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिवसेना कुणाची हा मुद्दा निवडणूक आयोगाकडे गेले असता आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं. आता हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
Sanjay Shirsat Warns BJP: महायुतीत तणाव, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेत पुन्हा भडका: कार्यकर्ता फोडाफोडीवरून शिरसाटांचा थेट भाजपला इशारा
नगरपालिका निवडणुकांनंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत पुन्हा मतभेद उफाळले आहेत. भाजपच्या रवींद्र चव्हाणांवर शिंदे गटाने कार्यकर्ता फोडाफोडीचा आरोप केला आहे. संजय शिरसाट यांनी थेट इशारा दिला आहे की, जर हे असेच सुरू राहिले तर आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढाव्या लागतील. कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरारमध्ये विशेषतः तणाव वाढला आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 4, 2025
- 11:35 pm
मोठी बातमी! राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप? तो पक्षप्रवेश शिवसेना शिंदे गटाच्या जिव्हारी, आता भाजपला थेट इशारा
सध्या भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे, याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना शिंदे गटला बसला आहे. यावरून आता शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असून, भाजपला थेट इशार देण्यात आला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 4, 2025
- 6:24 pm
Shiv Sena-BJP Rift : फाटाफूट कराल तर… संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा, शिंदे सेना-भाजपात पुन्हा भडका
कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदेसेनेत पक्षप्रवेशावरून तीव्र संघर्ष सुरू आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी रवींद्र चव्हाण यांना थेट इशारा दिला असून, फाटाफूट केल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी दर्शवली आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 4, 2025
- 5:10 pm
Eknath Shinde : ‘तुम्ही पतंग उडवता’, शिंदे म्हणाले, जुदा जुदा नहीं हम एकसाथ अन् फडणवीस हसले, कुणाला लगावला टोला?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुती 75% नगरपालिकांवर विजय मिळवेल असा विश्वास व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आणि फडणवीसांमधील नाराजीच्या बातम्या फेटाळल्या. तसेच, निवडणूक आयोगाने मतदार यादीतील त्रुटींवर महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 4, 2025
- 12:20 pm
Kalyan-Dombivli : कल्याण-डोंबिवलीत पक्षप्रवेशावरून भाजप-शिंदे सेना पुन्हा भिडले, कार्यकर्ते फोडण्यावरून जुंपली
डोंबिवलीत भाजप आणि शिवसेनेत राजकीय संघर्ष वाढला आहे. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख विकास देसले यांच्या भाजप प्रवेशानंतर हा तणाव उफाळला. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्यावर शिवसेना कार्यकर्ते फोडण्याचा आणि विकासकामांचे श्रेय घेण्याचा आरोप करत आहे. दोन्ही पक्षांकडून युती धर्माचे पालन करण्याचे आवाहन असले तरी, कार्यकर्ते पळवण्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 4, 2025
- 11:48 am
Bharat Gogawale : ..हा तटकरेंचा हातखंडाच, दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक अन्.. महाड राड्याप्रकरणी गोगावले यांचा गंभीर आरोप
महाड येथील राड्याप्रकरणी विकास गोगावले, महेश गोगावले आणि विजय मालुसरे यांच्यावर २१ कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत मंत्री भरत गोगावले यांनी तटकरेंवर थेट षडयंत्राचा आरोप केला असून, "दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप दाबायचा, हा तटकरेंचा जुना हातखंडा आहे," असे म्हटले आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 3, 2025
- 4:47 pm
Mahad Clash : मंत्री गोगावले यांच्या मुलासह इतरांविरोधात 21 कलमांखाली गुन्हे दाखल, प्रकरण नेमकं काय?
महाडमधील गोगावले-तटकरे समर्थकांच्या राड्याप्रकरणी विकास गोगावले, महेश गोगावले आणि विजय मालुसरे यांच्यावर 21 विविध कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. यावर बोलताना भारत गोगावले यांनी तटकरेंवर षडयंत्राचा आरोप केला असून, त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहरात तणावाचे वातावरण निर्माण केल्याचा दावा केला आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 3, 2025
- 3:47 pm
Sanjay Gaikwad : निवडणूक आयोगालाच वटणीवर आणलं पाहिजे, सगळे मनाचे कायदे अन्… संजय गायकवाडांचा हल्लाबोल
संजय गायकवाड यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आयोगाने निकाल लांबवल्याने प्रशासकीय कामांमध्ये अडथळे येत आहेत आणि मतदार याद्यांमधील बोगस नावे काढली जात नाहीत. आयोगाला वठणीवर आणण्यासाठी सरकारने कायदे करावेत, अशी मागणी गायकवाडांनी केली आहे, जेणेकरून निवडणुका अधिक पारदर्शक होतील.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 3, 2025
- 3:05 pm
Uddhav Thackeray: सध्या जोरात हाणामारी…कोकणातील राड्यावर उद्धव ठाकरेंचे मोठे भाष्य, शिंदे सेनेचा बालेकिल्ला फोडला, अनेक जण उद्धव सेनेत
Uddhav Thackeray: कोकणात सध्या महायुतीत मोठा राडा सुरू आहे. शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजप पैसे वाटप असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे शिंदे सेना आणि राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांची जमके फ्री स्टाईल पाहायला मिळाली. यावर आता उद्धव ठाकरेंनी जोरदार टोला लगावला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 3, 2025
- 2:33 pm
Local Body Elections 2025 : सत्ताधारी महायुतीतच तुफान कुस्ती, राडा अन् धिंगाणा, ‘स्थानिक’ निवडणुकांमध्ये कुठं काय घडलं?
महाराष्ट्र पालिका निवडणुकांमध्ये अभूतपूर्व गोंधळ आणि हाणामारीच्या घटना घडल्या. सत्ताधारी महायुतीतील शिंदे गट, भाजप, अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातच संघर्ष दिसून आला. बोगस मतदानाच्या आरोपांवरून अनेक ठिकाणी नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये थेट हाणामारी झाली, लोकशाहीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 3, 2025
- 11:55 am
Saamana : ‘नीती-नियमां’च्या दिव्याखाली फक्त घोळ, गोंधळ अन्.. . निवडणुकीचा खेळखंडोबा, दिवसही वैऱ्याचा… सामनातून निशाणा
महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत अंदाजे 60% मतदान झाले आहे. कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असून, नाशिक आणि बदलापूरमध्येही चांगले मतदान झाले. मात्र, मतमोजणी 19 दिवसांनी पुढे ढकलल्याने सामनाने निवडणुकांवर खेळखंडोबा म्हणत टीका केली आहे. मतदार यादीतील घोळ, न्यायालयाची भूमिका आणि अनियमितता हे प्रमुख मुद्दे आहेत.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 3, 2025
- 11:34 am
Election Commission: राजकीय नेत्यांना काय वाटते यापेक्षा कायदा महत्त्वाचा; भाजपसह विरोधकांच्या डोळ्यात राज्य निवडणूक आयोगाचे झणझणीत अंजन
State Election Commission: नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीतील गोंधळावर राजकीय पक्षांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधकांनी काल चांगलीच नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाची भूमिका समोर आली आहे. राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोगातील कलगीतुरा रंगला आहे.
- Reporter Akshay Mankani
- Updated on: Dec 3, 2025
- 11:21 am
Local Body Elections 2025 : नगरपालिकेच्या मतदानावेळी राडा अन् तोडफोड, कुठं-कुठं महायुतीचे कार्यकर्ते भिडले?
महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत अभूतपूर्व हिंसाचार पाहायला मिळाला. महाडमध्ये शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पिस्तूल आणि तोडफोड प्रकरण घडले. मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते बोगस मतदानाच्या आरोपावरून भिडले, तर बुलढाण्यात आमदारपुत्राने बोगस मतदाराला पळवून लावल्याचा आरोप आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 3, 2025
- 3:14 pm
Santosh Bangar : संतोष बांगर यांना कायदा लागू आहे? मतदान केंद्रातच नियम मोडले, मोबाईल आणला शूट केलं अन्…
हिंगोलीतील नगरपालिका मतदानादरम्यान आमदार संतोष बांगर यांनी नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप आहे. त्यांनी मोबाईलने मतदान चित्रीकरण केले, गोपनीयतेचा भंग केला आणि मतदारांना सूचनाही दिल्या. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लोकप्रतिनिधींनी लोकशाहीचा आदर राखण्याचे आवाहन केले आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 3, 2025
- 10:51 am
Maharashatra News Live : भाईंदर : बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर सरकारची धडक कारवाई
राज्यात पुन्हा थंडीची लाट परतली असून पुढील आठवडाभर थंडी कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानाचा पारा घसरला आहे. यासह राजकीय आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स जाणून घ्या..
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 3, 2025
- 10:16 pm