शिवसेना
शिवसेना (Shiv Sena) हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी 19 जून 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली गेली. शिवसेनेने मराठी आणि मराठी माणूस हा मुद्दा हाती घेतल्याने शिवसेनेवर प्रांतवादाचा शिक्काही बसला. पण या सर्वांकडे दुर्लक्ष करत बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची वाटचाल सुरू ठेवली. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे शिवसेनेचं सुरुवातीचं ब्रिद होतं. त्यानंतर शिवसेना हळूहळू निवडणुकीच्या राजकारणात उतरली. 1989 साली शिवसेनेने भाजपसोबत युती करून निवडणुका लढवल्या. 1995मध्ये शिवसेनेला राज्यात सत्ता आली. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 1999मध्ये केंद्रातील अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्येही शिवसेना सहभागी झाली होती. शिवसेनेला लोकसभेचं अध्यक्षपदही देण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख झाले. 2019च्या निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. पण अडीच वर्षानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड केलं. 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदारांना घेऊन शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिवसेना कुणाची हा मुद्दा निवडणूक आयोगाकडे गेले असता आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं. आता हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
देवाभाऊ त्यांचे आदर्श, त्यांनी त्यांची पूजा करावी, संजय शिरसाट यांनी लोढांना फटकारलं; महायुतीत चाललंय काय?
राज्यात महायुतीत बेबनाव उफाळला आहे. मुंबईच्या महापौरपदावरून भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या विधानावर शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. 'देवाभाऊ त्यांचे आदर्श आहेत, त्यांनी त्यांची पूजा करावी' असा खोचक टोला शिरसाट यांनी लोढांना लगावला. यामुळे शिंदे-भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला असून, मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच तणाव वाढला आहे.
- manasi mande
- Updated on: Dec 6, 2025
- 1:49 pm
Mahayuti Unity : फोडाफोडीनं नाराजी, वाक् युद्धांनंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर? एकत्र हजेरी?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण डोंबिवली येथे एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. केडीएमसीच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांची भेट होणार असून, स्थानिक निवडणुकांमधील पक्षप्रवेशावरून झालेल्या वादामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. महायुतीतील नेत्यांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 6, 2025
- 11:48 am
Congress: नाशिक वृक्षतोडीवरून काँग्रेसचा व्यंगबाण; राज्यातील प्रमुखावर जिव्हारी टीका
Nashik Kumbha Mela: नाशिक येथील वृक्षतोडीविरोधात मोठं आंदोलन करण्यात येत आहे. अनेक दिग्गजांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. तपोवनातील वृक्ष तोडीविरोधात स्थानिकही आक्रमक झाले आहेत. दरम्यान या प्रकरणावरून काँग्रेसने व्यंगबाण सोडला आहे. त्याची मोठी चर्चा सुरू आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 6, 2025
- 10:23 am
BJP Mayor for Mumbai : मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! फडणवीसांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राचे राजकारण, लोढांचं मोठं वक्तव्य
भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईत भाजपचाच महापौर होणार आणि सर्व पक्षांवर देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदे गट एकत्र लढणार असले तरी, लोढांनी त्यांच्या वक्तव्याने शिंदे गटाला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 6, 2025
- 9:25 am
Mahayuti Unity : महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राज्यातील महायुतीमधील नेत्यांनी अंतर्गत मतभेद दूर करून एकजुटीने काम करण्याचे संकेत दिले आहेत. रवींद्र चव्हाणांनी एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केल्याचे म्हटले असून, त्यांच्या निर्णयाचे संजय शिरसाट यांनी स्वागत केले आहे. निलेश राणेंनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली, तर बावनकुळेंनी मतभेद मिटण्याची ग्वाही दिली.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 5, 2025
- 6:48 pm
राज्यातील सर्व पक्ष फडणवीसच चालवतात, बड्या नेत्यांचं मोठं वक्तव्य, राज्यात खळबळ
राज्यात सत्तेमध्ये येऊन महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे, या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना बड्या नेत्यानं केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. फडणवीस हेच बाकी पक्ष देखील चालवत असल्याचं विधान करण्यात आलं आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 5, 2025
- 6:27 pm
Mumbai News : वरळीत भाजप-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, तुफान राडा, नेमकं काय घडलं?
Shiv Sena UBT vs BJP : वरळीमध्ये भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. कामगार युनियनवरून दोन्ही पक्षांमध्ये मोठा वाद झाला आहे. त्यामुळे वरळीत पोलीसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
- nivruti babar
- Updated on: Dec 5, 2025
- 4:54 pm
Ekanth Shinde Shivsena : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपल्याच सरकारला दिला मोठा झटका
Ekanth Shinde Shivsena : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एक मोठा निर्णय घेतला आहे. हा महायुती सरकारसाठी मोठा झटका आहे. कारण शिंदे सेनेची ही भूमिका सरकारविरोधात जाणारी आहे. नुकतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरुन राजकीय वातावरण तापलं आहे.
- Reporter Chandan Pujadhikari
- Updated on: Dec 5, 2025
- 1:17 pm
Sanjay Shirsat Warns BJP: महायुतीत तणाव, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेत पुन्हा भडका: कार्यकर्ता फोडाफोडीवरून शिरसाटांचा थेट भाजपला इशारा
नगरपालिका निवडणुकांनंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत पुन्हा मतभेद उफाळले आहेत. भाजपच्या रवींद्र चव्हाणांवर शिंदे गटाने कार्यकर्ता फोडाफोडीचा आरोप केला आहे. संजय शिरसाट यांनी थेट इशारा दिला आहे की, जर हे असेच सुरू राहिले तर आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढाव्या लागतील. कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरारमध्ये विशेषतः तणाव वाढला आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 4, 2025
- 11:35 pm
मोठी बातमी! राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप? तो पक्षप्रवेश शिवसेना शिंदे गटाच्या जिव्हारी, आता भाजपला थेट इशारा
सध्या भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे, याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना शिंदे गटला बसला आहे. यावरून आता शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असून, भाजपला थेट इशार देण्यात आला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 4, 2025
- 6:24 pm
Shiv Sena-BJP Rift : फाटाफूट कराल तर… संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा, शिंदे सेना-भाजपात पुन्हा भडका
कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदेसेनेत पक्षप्रवेशावरून तीव्र संघर्ष सुरू आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी रवींद्र चव्हाण यांना थेट इशारा दिला असून, फाटाफूट केल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी दर्शवली आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 4, 2025
- 5:10 pm
Eknath Shinde : ‘तुम्ही पतंग उडवता’, शिंदे म्हणाले, जुदा जुदा नहीं हम एकसाथ अन् फडणवीस हसले, कुणाला लगावला टोला?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुती 75% नगरपालिकांवर विजय मिळवेल असा विश्वास व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आणि फडणवीसांमधील नाराजीच्या बातम्या फेटाळल्या. तसेच, निवडणूक आयोगाने मतदार यादीतील त्रुटींवर महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 4, 2025
- 12:20 pm