AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर त्यांनी थांबावं, उदय सामंत यांचा गणेश नाईक यांच्यावर थेट निशाणा, महायुतीमध्ये वातावरण तापलं

गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील भूखंडावरून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती, आता या टीकेला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे, त्यांनी नाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

...तर त्यांनी थांबावं, उदय सामंत यांचा गणेश नाईक यांच्यावर थेट निशाणा, महायुतीमध्ये वातावरण तापलं
उदय सामंत यांचा गणेश नाईक यांच्यावर हल्लाबोल Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 14, 2026 | 6:24 PM
Share

मंत्री आणि भाजपचे नेते गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील भूखंडांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर  जोरदार हल्लाबोल केला होता, आम्ही नवी मुंबईकरांच्या विकास कामासाठी भूखंड मागितले होते, रुग्णालय,  गार्डन यासाठी भूखंडाची मागणी केली होती, पण जर विकास कामासाठी भूखंड मिळणार नसतील तर मंत्रिपद चाटायचंय का? असा सवाल करत सर्व भूखंड बिल्डरांच्या घशात घातले, माझा राग जर शांत करायचा असेल तर सर्व भूखंड नवी मुंबईकरांच्या विकासासाठी द्या, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता. दरम्यान गणेश नाईक यांच्या या टीकेला आता मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे, त्यांनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत? 

गणेश नाईक यांचा नेमका आक्षेप कोणावर आहे, हेच स्पष्ट नाही. त्यांचा आक्षेप एकनाथ शिंदे यांच्यावर आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यावर?  हे त्यांनी स्पष्ट करावे. कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणे योग्य नाही. जर त्यांना काही पटत नसेल किंवा त्रास होत असेल, तर त्यांनी थांबावे, बाकीचे आम्ही सक्षम आहोत, अशा शब्दात सामंत यांनी गणेश नाईक यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मराठी आणि हिंदी भाषा वादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मराठी ही आपली मातृभाषा असून तिच्याबाबत आम्ही ठाम आहोत. निवडणुका आल्या की काही जण “हिंदीची सक्ती” असा मुद्दा पुढे करतात.  मराठीबरोबर हिंदीची सक्ती हा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारण्यात आला होता. आता निवडणुका आल्यामुळे तो निर्णय इतरांवर ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधित अहवाल माझ्याकडे आहे, त्यावर डॉ. रघुनाथ माशेलकर यांची सही आहे, असंही यावेळी सामंत यांनी म्हटलं आहे. दरम्यान मराठी शाळा बंद होऊन शहरातील शाळांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. योग्य उपयोजना केल्यास विद्यार्थ्यांची संख्या ग्रामीण भागात कायम राहू शकते असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.