AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर त्यांनी थांबावं, उदय सामंत यांचा गणेश नाईक यांच्यावर थेट निशाणा, महायुतीमध्ये वातावरण तापलं

गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील भूखंडावरून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती, आता या टीकेला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे, त्यांनी नाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

...तर त्यांनी थांबावं, उदय सामंत यांचा गणेश नाईक यांच्यावर थेट निशाणा, महायुतीमध्ये वातावरण तापलं
उदय सामंत यांचा गणेश नाईक यांच्यावर हल्लाबोल Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 14, 2026 | 6:24 PM
Share

मंत्री आणि भाजपचे नेते गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील भूखंडांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर  जोरदार हल्लाबोल केला होता, आम्ही नवी मुंबईकरांच्या विकास कामासाठी भूखंड मागितले होते, रुग्णालय,  गार्डन यासाठी भूखंडाची मागणी केली होती, पण जर विकास कामासाठी भूखंड मिळणार नसतील तर मंत्रिपद चाटायचंय का? असा सवाल करत सर्व भूखंड बिल्डरांच्या घशात घातले, माझा राग जर शांत करायचा असेल तर सर्व भूखंड नवी मुंबईकरांच्या विकासासाठी द्या, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता. दरम्यान गणेश नाईक यांच्या या टीकेला आता मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे, त्यांनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत? 

गणेश नाईक यांचा नेमका आक्षेप कोणावर आहे, हेच स्पष्ट नाही. त्यांचा आक्षेप एकनाथ शिंदे यांच्यावर आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यावर?  हे त्यांनी स्पष्ट करावे. कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणे योग्य नाही. जर त्यांना काही पटत नसेल किंवा त्रास होत असेल, तर त्यांनी थांबावे, बाकीचे आम्ही सक्षम आहोत, अशा शब्दात सामंत यांनी गणेश नाईक यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मराठी आणि हिंदी भाषा वादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मराठी ही आपली मातृभाषा असून तिच्याबाबत आम्ही ठाम आहोत. निवडणुका आल्या की काही जण “हिंदीची सक्ती” असा मुद्दा पुढे करतात.  मराठीबरोबर हिंदीची सक्ती हा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारण्यात आला होता. आता निवडणुका आल्यामुळे तो निर्णय इतरांवर ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधित अहवाल माझ्याकडे आहे, त्यावर डॉ. रघुनाथ माशेलकर यांची सही आहे, असंही यावेळी सामंत यांनी म्हटलं आहे. दरम्यान मराठी शाळा बंद होऊन शहरातील शाळांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. योग्य उपयोजना केल्यास विद्यार्थ्यांची संख्या ग्रामीण भागात कायम राहू शकते असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Follow Us
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा