AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गॉल कसोटी सामन्यात भारताचा विजय निश्चित! दुसऱ्या डावात इतक्या धावा केल्या तरी बस्स

भारत आणि श्रीलंका कसोटी सामन्यात दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावात भारताने 178 धावांची आघाडी घेतली असून चौथ्या दिवशी फलंदाजीला उतरणार आहे. त्यामुळे किती धावांचं लक्ष्य ठेवलं की विजय पक्का होईल? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.

गॉल कसोटी सामन्यात भारताचा विजय निश्चित! दुसऱ्या डावात इतक्या धावा केल्या तरी बस्स
गॉल कसोटी सामन्यात भारताचा विजय निश्चित! दुसऱ्या डावात इतक्या धावा केल्या तरी बस्सImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 17, 2026 | 8:25 PM
Share

India vs Sri Lanka: भारत श्रीलंका पहिला कसोटी सामना निर्णायक वळणावर आला आहे. भारताने पहिल्या डावात 462 धावांची खेळी केली होती. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला 284 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची सरशी होती. आता उर्वरित दोन दिवसात कसा खेळ होतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. दोन दिवसात 180 षटकांचा खेळ असून भारताने पहिल्या डावात 178 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात भारतीय संघ फलंदाजीला उतरल्यानंतर किती धावांचं लक्ष्य श्रीलंकेसाठी पुरेसे असतील? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. गॉलमध्ये चौथ्या डावात किती धावांचं लक्ष्य यशस्वीरित्या गाठलं गेलं आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या बातमीत मिळतील.

गॉल कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय संगाला किमान 250 धावा करणं भाग आहे. कारण भारताने 400 धावांच्या आसपास श्रीलंकेसमोर लक्ष्य ठेवलं तर विजयाचं गणित सुटू शकतं. पण या 250 धावा करणं दुसऱ्या डावात वाटतं तितकं सोपं नाही. पण भारताला हे गणित सोडवावं लागणार आहे. कारण पहिल्या डावात फिरकीची जादू चालली. पहिले दोन दिवस खेळपट्टी फलंदाजीला मदत करणारी होती. आता तसं नाही. त्यामुळे भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार आहे. गॉलमध्ये दुसऱ्या डावात सर्वात मोठा स्कोअर 2022 मध्ये पाकिस्तानने गाठला होता. या सामन्यात पाकिस्तानने 342 धावांचं लक्ष्य गाठलं होतं. तेव्हा अब्दुल्लाह शफीकच्या शतकाच्या जोरावर हे शक्य झालं होतं. तर श्रीलंकेचं बोलायचं तर 2019 मध्ये या मैदानात न्यूझीलंडविरुद्ध 268 धावा गाठून विजय मिळवला होता.

गॉलच्या मैदानात धावांच्या हिशेबाने भारताने सर्वात मोठा विजय मिळवला आहे. 2017 मध्ये गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध 304 धावांनी विजय मिळवला होता. तेव्हा भारताने पहिल्या डावात 600 धावांचा डोंगर रचला होता. तेव्हा श्रीलंकेने पहिल्या डावात 291 धावा केल्या. भारताला पहिल्या डावात 309 धावांची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावात पुन्हा भारताने 240 धावा केल्या आणि डाव घोषित केला. याह 549 धावांचं आव्हान दिलं. पण श्रीलंकेचा खेळ 245 धावांवर आटोपला आणि भारताने 304 धावांनी विजय मिळवला होता.

Follow Us
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा