भारतीय पुरूष क्रिकेट संघ
भारतीय क्रिकेट पुरुष संघ जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतो. भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा पूर्ण सदस्य आहे. टीम इंडिया जागतिक क्रिकेटमधील 1 हजारापेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळणाऱ्या काही मोजक्या संघांपैकी हा एक आहे. भारतीय क्रिकेट संघाला सध्या 1800 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. भारताने 1983 आणि 2011 मध्ये वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. तर 2007 आणि 2024 मध्ये टी20 वर्ल्डकपला गवसणी घातली आहे. भारताने तसेच 3 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलंय. भारताने 2002 साली श्रीलंकेसोबत ट्रॉफी शेअर केली होती. भारताने 2013 साली महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. तसेच 2025 मध्ये रोहित शर्माने भारताला पुन्हा एकदा चॅम्पिटन्स ट्रॉफीचं विजेतेपद मिळवून दिलं. भारतीय क्रिकेटचं नियंत्रण बीसीसीआयच्या हातात आहे.
Read Moreजसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरतोय, पण…! बीसीसीआयचा प्लान नेमका आहे तरी काय?
भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची उणीव टीम इंडियाला वारंवार जाणवत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तर ही उणीव अधिकच भासली. कारण शेपटाचे विकेट काढताना गोलंदाजांच्या नाकी नऊ आले होते. आता टीम इंडियात कमबॅक कधी करणार असा प्रश्न आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 31, 2026
- 3:58 pm
कृणाल पांड्या पाच वर्षांनी टीम इंडियात करणार पुनरागमन? या खेळाडूचा बळी जाणार! असं असू शकतं गणित
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेत कृणाल पांड्याला नशिबाची साथ मिळू शकते. पण एका खेळाडूचा यासाठी बळी जाण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात या मालिकेसाठी कसं गणित असू शकतं ते...
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 31, 2026
- 3:10 pm
गंभीर आणि गिल यांच्यात नेमकं काय सुरू आहे? कोलंबो कसोटीत काय घडलं? गौतमच्या त्या निर्णयाची रंगली चर्चा
कोलंबो कसोटी सामन्यात भारताने मजबूत आघाडी मिळवली होती. पण चौथ्या आणि पाचव्या दिवशी गणित बिघडलं आणि विजयाचं गणित चुकलं. पहिल्या दोन दिवशी भारताने फलंदाजी केली, पण त्यानंतर श्रीलंकेने तीन दिवस फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना जेरीस आणलं.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 29, 2026
- 6:09 pm
Team India: तीन महिन्यानंतर टीम इंडियाचा कसोटी संघ बदलणार, हे चार खेळाडू होणार बाद? कारण की…
भारत श्रीलंका कसोटी सामना नुकताच पार पडला. या मालिकेत भारताने 1-0 ने विजय मिळवला आहे. आता भारतीय संघ थेट तीन महिन्यांनी कसोटी मालिका खेळण्यासाठी उतरणार आहे. त्यामुळे या संघात काही बदल होण्याची दाट शक्यता आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 29, 2026
- 3:18 pm
जापानमध्ये असं कसं? तंबूत ड्रेसिंग रूम आणि वॉशरुम 500 मीटर दूर! एशियन्स गेम्स व्यवस्थेवर बीसीसीआयची नाराजी
एशियन गेम्स 2026 स्पर्धा जापानमध्ये होत आहे. मात्र या स्पर्धेत क्रिकेटसाठी असलेल्या व्यवस्थेवरून नाराजी व्यक्त होत आहे. ड्रेसिंग रूम आणि वॉशरूमच्या सुविधेवरून बीसीसीआयने कोरडे ओढले आहेत. नेमकं काय ते जाणून घ्या.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 28, 2026
- 6:00 pm
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी सूर्यकुमार यादवचं थेट विधान, संघात कमबॅकसाठी म्हणाला की…
भारतीय संघाला टी20 वर्ल्डकप जिंकवून देणारा कर्णधाराला थेट संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. फॉर्म नसल्याचं सांगत संघातून बाहेर केलं गेलं. आता टीम इंडियात कमबॅकसाठी काय? या प्रश्नावर त्याने थेट उत्तर दिलं आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 28, 2026
- 3:47 pm
श्रीलंकेला क्लिन स्विप देण्याची संधी हुकली! 303 चेंडूत टीम इंडियाचं गणित असं बिघडलं, जुनाच कित्ता पुन्हा गिरवला
IND vs SL Test Series: भारत श्रीलंका कसोटी मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताने 1-0 ने विजय मिळवला. पण श्रीलंकेला क्लिन स्विप देण्याची मोठी संधी हातातून गमावली. भारतीय गोलंदाजांची जुनी खोड अंगलट आली आणि त्याचाच फटका बसला. नेमकं काय झालं? ते जाणून घ्या.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 28, 2026
- 2:20 pm
रोहित शर्माच्या जर्सीसाठी जोस बटलरची खास इंस्टाग्राम स्टोरी, काय म्हणाला?
क्रिकेटविश्वात अनेक दिग्गज खेळाडूंच्या कथा ऐकिवात आहेत. क्रिकेटच्या मैदानात कितीही द्वंद्व असलं तरी मैदानाबाहेर तितकेच मित्रही आहेत. अशीच एक कहाणी रोहित शर्मा आणि जो बटलरची आहे. या कथेला जोस बटलरच्या इंस्टाग्राम स्टोरी ठेवून पुन्हा एकदा मुलामा दिला आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 27, 2026
- 9:28 pm
मॅच ड्रॉ होताच टीम इंडिया संकटात, आता या 2 टीम फायनलच्या शर्यतीत; भारतासोबत काय गेम झाला?
भारताने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-0 ने विजय मिळवला. पण या मालिकेतील दुसरा सामना ड्रॉ झाल्याने भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित बिघडलं आहे. आता भारतासाठी प्रत्येक सामना करो या मरोची लढाई असणार आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 27, 2026
- 8:42 pm
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरी गाठणार का? कर्णधार गिलने एका वाक्यात सांगून टाकलं की…
भारत श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित कठीण झालं आहे. आता भारतासमोर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारखे कठोर कसोटी पेपर आहेत. आता या दोन मालिकेत ते गणित सोडवणं वाटतं तितकं सोपं नाही.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 27, 2026
- 5:41 pm
IND vs SL 2nd Test: भारत श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना ड्रॉ, नेमकं काय चुकलं?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अखेर ड्रॉ झाला आहे. भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिला होता. मात्र दिनुषाच्या झुंजार खेळीने भारताचं विजयाचं स्वप्न भंगलं.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 27, 2026
- 5:10 pm
IND vs SL : कोलंबोत टीम इंडियाचा विजय नक्की! फॉलोऑननंतर श्रीलंकेचा असा आहे रेकॉर्ड
भारत श्रीलंका दुसरा कसोटी सामना निर्णायक स्थितीत आहे. पाचव्या दिवशी भारतीय संघ आरामात सामना जिंकेल अशी स्थिती आहे. पण पावसाने दगाफटका दिला तर सामना ड्रॉ होईल. पण श्रीलंका जिंकणार नाही. त्यांचा मागचा रेकॉर्डही तसाच आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 26, 2026
- 9:48 pm