AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजयाची हमी देता येणार नाही..! टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी उपांत्य फेरीपूर्वी असं का म्हंटलं?

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत इंग्लंड सामना होत आहे. या सामन्यात कोण बाजी मारेल? हे आता सांगणं कठीण आहे. कारण इंग्लंडची कामगिरी या स्पर्धेत चांगली राहिली आहे. तर भारताच्या फलंदाजीत सातत्य नाही. त्यात आता भारतीय प्रशिक्षकांनी विजयाची हमी देता येणार नाही असं सांगितलं आहे.

विजयाची हमी देता येणार नाही..! टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी उपांत्य फेरीपूर्वी असं का म्हंटलं?
विजयाची हमी देता येणार नाही..! टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी उपांत्य फेरीपूर्वी असं का म्हंटलं?Image Credit source: PTI
| Updated on: Mar 04, 2026 | 8:52 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतासमोर इंग्लंडचं कठीण आव्हान आहे. हा सामना भारताला जिंकायचा असेल तर कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. पण स्पर्धेतील कामगिरी पाहता क्रीडाप्रेमीही संभ्रमात पडले आहेत. त्यात भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केलने आपलं मत व्यक्त केलं आहे. हा सामना भारताला जिंकायचा असेल तर जिंकण्यावरच लक्ष केंद्रीत करावं लागेल. कारण इंग्लंडचा संघ धोकादायक आहे आणि त्यांच्याविरुद्ध जिंकणं सोपं नाही, असं मोर्ने मोर्केलने सांगितलं आहे. गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धचा विजय आता महत्त्वाचा नाही आणि सध्या हा संघ अत्यंत धोकादायक आहे, असंही मोर्ने मोर्केल म्हणाला. असं सांगत असताना मोर्ने मोर्केल म्हणाले की, आमचा संघ प्रतिभावान आहे आणि कोणताही खेळाडू गरज पडल्यास सर्वोत्तम कामगिरी करू शकतो.

मोर्ने मोर्केलने उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेला सामोरं गेला. यावेळी त्यांनी सांगितलं की, ‘इंग्लंडचा संघ चांगला आहे. ते चांगलं खेळतात. जर तुम्ही त्याने 120 किंवा 150 धावांवर बाद करण्याचा विचार करत असाल तर अशी आशा बाळगणं चुकीचं ठरेल. आम्ही उपांत्य फेरीत आहोत आणि फक्त जिंकूनच येथे पोहोचलो आहोत. आम्हाला माहिती आहे की भारतात विजय आणि पराभवातील अंतर खूप कमी आहे.’ इतकंच काय तर मोर्ने मोर्केलने पुढे सांगितलं की, ‘उपांत्य फेरीत कसं पोहोचलो हे महत्त्वाचं नाही. पुढच्या दोन सामन्यात तुम्ही कशी कामगिरी करता हे महत्त्वाचं आहे.’

मोर्ने मोर्केल म्हणाले की, ‘इंग्लंड हा एक अतिशय हुशार संघ आहे. त्यांच्याकडे अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत आणि त्यांच्या फलंदाजीत खोली आहे, ज्यामुळे ते एक अतिशय धोकादायक संघ बनतात.’ मोर्ने मोर्केल पुढे म्हणाले की, ‘”त्यांच्याकडे गोलंदाजीत अनेक पर्याय आहेत. मला वाटते की ते निर्भयपणे टी20 सामने खेळतात, सामना त्यांच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांना एक धोकादायक संघ बनवते. मला वाटते की गुरुवार हा दोन आक्रमक संघांमधील एक रोमांचक सामना असेल.”‘

Follow Us
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.