AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजयाची हमी देता येणार नाही..! टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी उपांत्य फेरीपूर्वी असं का म्हंटलं?

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत इंग्लंड सामना होत आहे. या सामन्यात कोण बाजी मारेल? हे आता सांगणं कठीण आहे. कारण इंग्लंडची कामगिरी या स्पर्धेत चांगली राहिली आहे. तर भारताच्या फलंदाजीत सातत्य नाही. त्यात आता भारतीय प्रशिक्षकांनी विजयाची हमी देता येणार नाही असं सांगितलं आहे.

विजयाची हमी देता येणार नाही..! टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी उपांत्य फेरीपूर्वी असं का म्हंटलं?
विजयाची हमी देता येणार नाही..! टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी उपांत्य फेरीपूर्वी असं का म्हंटलं?Image Credit source: PTI
| Updated on: Mar 04, 2026 | 8:52 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतासमोर इंग्लंडचं कठीण आव्हान आहे. हा सामना भारताला जिंकायचा असेल तर कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. पण स्पर्धेतील कामगिरी पाहता क्रीडाप्रेमीही संभ्रमात पडले आहेत. त्यात भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केलने आपलं मत व्यक्त केलं आहे. हा सामना भारताला जिंकायचा असेल तर जिंकण्यावरच लक्ष केंद्रीत करावं लागेल. कारण इंग्लंडचा संघ धोकादायक आहे आणि त्यांच्याविरुद्ध जिंकणं सोपं नाही, असं मोर्ने मोर्केलने सांगितलं आहे. गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धचा विजय आता महत्त्वाचा नाही आणि सध्या हा संघ अत्यंत धोकादायक आहे, असंही मोर्ने मोर्केल म्हणाला. असं सांगत असताना मोर्ने मोर्केल म्हणाले की, आमचा संघ प्रतिभावान आहे आणि कोणताही खेळाडू गरज पडल्यास सर्वोत्तम कामगिरी करू शकतो.

मोर्ने मोर्केलने उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेला सामोरं गेला. यावेळी त्यांनी सांगितलं की, ‘इंग्लंडचा संघ चांगला आहे. ते चांगलं खेळतात. जर तुम्ही त्याने 120 किंवा 150 धावांवर बाद करण्याचा विचार करत असाल तर अशी आशा बाळगणं चुकीचं ठरेल. आम्ही उपांत्य फेरीत आहोत आणि फक्त जिंकूनच येथे पोहोचलो आहोत. आम्हाला माहिती आहे की भारतात विजय आणि पराभवातील अंतर खूप कमी आहे.’ इतकंच काय तर मोर्ने मोर्केलने पुढे सांगितलं की, ‘उपांत्य फेरीत कसं पोहोचलो हे महत्त्वाचं नाही. पुढच्या दोन सामन्यात तुम्ही कशी कामगिरी करता हे महत्त्वाचं आहे.’

मोर्ने मोर्केल म्हणाले की, ‘इंग्लंड हा एक अतिशय हुशार संघ आहे. त्यांच्याकडे अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत आणि त्यांच्या फलंदाजीत खोली आहे, ज्यामुळे ते एक अतिशय धोकादायक संघ बनतात.’ मोर्ने मोर्केल पुढे म्हणाले की, ‘”त्यांच्याकडे गोलंदाजीत अनेक पर्याय आहेत. मला वाटते की ते निर्भयपणे टी20 सामने खेळतात, सामना त्यांच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांना एक धोकादायक संघ बनवते. मला वाटते की गुरुवार हा दोन आक्रमक संघांमधील एक रोमांचक सामना असेल.”‘

Follow Us
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....