अजित पवार
अजित पवार हे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाचे राजकारणीही आहेत. अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे आहेत. राज्यात सर्वाधिक वेळा म्हणजे पाच वेळा उपमुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 1991पासून अजितदादा बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत. राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी लोकसभेची निवडणूकही लढवली होती. अजितदादा यांनी सर्वात आधी 2019मध्ये राष्ट्रवादीत बंड केलं होतं. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करून पहाटेच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यावेळी त्यांना बहुसंख्य आमदारांनी पाठिंबा दिला होता. मात्र, शरद पवार यांनी त्यांचं हे बंड मोडून काढलं. तीन दिवसातच अजितदादांनी राजीनामा दिला आणि परत स्वगृही परतले होते. त्यानंतर अजितदादा यांनी राष्ट्रवादीत पुन्हा एकदा बंड केलं. 40 आमदारांना घेऊन ते राष्ट्रवादीतून बाहेर पडले. त्यांनी शिंदे गट आणि भाजपशी युती केली असून महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. 2 जुलै 2023 पासून ते महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. 2022-23 या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर देखील हक्क सांगितला आहे. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह स्वतःकडे ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. सध्या हे प्रकरण निवडणूक आयोगात प्रलंबित आहे.
Read MoreJayant Patil: पक्ष बदलाच्या चर्चा अन् भर सभेत जयंत पाटील यांचे बेधडक उत्तर, म्हणाले…
Jayant Patil Statement: पक्ष प्रवेश बाबत भर भाषणात जयंत पाटील यांनी स्पष्टपणे दिलखुलास बोलूनच दाखवले. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील यांच्या भाजप नेत्यांशी भेटीगाठी झाल्यावर चर्चांना पेव फुटले होते. या सर्व चर्चांना त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले.
- Reporter Shankar Devkule
- Updated on: Aug 27, 2026
- 7:26 am
श्रीमद् भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाहीत, मी अजितदादांनाही… सूरदास यांचा खळबळजनक दावा
मोठी बातमी समोर येत आहे, इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी मोठा दावा केला आहे. श्रीमद् भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी अजित पवार यांच्या अपघाताबद्दल देखील मोठा दावा केला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Aug 20, 2026
- 10:29 am
“जरा बारामतीकडेही लक्ष द्या!”, दादा जाताच समस्यांनी डोकं वर काढलं? पवार कुटुंबाला लिहिलेल्या खुल्या पत्राने खळबळ
Ajit Pawar Baramati: अजित पवार यांच्या अकालीन निधनानंतर बारामतीत समस्यानी डोकं वर काढलं की काय? असा सवाल विचारल्या जात आहे. बारामतीकरांनी याविषयी पवार कुटुंबियांना खुलं पत्र लिहून तक्रार केली आहे. शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांना बारामतींकरांनी मोठे आव्हान केले आहे. दादांच्या निधनानंतर बारामती पोरकी झाल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.
- Sandeep Jadhav
- Updated on: Aug 18, 2026
- 10:15 pm
Jyoti Waghmare : सुप्रियाताई तुमचं कर्तृत्व काय? आपला पक्ष सांभाळता… ज्योती वाघमारे कडाडल्या
Jyoti Waghmare on Supriya Sule : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरून शरद पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जोरदार बाजू मांडली. त्यांच्या या विधानाचे पडसाद राजकारणात उमटणार नाहीत, असं कसं होईल? त्यांच्या या युक्तिवादानंतर खासदार ज्योती वाघमारे यांनी शिंदे सेनेचा किल्ला असा लढवला. त्यांनी सुळे यांच्यावर जोरदार पलटवार केला.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 14, 2026
- 8:46 pm
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा NDA शी घरोबा? खासदारांची पंतप्रधान मोदींशी भेट… त्या 15 मिनिटात काय घडलं?
NCP-NDA Meets: सत्ताधारी लोकशाही आघाडीशी शरद पवार यांची राष्ट्रवादी घरोबा करणार असल्याच्या चर्चेदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात 8 खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. 15 मिनिटांच्या या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली? ही सर्वच माहिती आता समोर आली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 11, 2026
- 9:47 am
स्वातंत्र्यदिनी कोण करणार ध्वजारोहण? रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून पुन्हा जुंपणार? बड्या नेत्याची मोठी नाराजी
Raigad Guardian Minister: 15 ऑगस्ट आता तोंडावर आला आहे. तरीही रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. भरतशेट गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यातील रस्सीखेच संपलेली नाही. यापूर्वी पालकमंत्री पद शिंदे सेनेला मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता. पण अजूनही याविषयीची अधिकृत घोषणा न झाल्याने नाराजी नाट्य उभं राहिलं आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 11, 2026
- 9:06 am
उद्या दिल्लीत शरद पवारांच्या खासदारांची मोदींसोबत मिटींग तर आज… राजकारणात मोठा ट्विस्ट येणार?
Sharad Pawar NCP - BJP: राज्याच्या राजकारणात पुन्हा नवीन वादळ येण्याचा दावा करण्यात येत आहे. शरद पवार राष्ट्रवादीच्या भाजपशी खास मैत्रीने राजकीय तरंग उठत आहेत. गेल्या महिन्याभरापासून विविध बैठकी आणि भेटीने वातावरण तापलेले असतानाच आता पुन्हा एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार का?
- Reporter Bhushan Patil
- Updated on: Aug 9, 2026
- 3:01 pm
तटकरे- पटेलांविरोधात पुन्हा नाराजीचा सूर, राष्ट्रवादीत मोठा गोंधळ, आता भुजबळ म्हणाले की…
Chhagan Bhujbal Statement: राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह रुपाली ठोंबरे पाटील यांच्या वक्तव्यानंतर चव्हाट्यावर आला. त्यांनी तटकरे आणि पटेलांवर तोंडसुख घेतले. प्रशांत किशोर यांना राजकीय सल्लागार नेमण्यावरून वादंग उठल्याचे समोर येत आहे. या घडामोडींवर भुजबळांची बोलकी प्रतिक्रिया आली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 8, 2026
- 1:33 pm
जगदंबाची शपथ घेऊन सांगते… अजितदादांना प्रदेशाध्यक्ष बदलायचा होता; रुपाली ठोंबरेंनी टाकला बॉम्ब
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या मागणीने जोर धरला आहे. रुपाली ठोंबरे यांनी 'जगदंबेची शपथ' घेऊन सांगितले की, प्रदेशाध्यक्ष बदलण्याची अजितदादांचीच इच्छा होती. प्रशांत किशोर यांनीही सुनेत्रा पवारांना हाच सल्ला दिल्याने हालचालींना वेग आला आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत पक्षबांधणीसाठी बदल आवश्यक असल्याचे ठोंबरे म्हणाल्या.
- Reporter Pradeep Kapse
- Updated on: Aug 8, 2026
- 10:58 am
तटकरे, पटेल यांना राष्ट्रवादी ताब्यात घ्यायची? रुपाली ठोंबरे पाटील यांनी ठेवणीतील बाण सोडलाच, राजीनाम्याचा मुद्दाही रेटला
Rupali Thombre on Sunil Tatkare: राष्ट्रवादी मजबूत होण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नेत्या रुपाली ठोंबरे यांनी केली आहे. तटकरेंविरोधात त्यांनी तक्रारीचा सूर आळवला. दादा पक्षात असतानाच प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय झाला होता असा दावा त्यांनी केला.
- Reporter Pradeep Kapse
- Updated on: Aug 8, 2026
- 10:20 am
NCP: सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रशांत किशोर नाराज, मॅरेथॉन बैठकीनंतर दादांच्या राष्ट्रवादीत लवकरच मोठा भूकंप?
Prashant Kishor Meets Sunetra Pawar : अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेल्या दोन दिवसात मोठे बदल दिसले. नवीन चेहऱ्यांवर जबाबदारी टाकण्यात आली. नवीन नियुक्ती करण्यात आली. तर त्याचवेळी अजून मोठ्या घडामोडींची नांदीही स्पष्टपणे दिसत आहे. देवगिरी बंगला राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 7, 2026
- 11:05 am
अजितदादांना मरणोत्तर पद्यविभूषण पुरस्कार? दिल्लीतील मोठी घडामोड काय? राष्ट्रवादीचा हा नेता अमित शाहांच्या भेटीला
MLA Vikram Kakde Meet Amit Shah : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्यविभूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. दिल्लीत त्यासाठी भेटीगाठींचे सत्र सुरू आहे. दादांचे राजकीय, सामाजिक आणि इतर क्षेत्रातील योगदान पाहता त्यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार देण्याची मागणी करण्यात आली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 4, 2026
- 3:45 pm