AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Nawale | आदिवासी शेतकऱ्यांचा लाँग मार्च मोर्चा निघाला की मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी...

Ajit Nawale | आदिवासी शेतकऱ्यांचा लाँग मार्च मोर्चा निघाला की मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी…

| Updated on: Jan 27, 2026 | 1:02 PM
Share

नाशिकपासून सुरू झालेल्या आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या लाँग मार्चने पुन्हा एकदा सरकारकडे प्रलंबित मागण्या अधोरेखित केल्या आहेत. या मोर्च्याचा मुख्य उद्देश वन हक्क कायदा आणि पंचायतींना अनुसूचित विभागांत अधिक अधिकार देणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी करून देणे, सिंचन प्रकल्प पूर्ण करणे आणि जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदे भरणे आदी मागण्यांसाठी दबाव वाढवणे आहे.

नाशिकपासून सुरू झालेल्या आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या लाँग मार्चने पुन्हा एकदा सरकारकडे प्रलंबित मागण्या अधोरेखित केल्या आहेत. या मोर्च्याचा मुख्य उद्देश वन हक्क कायदा आणि पंचायतींना अनुसूचित विभागांत अधिक अधिकार देणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी करून देणे, सिंचन प्रकल्प पूर्ण करणे आणि जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदे भरणे आदी मागण्यांसाठी दबाव वाढवणे आहे. आंदोलनाचे नेतृत्व कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) आणि अखिल भारतीय किसान सभा करत आहे. हजारो आदिवासी आणि शेतकरी मुंबईच्या दिशेने पायी येत आहेत. रात्री मिळेल तिथे मुक्काम करून पुन्हा पायी मोर्चा काढत आहेत. मागण्या सरकारकडे आधीच सादर झाल्या असून आश्वासने मिळाली असली तरी ती प्रत्यक्षात अंमलात आणली गेली नाहीत, त्यामुळे लोकांचा विश्वास प्रशासनावर कमी झाला आहे, अशी प्रतिक्रिया मोर्चाचे नेते अजित नवले यांनी दिली आहे. या लॉन्ग मार्चमध्ये सहभागी शेतकऱ्यांनी लाल झेंडे उभारले असून, सरकार समर्थन देत नसेल तर संघर्ष वाढवण्याची चेतावणी ह्या मोर्चाच्या माध्यमातून दिली आहे. या लाँग मार्चचा उद्देश सरकारकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी आणि प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी हा आहे.

Published on: Jan 27, 2026 12:50 PM