राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची (NCP) स्थापना 25 मे 1999मध्ये झाली. त्यापूर्वी शरद पवार (Sharad Pawar), पीए संगमा आणि तारिक अन्वर हे तिन्ही नेते काँग्रेसमध्ये होते. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना काँग्रेसचं अध्यक्ष करण्यात आलं. त्यामुळे या तिघांनीही विदेशीत्वाचा मुद्दा उपस्थित करून पक्ष सोडला. पीए संगमा यांना राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवायची होती. पण संयुक्त पुरोगामी आघाडीने प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला. तरीही संगमा हे मुखर्जी यांच्या विरोधात मैदानात होते. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संगमा यांनी शरद पवार यांची साथ सोडून नॅशनल पीपल्स पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. शरद पवार यांनी सप्टेंबर 2018मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राफेल प्रकरणात क्लीन चिट दिली. त्यामुळे नाराज झालेल्या तारिक अन्वर यांनीही पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर 19 वर्षाने अन्वर पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादीने महाराष्ट्रात काँग्रेस आणि शिवसेनेशी आघाडी करून सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. मात्र, शिवसेनेत बंड झाल्याने पक्ष फुटला. राज्यातील सत्ता गेली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद आलं. विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काम पाहत असतानाच अजित पवार यांनी बंड केल्याने राष्ट्रवादीत फूट पडली. अजितदादा यांच्या गटाने भाजप आणि शिंदे गटाशी हातमिळवणी करून सत्तेत सहभाग घेतला आहे. सध्या राज्यात महायुतीचं सरकार असून अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. तर, राष्ट्रवादीचा ताबा आणि चिन्हाचं प्रकरण निवडणूक आयोगात प्रलंबित आहे.
tv9 Marathi Special Report | परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम; धनंजय मुंडेंवर आरोपांच्या फैरी
बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण पुन्हा तापलंय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजाभाऊ फड यांनी या प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राजाभाऊ फड यांनी आरोप करताना म्हटले की, परळीतील छोटे व्यावसायिक महादेव मुडेंची हत्या धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून करण्यात आली. एसआयटीकडून अलीकडेच काही संशयितांची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करण्यात आली असून त्यामध्ये धनंजय मुंडे यांचे नाव समोर आल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 7, 2026
- 11:46 am
Dattatray Bharne On Budget | शेतकरी कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार, म्हणाले….
महाराष्ट्र राज्याचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प नुकताच विधानसभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाद्वारे ‘विकसित महाराष्ट्र 2027’ या ध्येयाकडे राज्याने वाटचाल करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कर्जमाफीसंदर्भात समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 6, 2026
- 4:53 pm
Sanjay Raut | राजकारणात पैशाची चटक वाढवू नका; राज्यसभा निवडणुकीवर संजय राऊतांचे वक्तव्य
निवडणुकीची गरज नसताना अनावश्यक घोडेबाजार करण्याला काहीही अर्थ नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात कोणीही घोडेबाजार करू नये, अशी आपली भूमिका असल्याचेही राऊत यांनी सांगितले.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 6, 2026
- 12:24 pm
Supriya Sule | राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
हाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे आभार मानले.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 5, 2026
- 4:57 pm
Supriya Sule | राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली. 20 वर्षांनी पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध पक्षांमध्ये समंजसपणाची भूमिका दिसून येत आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 5, 2026
- 4:31 pm
पार्थ पवार पहिल्यांदाच राज्यसभेवर जाणार, आत्याने दिला मोलाचा सल्ला, नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांना सल्ला दिला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Mar 5, 2026
- 4:06 pm
NCP | राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा; अजित पवार अपघाताची CBI चौकशीची मागणी उभी
बुधवारी रात्री राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 20 ते 25 आमदारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अनुपस्थित होते, तरीही उपस्थित आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्याशी थेट चर्चा केली. या चर्चेत अजित पवार यांच्या अपघातानंतर देवगिरी बंगल्यावर घडलेल्या घटनांवर चर्चा झाली.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 5, 2026
- 3:02 pm
Sanjay Raut : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा संपला? संजय राऊत म्हणाले, आता तो विषय…
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी येत्या १६ मार्चला निवडणूक होत आहे. महाविकास आघाडीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला जयंत पाटील यांनी पूर्णविराम दिल्यानंतर मविआने पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विलीनीकरण म्हणजे "दंतकथा" असल्याचे सांगत मविआच्या एकजुटीवर आणि विरोधी पक्षाच्या भूमिकेवर भर दिला.
- manasi mande
- Updated on: Mar 5, 2026
- 10:53 am
NCP : राष्ट्रवादीच्या 20 हून अधिक आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट, चर्चा काय? सीएमचीही भेट घेणार; काय घडतयं ?
राष्ट्रवादी नेते अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद व पक्षाध्यक्षपद सांभाळले आहे. मात्र, अजित पवारांच्या मृत्यूसंदर्भात डीजीसीए अहवालावर आमदारांनी शंका व्यक्त करत CBI चौकशीची मागणी केली आहे. सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत एकत्रित भेट घेण्याचे आश्वासन दिले आहे. रोहित पवारही याप्रकरणी सातत्याने चौकशीची मागणी करत आहेत.
- Reporter Akshay Mankani
- Updated on: Mar 5, 2026
- 10:16 am
Jayant Patil | दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाहीच?; नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट यांचं विलीनीकरण होईल, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. विशेषतः उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर ही चर्चा अधिक सुरू होती. अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांनी अनेक बैठका घेतल्या, दोन्ही गट एकत्र यावेत अशी इच्छा व्यक्त केली जात होती.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 4, 2026
- 1:40 pm
Sharad Pawar Health | शरद पवार यांची प्रकृती सुधारली; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर सर्व आवश्यक चाचण्या करण्यात आल्या होत्या. नंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला. नियमित तपासणीसाठी शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 4, 2026
- 1:21 pm
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? जयंत पाटील यांनी दिलं एका वाक्यात उत्तर… आता विषय…
अजित पवार आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा अजितदादांच्या निधनानंतर तीव्र झाली होती. शरद पवार गटाकडून एकत्रीकरणाचे दावे केले जात होते, परंतु अजित पवार गटाने मौन बाळगले. आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलंय.
- manasi mande
- Updated on: Mar 4, 2026
- 12:41 pm