राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची (NCP) स्थापना 25 मे 1999मध्ये झाली. त्यापूर्वी शरद पवार (Sharad Pawar), पीए संगमा आणि तारिक अन्वर हे तिन्ही नेते काँग्रेसमध्ये होते. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना काँग्रेसचं अध्यक्ष करण्यात आलं. त्यामुळे या तिघांनीही विदेशीत्वाचा मुद्दा उपस्थित करून पक्ष सोडला. पीए संगमा यांना राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवायची होती. पण संयुक्त पुरोगामी आघाडीने प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला. तरीही संगमा हे मुखर्जी यांच्या विरोधात मैदानात होते. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संगमा यांनी शरद पवार यांची साथ सोडून नॅशनल पीपल्स पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. शरद पवार यांनी सप्टेंबर 2018मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राफेल प्रकरणात क्लीन चिट दिली. त्यामुळे नाराज झालेल्या तारिक अन्वर यांनीही पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर 19 वर्षाने अन्वर पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादीने महाराष्ट्रात काँग्रेस आणि शिवसेनेशी आघाडी करून सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. मात्र, शिवसेनेत बंड झाल्याने पक्ष फुटला. राज्यातील सत्ता गेली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद आलं. विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काम पाहत असतानाच अजित पवार यांनी बंड केल्याने राष्ट्रवादीत फूट पडली. अजितदादा यांच्या गटाने भाजप आणि शिंदे गटाशी हातमिळवणी करून सत्तेत सहभाग घेतला आहे. सध्या राज्यात महायुतीचं सरकार असून अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. तर, राष्ट्रवादीचा ताबा आणि चिन्हाचं प्रकरण निवडणूक आयोगात प्रलंबित आहे.
अगोदर वाकुल्या, मग घोडेबाजाराची चर्चा… विधान परिषदेच्या जागा वाटपाचा जांगडगुत्ता सुटला! भाजपच्या पारड्यात किती जागा?
Local Body Elections of the Legislative Council: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीतील जागा वाटपावरून महायुतीत मोठी रस्सीखेच सुरू होती. तीनही पक्ष एकमेकांना कमी जागांसाठी दबाव टाकत असतानाच अंतर्गत गटबाजी टाळण्यासाठी प्राथमिक चर्चा झाली आणि त्यात एक फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब झाले.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: May 22, 2026
- 1:59 pm
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. वारकरी संप्रदायात काही लोकांनी घुसखोरी केल्याचा आरोप करत त्यांनी काही वारकऱ्यांची यादी जाहीर केली होती. या विधानानंतर राज्यभरात मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक वारकरी संघटनांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता.
- प्रिती वेद
- Updated on: May 21, 2026
- 3:14 pm
मोठी बातमी! …तर मी राष्ट्रवादी सोडणार; रोहित पवारांचं मोठं विधान, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होऊन राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएसोबत सत्तेत जाणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती, त्यावर बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आपली भूमिका देखील स्पष्ट करण्यात आली, आता या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: May 21, 2026
- 3:09 pm
राष्ट्रवादीतील काही जण संपर्कात… शिंदे सेनेच्या या बड्या नेत्याने टाकला बॉम्ब…. राजकीय समीकरणं बदलणार?
Ajit Pawar NCP- Eknath Shinde Shivsena: अजितदादांच्या राष्ट्रवादीत नाराजी नाट्य सुरू असल्याचा दावा गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत आहे. त्यातच नाराज नेते शरद पवार यांच्या भेटीलाही गेल्याचे समजते. तर काही नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा बडा दावा करण्यात आला आहे. महायुतीतच हा दुसरा घरोबा करण्यात येईल का? असा सवाल विचारल्या जात आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: May 21, 2026
- 12:01 pm
Sharad Pawar: शरद पवार यांच्यावर आमदार-खासदार नाराज? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना घडलं काय?
Sharad Pawar NCP-SP: अजित पवार गटातील जवळपास 22 आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दादांच्या गटातील अंतर्गत अंतर्गत वादामुळे या आमदारांनी हे पाऊल टाकल्याचं मानलं जात आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: May 21, 2026
- 8:45 am
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्यूला समोर! विधानपरिषद निवडणुकीसाठी कोणाला किती जागा?
या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महायुतीत जागावाटपावर चर्चा सुरू झाली आहे. कोणाला किती जागा? हे महायुतीच्या घटकपक्षांमध्ये ठरवलं जात आहे. दरम्यान, आता या निवडणुकीसाठी महायुतीचे संभाव्य जागावाटप समोर आले आहे
- Prajwal Dhage
- Updated on: May 20, 2026
- 7:57 pm
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय; सर्वात मोठी माहिती समोर!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाल्याचं चित्र समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महत्त्वाच्या बैठकीत विलिनीकरणाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 20, 2026
- 4:15 pm
मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? शेवटी एकदाचं ठरलं, शरद पवारांच्या बैठकीत सर्वात मोठा निर्णय
गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमधून मोठी बातमी समोर आली आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: May 20, 2026
- 3:39 pm
राष्ट्रवादीत खळबळ… शरद पवार भाकरी फिरवणार, 22-23 आमदार संपर्कात? नेमकं काय घडतयं?
Sharad Pawar NCP : गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता राष्ट्रवादीचे 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: May 20, 2026
- 3:36 pm
CM Fadnavis On Sharad Pawar | पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले पवार साहेबांनी…
राजकारणात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचं कौतुक केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत पवारांच्या वक्तव्याला महत्त्वपूर्ण म्हटलं आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 20, 2026
- 3:28 pm
Chhagan Bhujbal On Petrol Shotage | महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल टंचाईचा धोका? देशाकडे फक्त….छगन भुजबळांचा मोठा खुलासा
राज्यात इंधन साठ्याबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पेट्रोल आणि डिझेल साठ्याबाबत मोठा खुलासा केला आहे. सध्या देशाकडे केवळ एक महिना पुरेल इतकाच पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या संघर्ष आणि राजकीय घडामोडींमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याचे पडसाद आता भारतातही उमटू लागल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 20, 2026
- 1:57 pm
Jitendra Awhad | महिन्याभरात पेट्रोल एवढ्या रुपयांनी महागणार? लोकांची चिंता वाढली, जितेंद्र आव्हाड यांनी आकडाच सांगितला, म्हणाले….
पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी “बुरे दिन येणार आहेत, हे पंतप्रधान मोदी नेदरलँडमध्ये जाऊन का सांगतात?” असा सवाल उपस्थित केला.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 20, 2026
- 1:17 pm