लोकसभा निवडणुकीचे नामांकन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. येत्या 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज भरणे सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यात अमरावतीतूनही अर्ज भरला जाणार आहे. मात्र, अमरावतीची जागा भाजपने स्वत:कडे घेतल्याने शिंदे गटाची चांगलीच गोची झाली आहे. भाजपने ही जागा आपल्याकडे घेतल्यानंतर या जागेवरून नवनीत राणा लढणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.