मनसे
राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेना पक्षातून वेगळं होऊन नव्या पक्षाची स्थापना केली होती. या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे असं आहे. मनसेला विधानसभा निवडणुकीत पहिल्यात प्रयत्नात 13 जागांवर यश मिळाला होता.
Amit Thackeray : शून्य… हीच आहे आपल्या आयुष्याची किंमत… म्युझिकल नखरे थांबवा; अमित ठाकरे यांची पोस्ट चर्चेत
मुलुंड मेट्रो दुर्घटनेनंतर अमित ठाकरे यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सामान्य मुंबईकरांच्या जीवाचे मोल शून्य झाल्याचे ते म्हणाले. निकृष्ट कामामुळे लोकांचा बळी जात असताना सरकारची प्राथमिकता इव्हेंटबाजी आहे. परदेशात जबाबदारी स्वीकारली जाते, पण आपल्याकडे 5 लाखांची भरपाई देऊन नागरिकांच्या दुःखाची अवहेलना केली जाते, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.
- manasi mande
- Updated on: Feb 17, 2026
- 10:22 am
Sanjay Raut: महाराष्ट्र पालथा घातला असता तर…सामनातून संजय राऊतांनी ठाकरे बंधूंचे टोचले कान, उद्धव आणि राज ठाकरेंना फटकारे
Sanjay Raut on Uddhav Thackeray-Raj Thackeray: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर सामनातून रोखठोक समाचार घेण्यात आला. या राजकीय घडामोडीचे विश्लेषण करताना संजय राऊत यांनी दस्तूरखुद्द ठाकरे बंधूंचे कान टोचले. त्यांच्या या जळजळीत लेखातून भाजप-शिंदे सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या विजयाचे तर महाविकास आघाडीच्या पराभवाचे विश्लेषण करण्यात आले.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Feb 15, 2026
- 10:36 am
Sanjay Raut | राज ठाकरे बोलतील तेव्हाच बोलू… बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊत यांचा सवाल
जे काही बंद दाराआड किंवा भिंतीआड बोललं जात आहे, त्यावर आम्ही का बोलू? लक्षात ठेवा, मनसे आणि शिवसेना यांची युती खूप घट्ट आहे. कोणी काहीही बोललं तरी त्या युतीला काही फरक पडणार नाही. कोणाचीही इच्छा असली तरी ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडणार नाही,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.
- Harshada Gaikwad
- Updated on: Feb 14, 2026
- 12:31 pm
Sanjay Raut : कोणी कितीही आदळआपट केली तरी ठाकरेंच्या युतीत मिठाचा खडा पडणार नाही – राऊतांनी सुनावलं
चंद्रपूरमधील घडामोडींवरून शिवसेना आणि मनसेत वाद पेटला असताना, संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, पक्षाची त्यात भूमिका नाही. मनसेने केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, राऊत यांनी ठाकरे बंधूंची युती अतिशय घट्ट असल्याचे ठामपणे सांगितले. कोणी कितीही प्रयत्न केले तरी या युतीत मिठाचा खडा पडणार नाही, असे त्यांनी अधोरेखित केले.
- manasi mande
- Updated on: Feb 14, 2026
- 11:59 am
Sandeep Deshpande | चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल
चंद्रपूरमधील भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीवरून राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांचा उधाण आले आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी थेट शिवसेनेचे खास नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. देशपांडे म्हणाले की, “सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम असा झालाय की, सुपर प्रवक्त्यांना आता सुपर उद्धव ठाकरे यांच्या नाव घेण्याची भीती वाटायला लागली आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Feb 13, 2026
- 2:59 pm
MNS On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनीचं सर्व..युतीमध्ये असताना मनसेकडून पहिल्यांदाच थेट खळबळजनक आरोप
MNS On Uddhav Thackeray : "कारवाई थतूरमथुर नसावी. प्रसिद्धीसाठी नसावी. फेरीवाला धोरण त्याची अमलबजावणी करून, कायमस्वरूपी तोडगा काढावा. उगीच Acting पुरत कोणी काही करू नये ही विनंती" असं संदीप देशपांडे म्हणाले.
- Dinananth Parab
- Updated on: Feb 13, 2026
- 12:53 pm
tv9 Marathi Special Report | ज्यांना धोरत नीट नेसता येत नाही… कोश्यारींच्या विधानाने नवा राजकीय वाद; राऊतांचा जोरदार पलटवार
माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्यातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. “राज ठाकरे हे पंतप्रधान मोदींना घाबरतात,” असे विधान कोश्यारी यांनी केल्याचे सांगितले जाते. या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोश्यारींवर जोरदार टीका केली.
- Harshada Gaikwad
- Updated on: Feb 13, 2026
- 12:19 pm
Musical Road : म्युझिकल रोडमुळे अमित ठाकरे प्रचंड संतापले, सरकारला थेट सुनावलं, म्हणाले, मराठी गाणे…
मुंबईतील कोस्टल रोड हा भारतातील पहिला म्युझिकल रोड म्हणून नावारुपाला आला आहे. परंतु राज्य सरकारच्या या उपक्रमावर अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Feb 12, 2026
- 6:57 pm
MNS Sandeep Deshpande | कोश्यारींना खूप चोपला असता… नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. कोश्यारींनी दावा केला की, राज ठाकरे नरेंद्र मोदी यांना जास्त घाबरतात. या वक्तव्यावरून राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. देशपांडे म्हणाले, “आज जर भगतसिंग असते तर कोश्यारींना खूप चोपला असता.
- Harshada Gaikwad
- Updated on: Feb 12, 2026
- 4:21 pm
Sandeep Deshpande | तुम करो तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला?; मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
चंद्रपुरमध्ये भाजपशी युती केल्यावर मनसेने ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आरोप केला की, ठाकरेंच्या नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी रुपये दिले गेले आहेत. संदीप देशपांडे यांनी आपल्या वक्तव्यात संजय राऊत यांना लक्ष्य करत म्हणाले, “संजय राऊतांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का?” तसेच केडीएमसीचा संदर्भ देत राऊतांसह ठाकरे सेनेवरही निशाणा साधला.
- Harshada Gaikwad
- Updated on: Feb 12, 2026
- 2:09 pm
Sandip Deshpande: तर कोश्यारींना खूप चोपला असता… मनसे नेते संदीप देशपांडे यांचा खणखणीत इशारा
Sandip Deshpande on Bhagatsingh Koshyari: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नरेंद्र मोदी यांना जास्तच घाबरलेत असा दावा काल माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला होता. त्यावर आज स्वाभाविकपणे मनसेतून प्रतिक्रिया अपेक्षित होती. ती प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Feb 12, 2026
- 12:24 pm
Bhagat Singh Koshyari | राज ठाकरेंनी घाबरू नये, त्यांनी नरेंद्र मोदींना…भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. माध्यमांशी संवाद साधताना कोश्यारी यांनी सांगितले की, “मी राज ठाकरे यांचा सन्मान करतो, मात्र ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना काहीसे जास्तच घाबरतात असे वाटते.” त्यांच्या या वक्तव्यामुळे विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
- Harshada Gaikwad
- Updated on: Feb 11, 2026
- 5:12 pm