Aaditya Thackeray | राज्यसभेच्या दोन्ही जागांवर आमचाच हक्क आदित्य ठाकरेंचा दावा
संख्याबळ पाहता राज्यसभेची जागा आमचीच असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यसभेच्या दोन्ही जागा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे स्पष्ट केले. आदित्य ठाकरे म्हणाले की, “2020 मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा दिली होती.
संख्याबळ पाहता राज्यसभेची जागा आमचीच असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यसभेच्या दोन्ही जागा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे स्पष्ट केले. आदित्य ठाकरे म्हणाले की, “2020 मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा दिली होती. त्यामुळे यावेळी राज्यसभेची जागा आम्हाला मिळायला हवी.” त्यांनी पक्षाच्या भूमिकेवर ठामपणे भाष्य करताना सांगितले की, राज्यसभेत पक्षाचे खासदार संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी सातत्याने प्रभावीपणे लढा देत आहेत. “हा लढा संविधानाच्या रक्षणासाठी आहे, देशाच्या अदानीकरणाच्या विरोधात आहे, धारावी विकण्याच्या विरोधात आहे, तसेच मुंबई आणि महाराष्ट्र विकण्याच्या प्रयत्नांविरोधात आहे. हा लढा आम्ही ठामपणे देत आलो आहोत,” असेही ते म्हणाले. पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी दावा केला की, इंडिया आघाडीत गेल्या पाच वर्षांत ठामपणे राहिलेला आमचा पक्ष एकमेव आहे. त्यामुळे राज्यसभेच्या दोन्ही जागांवर आमचा हक्क असल्याचा आग्रह त्यांनी व्यक्त केला. राज्यसभेच्या उमेदवारीवरून आघाडीत चर्चांना वेग आला असून, पुढील काही दिवसांत याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
राज्यसभेच्या दोन्ही जागांवर आमचाच हक्क आदित्य ठाकरेंचा दावा
अंबादास दानवे यांचा 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप
पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी तौबा गर्दी! काय आहे प्रकार
विरोधी पक्षनेता नसलेले पहिले अधिवेशन! आदित्य ठाकरे यांची टीका

