शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगलीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीका केली आहे. सांगलीच्या जागेवरून आघाडीत बिघाडी झाली आहे, असं सांगतानाच आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचं आहे, कोणी किती जागा लढवल्या त्याने फरक पडत नाही. भाजप हा मोठा भाऊ आहे. त्यामुळे एक दोन जागा जास्त लढवल्या तर त्याने फरक पडत नाही, असं संजय शिरसाट म्हणाले.