इंदापूर विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणूकांच्या निमित्ताने महायुतीतील दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये तुंबळ युद्ध सुरु झाले आहे. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या मित्रपक्षांकडून इंदापूरात फिरु नको अशी धमकी मिळाल्याची तक्रार देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. मागे जो आपल्या विधानसभेत मदत करेल त्यालाच लोकसभेत मदत करु असा नारा हर्षवर्धन यांची कन्या आणि पूत्राने दिला होता.