विधानसभा निवडणूक बातम्या
देशातील एक सर्वात महत्त्वाची विधानसभा म्हणून महाराष्ट्र विधानसभेकडे पाहिलं जातं. अनेक दिग्गजांनी महाराष्ट्र विधानसभा गाजवली. महाराष्ट्र विधानसभेतून निघालेल्या अनेक दिग्गजांनी पुढे राष्ट्रीय पातळीवरही आपला ठसा उमटवला आहे. विद्यमान महाराष्ट्र विधानसभा ही 288 सदस्यांची आहे. त्यातील 29 सदस्य हे अनुसूचित जाती आणि 25 सदस्य अनुसूचित जमातीतील आहे. महाराष्ट्र विधानसभेत बहुमतासाठी 145 सदस्यांची आवश्यकता असते. सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. राज्यात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री करण्यात आले आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अधिवेशन मुंबईत होतं. तर हिवाळी अधिवेशन नागपूरला घेतलं जातं. नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. त्यामुळे नागपूरला अधिवेशन घेऊन विदर्भातील बॅकलॉग भरून काढण्यावर भर दिला जातो. गेल्यावेळी राज्यात 2019मध्ये निवडणुका पार पडल्या होत्या. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले होते. मात्र अवघ्या अडीच वर्षात राज्यात सत्तांतर होऊन महायुतीचं सरकार आलं होतं.
Assembly Election Exit Poll 2026: आसाम, पश्चिम बंगालसह केरळमपर्यंत… कुणाच्या भाळी विजयाचा टिळा, टीव्ही 9 वर 5 राज्यांचे पोल ऑफ पोल्स पाहा
Assembly Election Exit Poll 2026: आसाम, केरळम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथे मतदान झाले आहे. तर पश्चिम बंगाल राज्यात दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज होत आहे. मतदान संपल्यानंतर लागलीच विविध संस्थांचे एक्झिट पोल जारी होतील. यावेळी टीव्ही 9 पोल ऑफ पोल्स जाहीर करणार आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Apr 29, 2026
- 12:17 pm
Tamil Nadu- West Bengal By-Elections | कुणाचं सरकार येणार? मतदान सुरू, सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान? घ्या जाणून
देशातील विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मतदानाची प्रक्रिया सुरू असून, महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसोबतच पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्येही मतदार मोठ्या उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सकाळी 9 वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, दोन्ही राज्यांमध्ये चांगल्या प्रमाणात मतदान नोंदवण्यात आलं आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Apr 23, 2026
- 12:10 pm
सोनार बांगलाच्या नावाखाली जनेतशी छळ, ही निवडणूक म्हणजे…धर्मेंद्र प्रधान यांची तृणमूलवर सडकून टीका!
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली.
- Prajwal Dhage
- Updated on: Mar 28, 2026
- 5:07 pm
tv9 Marathi Special Report | बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान? तारीख समोर येताच…
राहुरी आणि बारामती मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी मतदानाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून, 4 मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने काल नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 16, 2026
- 10:39 am
Vidhansabha Election | पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर; ४ मे रोजी निकाल
आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांची अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेनुसार पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात निवडणुका होणार आहेत. या सर्व राज्यातील निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी लागणार आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 15, 2026
- 5:46 pm
Election Commission | विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तयारीबाबत तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवण्यासाठी आयोगाने केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, देशातील निवडणुका शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आयोग कटिबद्ध आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 15, 2026
- 5:01 pm
5 states Poll Schedule : पश्चिम बंगाल ते तामिळनाडू, 4 राज्यांत विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं, मदतान कधी निकाल कधी? वाचा A टू Z
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या चार राज्यांची तसेच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाची निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सर्व निवडणूक कार्यक्रम सांगितला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Mar 15, 2026
- 4:43 pm
Nitish Kumar: पहिल्यांदा पराभवाचा सामना आता दहाव्यांदा मुख्यमंत्री; धुरंधर नितीश कुमार यांचे हे राजकीय डावपेच माहिती आहेत का?
Nitish Kumar Political Journey: 'बिहारमें बहार है, फिर नितीश सरकार है' असे निकालाच्या दिवशीचे घोषवाक्य होते. आज नितीश कुमार हे बिहारचे दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्यांचा राजकीय पट असा खुलला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 20, 2025
- 9:04 am
Explainer: महिला ठरल्या गेमचेंजर, बिहारात साल 2010 ते 2025 महिलांचे मतदान किती टक्के वाढले?
बिहार विधानसभा निवडणूकात एनडीएचा मोठा विजय झाला आहे. या विजयात महिलांचा वाटा मोठा राहिला आहे. महिलांचे मतदानाची टक्केवारी देखील पुरुषांच्या तुलनेत अधिक राहिली आहे. नितीश कुमार यांची महिला धोरणे महिलांना मतदारांना आकर्षित करुन गेली असल्याचे स्पष्ट झाले.
- Atul Kamble
- Updated on: Nov 18, 2025
- 11:20 am
Bihar Election Result : निकालानंतर लालूंच्या घरात नेमकं चाललंय काय? तेजस्वी यादव अन् रोहिणी आचार्य यांच्यात कडाक्याचं भांडण
बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या घरात संघर्ष उफाळला आहे. तेजस्वी यादव आणि त्यांची बहीण रोहिणी आचार्य यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. रोहिणी यांनी अपमान झाल्याचा आरोप करत घर सोडले आणि राजकारण सोडण्याची घोषणा केली. या घटनेने लालू कुटुंबातील अंतर्गत कलह समोर आला आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 17, 2025
- 11:25 am
नितीश कुमार यांचे पूत्र निशांत पुन्हा सक्रीय, बिहारच्या सीएम पदाची चर्चा सुरु असताना मीडियाशी साधला संवाद
एनडीएला बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळाले आहे. आणि विरोधक महागठबंधनचा दारुण पराभव झाला आहे. त्यातच नितीश कुमार यांनाच भाजपा पुन्हा मुख्यमंत्री पद देणार का याची चर्चा सुरु असताना निशांत कुमार यांनी एण्ट्री घेतली आहे....
- Atul Kamble
- Updated on: Nov 16, 2025
- 5:51 pm
Praful Patel: ‘कोणी स्वतःला बाहुबली समजू नये,अनेक बाहुबलींना आम्ही निवडून दिलंय’, प्रफुल्ल पटेल यांचा रोख कुणावर?
Praful Patel NCP: बिहार निवडणूक निकालाने भाजपमध्ये शंभर हत्तीचे बळ आले आहे. तर आता मित्रपक्षांची चिंता वाढली आहे. त्यातच अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी वक्तव्य केले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 16, 2025
- 12:57 pm