AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता पुढचं टार्गेट काय? पश्चिम बंगालसह कोणत्या राज्यांवर भाजपचा डोळा?; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेटच सांगितलं

बिहार येथील मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत विजय उत्सव साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना यावेळी संबोधित केले. बिहारच्या जनतेला आता जंगल राज नको तर विकास हवा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

आता पुढचं टार्गेट काय? पश्चिम बंगालसह कोणत्या राज्यांवर भाजपचा डोळा?; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेटच सांगितलं
pm modi after bihar victory
| Updated on: Nov 14, 2025 | 8:38 PM
Share

बिहारच्या निवडणूकीत नितीश कुमार यांच्या मदतीने एनडीएने मोठा विजय मिळवला आहे. यामुळे अलिकडच्या काळात बिहार धरुन भाजपाला सहा राज्यात विजय मिळाला आहे. भाजपा प्रणित एनडीएने बिहारात महाविकास आघाडीचा सर्वात मोठा पराभव केला आहे. आता भाजपानचे पुढचे टार्गेट काय असणार याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे भाकित केले आहेत.

बिहारात भाजपा प्रणित एनडीएला मोठा विजय मिळला आहे. काँग्रेसचा आणि इतर विरोधकांचा सुपडा साफ झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या दिल्ली कार्यालयात रात्री विजय उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. आपल्या संबोधनात बिहारच्या जनतेला आता जंगल राज नको तर विकास हवा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

आजचा आपला विजय नव्या प्रवासाची सुरुवात आहे. बिहारने जो विश्वास टाकला, त्यामुळे आमच्या खांद्यावरची जबाबदारी अधिक वाढली आहे असे मोदी यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले मी तुम्हाला विश्वास देतो की येणाऱ्या पाच वर्षात बिहार अधिक वेगाने पुढे जाईल. बिहारमध्ये नवे उद्योग येतील. बिहारच्या तरुणांना बिहारमध्येच रोजगार मिळेल यासाठी आम्ही काम करू. बिहारमध्ये गुंतवणूक येईल. त्यातून अधिक नोकऱ्या मिळेल. बिहारमध्ये पर्यटनाचा विस्तार होईल. जगाला बिहारचं नवे सामर्थ्य दिसेल असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.

बिहारमध्ये तिर्थस्थानांचा कायापालट होईल. मी आज देश आणि जगातील गुंतवणूकदारांना सांगतो, बिहार तुमच्या स्वागतासाठी तयार आहे.मी देश आणि जगात असलेल्या बिहारच्या मुलांना सांगतो बिहारमध्ये गुंतवणूक करण्याची ही सर्वात चांगली वेळ आहे असे यावेळी मोदी म्हणाले.

भाजपची ताकद ही भाजपचा कार्यकर्ता

बिहारच्या माता, भगिनी, शेतकऱ्यांना सांगतो, तुमचा विश्वास हे माझं जुनं नातं आहे. तुमची आशा आकांक्षा ही माझी प्रेरणा आहे. आपण मिळून एक असा बिहार बनवूया जो समृद्ध आणि विकसित असेल. भाजपची ताकद ही भाजपचा कार्यकर्ता आहे. जेव्हा भाजपचा कर्मठ कार्यकर्ता जेव्हा ठरवतो तेव्हा कोणतंच लक्ष्य अशक्य होत नाही असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.

जंगलराज उखडून फेकेल

मोदी पुढे म्हणाले की भारताच्या यशाचा आधार भाजपचा कार्यकर्ताच आहे. आजच्या विजयाने भाजप कार्यकर्त्यांना केरळ, तामिळनाडू, पाँडेचरी आणि पश्चिम बंगाल ओरिसात ही नव्या ऊर्जेने भारावून टाकलं आहे. गंगाही इथूनच जाते आणि बंगालला जाते. बिहारने बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा केला आहे. मी बंगालच्या नागरिकांनाही सांगतो आता भाजप तुमच्या सोबत मिळून पश्चिम बंगालमधूनही जंगलराज उखडून फेकेल.

Follow Us
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.