AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहारमध्ये ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, काँग्रेसबद्दल काय म्हणाले?

बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मतदारांनी एनडीएच्या बाजुनं कौल दिला असून, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला असून, आभार व्यक्त केले आहेत.

बिहारमध्ये ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, काँग्रेसबद्दल काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 14, 2025 | 7:43 PM
Share

बिहारमध्ये एनडीएला मोठं यश मिळालं आहे, विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएचा मोठा विजय झाला आहे, तर महाआघाडीला पराभवाचा धक्का बसला आहे, बिहार निवडणुकीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, निवडणूक निकालानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला असून, त्यांनी यावेळी बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहारच्या लोकांनी विकसित आणि समृद्ध बिहारसाठी मतदान केलं आहे. निवडणुकीवेळी मी जनतेला रेकॉर्ड व्होटिंग करण्याचा आग्रह केला होता. आणि बिहारच्या जनतेने सर्व विक्रम मोडले आहेत. मी बिहारच्या लोकांना एनडीएला प्रचंड विजय देण्याचा आग्रह धरला होता. बिहारच्या जनतेने माझा आग्रह मानला. बिहारने २०१० नंतरचा सर्वात मोठा जनादेश एनडीएला दिला आहे. मी खूप विनम्रपणे एनडीएच्या सर्व पक्षाच्या वतीने बिहारच्या महान जनतेचे आभार मानतो, असं मोदी यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मी बिहारच्या महान जनतेला आदरपूर्वक नमन करतो. मी आज लोकनायक जयप्रकाश नारायण, भारत रत्न कर्पुरी ठाकूर यांनाही आदरपूर्वक नमन करतो. कर्पूरी ठाकूर यांच्या गावातून मी बिहारमध्ये निवडणूक मोहीम सुरू केली आहे. आजचा विजय आपल्याला संकल्पित करायला सांगतो की, बिहारच्या विकासाला नव्या उंचीवर घेऊन जा. हा मोठा विजय देत आणि अतूट विश्वास व्यक्त करत बिहारच्या लोकांनी धुरळाच उडवून दिला आहे. आज बिहारच्या घराघरात मखानेची खीर होणार आहे. मला आनंद याचा आहे की, या ठिकाणीही मखान्याची खीर सर्वांना देण्यात आली आहे. आम्ही तर जनता जनार्दनाचे सेवक आहोत. आम्ही आपल्या मेहनतीने जनतेचं हृदय खूश करत असतो. आम्ही तर जनता जनार्दनाचं हृदय चोरून बसलेलो आहोत. त्यामुळे संपूर्ण बिहारने दाखवून दिलंय की पुन्हा एकबार एनडीए सरकार.

मी निवडणुकीत वारंवार सांगितलं होतं. बिहारच्या निवडणुकीत मी जेव्हा जंगलराजवर बोलायचो. कट्टा सरकारवर बोलायचो तेव्हा आरजेडीचे लोक विरोध करत नसायचे. पण काँग्रेसवाल्यांना झोंबायचं. मोदी असं काय म्हणतात? असं ते म्हणायचे. पण आता परत सांगतो. आता परत कट्टा सरकार येणार नाही, असा हल्लाबोल यावेळी मोदी यांनी केला आहे.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...