नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी भारताचे (Prime Minister of India) विद्यमान पंतप्रधान आहेत. मे 2024 पासून मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहत आहेत. यापूर्वी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. 2001 ते 2014पर्यंत मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदी उत्तर प्रदेशातील वाराणासी लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे भाजपचे मोठे नेते आहेत. ते संघाचेही स्वयंसेवक होते. 17 सप्टेंबर 1950 मध्ये मोदींचा गुजरातच्या वडनगरमध्ये जन्म झाला होता. मोदी यांच्या नेतृत्वात 2014मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली गेली. या निवडणुकीत भाजपने मोठं यश मिळवलं. त्यामुळे मोदी पंतप्रधान झाले. मोदींच्या लाटेमुळेच 2014मध्ये भाजपला देशातील अनेक राज्यात विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला. 2019ची लोकसभा निवडणूकही मोदींच्याच नेतृत्वात लढवण्यात आली. यावेळीही भाजपला घवघवीत यश मिळालं. मोदींनी त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. धाडसी निर्णयामुळे त्यांची लोकप्रियता अधिक वाढली. नोटाबंदी, जीएसटी लागू करणे, पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवणे आणि तीन तलाकच्या कायद्याबाबतचे निर्णय त्यांनी घेतले.
PM Kisan Yojana : पीएम किसानचा 22 वा हप्ता जमा झाला की नाही? एका मिनिटात तपासा
PM Kisan 22th Installment : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अगदी थोड्याच वेळात पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता जमा करतील. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर त्यांनी या योजनेविषयी पहिला निर्णय घेतला होता. हप्ता जमा झाला की नाही ते असे तपासा.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Mar 13, 2026
- 4:35 pm
अजून मोठे संकट? LPG तुटवड्यामुळे मोबाईलचे नेटवर्क गायब? कॉलिंग आणि डेटाही नाही वापरता येणार, मोठी अपडेट काय?
LPG Shortage Mobile Network: दूरसंचार टॉवरचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांनी मोठा इशारा दिला आहे. आता अजून एक मोठे संकट नागरिकांवर येणार आहे. LPG तुटवड्याचा फटका आता मोबाईलधारकांना बसण्याची शक्यता आहे. त्यांचे कॉलिंग आणि डेटाही बंद होण्याची शक्यता आहे, काय आहे ती मोठी अपडेट?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Mar 13, 2026
- 11:33 am
LPG Shortage: घरगुती ते व्यावसायिक गॅसबाबत सरकारची मोठी ॲक्शन,3 दिवसात 10 सर्वात मोठे निर्णय
LPG Shortage Modi Government Decision: गॅसच्या अभूतपूर्व टंचाईने राष्ट्र आणि राज्य होरपळले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि खानावळ चालकांना मोठा फटका बसला. तर कामगार बेरोजगारीच्या उंबरठ्यावर आला आहे. त्यातच सर्वसामान्यांची दोन वेळच्या जेवणासाठीची कसरत लांबच लांब रांगामधून दिसली. त्यावर मात करण्यासाठी मोदी सरकारने त्यासाठी दहा दमदार निर्णय घेतले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Mar 13, 2026
- 9:01 am
Iran-Isreal War : भारतासाठी गुड न्यूज, इंधनाचा तुटवडा संपणार ? युद्धादरम्यान पंतप्रधान मोदींनी उचललं मोठं पाऊल, इराणच्या राष्ट्रपतींशी संवाद
मध्य पूर्व संघर्षाचे पडसाद जगभर उमटत असताना भारतालाही इंधन तुटवड्याची झळ बसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला. भारतीयांची सुरक्षा, कच्च्या तेलाचा व नैसर्गिक वायूचा सुरळीत पुरवठा आणि शांततेसाठी भारताच्या वचनबद्धतेवर भर देत त्यांनी जागतिक शांततेसाठी आवाहन केले. भारताच्या इंधन सुरक्षेसाठी हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
- manasi mande
- Updated on: Mar 13, 2026
- 8:57 am
Maharashtra News LIVE : चंद्रपुरातील प्रस्तावित लोहखदानीला राज्य सरकारची स्थगिती
Maharashtra News LIVE Updates: देशात गॅस टंचाई सुरू असल्याने अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद झाले आहेत. तर गॅस पुरवठा लवकरच सुरळीत होण्याचे आश्वासन सरकारने काल संसदेत दिले. रशियाकडून 50 टक्के तेल खरेदी वाढवण्यात आली आहे. तर 60 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Mar 13, 2026
- 11:41 pm
PM Narendra Modi: LPG संकट गडद, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे थेट निर्देश, अफवा पसरवल्यास…
PM Narendra Modi: देशात LPG सिलेंडरचे संकट अजूनच गडद झाले आहे. व्यावसायिक वापराचे सिलेंडर पुरवठा बंद झाला आहे. तर घरगुती वापराच्या सिलेंडरचा तुटवड्याने ग्राहकांच्या लांबच लांब रांगा एजन्सीबाहेर लागल्या आहेत. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट निर्देश दिले आहेत.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Mar 12, 2026
- 12:49 pm
Sanjay Raut | इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे? संजय राऊतांचा पंतप्रधान मोदीेंना सवाल
इराण–इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र भारताने याबाबत अद्याप ठोस प्रतिक्रिया दिली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 12, 2026
- 12:18 pm
Sanjay Raut Press | जय श्रीराम म्हणा, सर्व काही मिळेल; गॅस टंचाईवरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता भारतातही दिसू लागला आहे. एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकही अडचणीत सापडले आहेत. अनेक गॅस एजन्सींच्या बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी बुकिंग करूनही गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. या परिस्थितीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 12, 2026
- 11:33 am
Sanjay Raut: ‘फक्त जयश्रीराम म्हणा, सिलेंडर तुमच्या दारात’, संजय राऊतांचा जहरी टोला, तर नमो नमो म्हटल्यास…
Sanjay Raut Harsh Comments: LPG सिलेंडर तुटवडा आणि टंचाईवर उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी जहरी टोला हाणला आहे. त्यांनी देशात सामान्य नागरीक गॅस दरवाढ आणि तुटवड्याने हैराण झालेला असताना सरकारच्या धोरणाचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी पंतप्रधानांच्या त्या कृतीवर नाराजी व्यक्त केली.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Mar 12, 2026
- 11:08 am
Maharashtra News LIVE : राज ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचं आवाहन
Maharashtra News LIVE Updates : अमेरिका–इस्रायल–इराण युद्धामुळे गॅसचा टंचाई कायम आहे. त्याचा फटका अनेक छोटे मोठे व्यावसायिक, हॉटेल चालक यांना बसत आहे. महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाचे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.
- manasi mande
- Updated on: Mar 13, 2026
- 1:20 am
Sanjay Raut | रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल; थेट केंद्रालाच सवाल
अमेरिकेतील टेक्सास येथे रिलायन्स इंडस्ट्रीकडून मोठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हा प्रकल्प तेल शुद्धीकरणाशी संबंधित असून गेल्या 50 वर्षांनंतर अमेरिकेत उभारला जाणारा हा पहिला भारतीय तेल शुद्धीकरण प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 11, 2026
- 12:22 pm
Sanjay Raut | मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला मोदींना बोलवा; संजय राऊत यांनी इंधन टंचाईवरून डिवचले
पश्चिम आशियातील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षाचा परिणाम आता महाराष्ट्रातही दिसू लागला आहे. ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ बंद झाल्यामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून काही उद्योगांवर त्याचा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 11, 2026
- 11:18 am