Maharashtra News LIVE : विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची मोठी धमकी..
Maharashtra News LIVE Updates : अमेरिका–इस्रायल–इराण युद्धामुळे गॅसचा टंचाई कायम आहे. त्याचा फटका अनेक छोटे मोठे व्यावसायिक, हॉटेल चालक यांना बसत आहे. महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाचे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

LIVE NEWS & UPDATES
-
गॅस तुटवड्याचा परिणाम! युद्धाच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक शेगड्यांची अचानक वाढली मागणी
अमेरिका–इस्रायल–इराण युद्धमुळे गॅस सिलेंडर पुरवठ्यावर परिणामगॅस मिळत नसल्याने गृहिणींचा इलेक्ट्रिक शेगड्यांकडे वाढता कल. कल्याण डोंबिवली परिसरात दुकानांमध्ये इलेक्ट्रिक शेगडी खरेदीसाठी गर्दी
-
विजय सूर्यवंशी यांची पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती
मेट्रोचे महासंचालक श्रावण हर्डीकर हे होते पिंपरी चिंचवड महापालिकेचे सध्या प्रभारी आयुक्त. मात्र आता पिंपरी चिंचवड महापालिकेला विजय सूर्यवंशी यांच्या माध्यमातून पूर्णवेळ आयुक्त मिळाला
-
-
त्या तीन वर्षातील प्रस्ताव ठाणे महापालिका महासभेत मांडणार
ठाणे महापालिकेचे १८ मार्चला होणाऱ्या दुसऱ्या महासभेत मागील तीन वर्षातील कामांचे प्रस्ताव स्थायी समिती गठित न झाल्याने अवलोकनार्थ ठेवण्यात आले आहेत. त्यात तब्बल 171 विषयांचे समावेश असल्याची माहिती समोर आली आहे..मागे महासभेत गदारोळ झाला होता दहा मिनिटांमध्ये पटवारी सर्वच विषय मंजूर करण्यात आले होते..
-
ईमेल करून विधानभवनाला उडवण्याची धमकी
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यादरम्यानच थेट विधानभवनाल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. ईमेल करून ही धमकी देण्यात आली.
-
पोलिसांकडून विधानभवनात सर्च ऑपरेशन सुरू
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. आता पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
-
-
विधान भवन बॉम्बने उडवण्याची धमकी
विधान भवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून याच काळात अशी धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. ही धमकी नेमकी कोणी, का दिली, याचा तपास केला जात आहे.
-
वसई – एलपीजी गॅस तुटवड्या बाबत हॉटेल व्यवसायिकांनी घेतली तहसीलदारांची भेट
वसई विरारमधील एलपीजी गॅस तुटवड्याबाबत हॉटेल व्यवसायिकांनी तहसीलदारांची भेट घेतली. अमेरिका इराण युद्धाचा फटका वसई विरार मधील एलपीजी गॅस वितारणावर बसला असून, एलपीजी गॅस मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायिक चिंतेत आहेत.
वसईचे तहसीलदार दीपक गायकवाड यांनी गॅस वितारकांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी मार्फत तोडगा काढण्याचे आश्वासन दिलं. वसई तालुक्यातील सर्व हॉटेल व्यवसायिकांची आज दुपारी पालघर जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखड यांच्यासमोर बैठक होणार आहे.
-
-
गॅस सिलेंडरचा काळाबाजार कराल तर खबरदार – ठाण्यात प्रशासनाचा इशारा
गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनिक कडक पावले उचलले आहेत. जिल्ह्यातील गॅस एजन्सीवर लक्ष ठेवण्यासाठी शिधावाटप विभागाकडून 72निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. काळाबाजार झाल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्ती किंवा एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून दोषींवर तुरुंगवासाची कारवाई होऊ शकते.
-
धाराशिव मध्ये 200 हॉटेलचा गॅस पुरवठा थांबवला, पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर
धाराशिव मध्ये 200 हॉटेलचा गॅस पुरवठा थांबवला, घरगुती गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात पुरवठा विभागाकडून निरीक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत.
धाराशिव जिल्ह्यात घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. धाराशिव मधील 200 हॉटेल्सचा व्यावसायिक गॅस पुरवठा थांबवण्यात आला असून घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण मात्र नियमित सुरू ठेवण्यात आले आहे.
-
चाकण औद्योगिक वसाहतीत उमटले युद्धाचे पडसाद
आशिया खंडातील सर्वात मोठे ऑटो हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण औद्योगिक वसाहतीत युद्धाचे पडसाद उमटत आहेत.या औद्योगिक वसाहती मधील अनेक कंपन्यांचा गॅस पुरवठा बंद झाल्याने सुमारे 30 टक्के कंपन्याचे कामकाज ठप्प झाले आहे. तर ऑनलाईन गॅस असल्याने उर्वरित 70 टक्के कंपन्याचे सध्या तरी कामकाज सुरळीत सुरू आहे
-
सोलापूर – छोट्या हॉटेल व्यावसायिकांकडून हॉटेल बंद ठेवायला सुरुवात
सोलापुरात छोटे हॉटेल व्यावसायिकांकडून हॉटेल बंद ठेवायला सुरुवात झाली आहे. गॅस अभावी सोलापुरातील छोट्या व्यावसायिकांनी हॉटेल बंद केलं आहे. अनेक हॉटेल्समध्ये फक्त एक ते दोन दिवसांचा गॅस शिल्लक राहिला आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन दिवसांनी गॅस संपल्यानंतर पुढे काय करायचं हा प्रश्न भेडसावत आहे असे सांगत सरकारने याबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंती व्यावसायिकांनी केली आहे.
अमेरिका–इस्रायल–इराण युद्धामुळे मुळे निर्यात ठप्प झाल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतमालाची विक्रमी आवक झाली आहे. शेतमाल मोठ्या प्रमाणात आल्याने भाजी फळे फुलांचा भाव घसरला असून ग्राहक नसल्याने बाजारातच शेतमाल पडून आहे, तो सडण्याची वेळ शेतकरी-व्यापारी चिंतेत आहेत. नाशिकमध्ये आजपासून ‘कृषी कुंभ’ प्रदर्शन चे आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख, एआय दालन, जुगाड ते तंत्रज्ञान स्पर्धा आणि परिसंवादांचे आयोजन यामध्ये करण्यात आलंय. कृषी उद्योग व बाजारपेठेतील संधींबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने 12 ते 16 मार्च या कालावधीत ‘कृषी कुंभ’ प्रदर्शन पार पडेल. बुलढाणा जिल्ह्यात मुली सह विवाहित महिला अचानक बेपत्ता होण्याचा सत्र थांबता थांबत नाहीये. बुलढाणा जिल्ह्यातून सरासरी दररोज पाच ते सहा मुली किंवा विवाहित महिला बेपत्ता होत आहेत. काल गेलेल्या 24 तासात जिल्ह्यातून एका विवाहितेसह पाच मुली व एक युवक असे सहा जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यासह महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे अपडेटस जाणून घेण्यासाठी दिवसभर टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Mar 12,2026 8:15 AM
