AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, सहन करू, पण उद्योजकांना नको; शिंदेंच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी "शेतकऱ्यांनी त्रास सहन करावा, पण उद्योजकांना नको" असे वादग्रस्त विधान केले आहे. जळगावमधील कार्यक्रमात ते म्हणाले की, विजेअभावी शेतकऱ्यांपेक्षा उद्योजकांचे मोठे नुकसान होते. या धक्कादायक वक्तव्यामुळे पाटील यांच्यावर सर्वत्र टीका होत असून, त्यांना विरोधकांनी धारेवर धरले आहे.

शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, सहन करू, पण उद्योजकांना नको; शिंदेंच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
gulabrao patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 28, 2026 | 3:28 PM
Share

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आपल्या विधानांनी नेहमी चर्चेत असतात. कधी शेरोशायरीतून विरोधकांना जोरदार उत्तर देतात, कधी आपल्या तडाखेबंद भाषणातून समोरच्याला नामोहरण करतात तर कधी आपल्याच विधानाने स्वत:ची कोंडी करून घेतात. आताही गुलाबराव पाटील यांनी स्वत:ची कोंडी करून घेतली आहे. त्यांनी उद्योजकांची बाजू घेणारं आणि शेतकऱ्यांना कमी लेखणारं विधान केलं आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील चर्चेत आले आहेत.

गुलाबराव पाटील जळगावच्या एका कार्यक्रमात सुस्साट बोलत होते. आमची हात जोडून विनंती आहे की.. शेतकऱ्यांना थोडासा त्रास झाला तर आम्ही सहन करून घेऊ. पण उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका. एवढीच आमची हात जोडून विनंती आहे, असे गुलाबराव पाटलांनी म्हटल आहे. गुलाबराव पाटील यांच्या या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पाटील असं का म्हणाले? याची चर्चा आता संपूर्ण राज्यात सुरू झाली असून त्यांच्या या विधानावरून त्यांना विरोधकांनी घेरलं आहे.

मोठं नुकसान सहन करावं लागतं

लाईट नसेल तर एक वेळ मी शेतकरी म्हणून आम्ही सहन करून घेऊ. उद्योजकाला लाईटचा फार त्रास होतो. उद्योगाची वीज बंद झाली तर त्याला मोठे नुकसान सहन करावं लागतं. उद्योग बंद असताना देखील मजुरांची मजुरी द्यावी लागते. उत्पादन निघत नाही. विजेच्या अडचणीमुळे नवीन उद्योजक देखील उद्योग सुरू करण्यासाठी विचार करतात, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला. जळगावच्या चिंचोली येथील वीज उपकेंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

गुलाबरावांना समज द्या

दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या या विधानाच शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी समाचार घेतला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांना सरकारमधील प्रमुख नेत्यांनी समज द्यावी. तुमच्याकडून काही देणं होत नाही तर शेतकऱ्यांचा असा अपमान तरी तुम्ही करू नका?, असा संताप व्यक्त करतानाच भविष्यात गुलाबरावांनी असं विधान करू नये म्हणून वरिष्ठ नेत्यांनी त्यांना आताच समज दिली पाहिजे, असं रोहिणी खडसे म्हणाल्या. विजेचा त्रास शेतकऱ्यांना झाला तर चालेल. मात्र उद्योजकांना व्हायला नको, असं असंवेदनशील वक्तव्य गुलाबरावांनी करणं चुकीचं आहे, असंही त्या म्हणाल्या.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच